नितीश कुमारांनी दहाव्यांदा घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

सम्राट चौधरी, विजय सिन्हा सलग दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदी


पाटणा (वृत्तसंस्था) : नितीश कुमार यांनी गुरुवारी दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पाटणा येथील ऐतिहासिक गांधी मैदानात राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यानंतर सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. ते दुसऱ्यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू तसेच भाजप आणि एनडीएच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी २४ अन्य मंत्र्यांना शपथ दिली.


नितीश यांची प्रदीर्घ राजकीय वाटचाल


७४ वर्षीय नितीश कुमार यांनी नोव्हेंबर २००५ पासून राज्याचे मुख्यमंत्री आहेत. याला अपवाद २०१४-१५ मधील केवळ नऊ महिन्यांचा कालंखड आहे. यंदाची विधानसभा निवडणूक ही नितीश कुमार यांच्यासाठी एक महत्त्वाची परीक्षा म्हणून पाहिली जात होती. त्यांनी रालोआला अभूतपूर्व यश मिळवून देत पुन्हा एकदा सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळवले. जद(यू)चे प्रमुख नितीश कुमार यांची बुधवारी पाटणा येथे झालेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत पक्षाच्या विधिमंडळ गटाचे नेते म्हणून निवड झाली होती.


चिराग यांच्या पक्षातील दोन आमदार मंत्री


चिराग यांच्या पक्षाचे संजय कुमार पासवान आणि संजय सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. संजय कुमार पासवान हे बखरी येथून आमदार आहेत, तर संजय सिंह हे महुआ येथून आमदार आहेत. त्यांनी लालू यादव यांचे पुत्र तेज प्रताप यांचा पराभव केला.


प्रेम कुमार हे बिहार विधानसभेचे अध्यक्ष


प्रेम कुमार हे बिहार विधानसभेचे अध्यक्ष होतील. या मुद्द्यावर जेडीयू आणि भाजपमध्ये एक करार झाला आहे. डॉ. प्रेम कुमार हे गया टाउन विधानसभा मतदारसंघातून नवव्यांदा आमदार झाले आहेत. १९९० पासून ते गया टाउनची जागा सतत जिंकत आहेत. प्रेम कुमार यांनी बिहार सरकारमध्ये आरोग्य अभियांत्रिकी, रस्ते बांधकाम आणि शहरी विकास मंत्री म्हणून काम पाहिले आहे.


२६ मंत्र्यांपैकी ३ महिला, ११% वाटा


नितीश यांच्या मंत्रिमंडळातील २६ मंत्र्यांपैकी तीन महिला आहेत. टक्केवारीच्या बाबतीत, महिला मंत्रिमंडळात ११ टक्के आहेत. लेशी सिंह, रमा निषाद आणि श्रेयसी सिंह यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

भोंदूबाबा अशोक खरातने हवालाद्वारे पाच देशांत पाठवले हजारो कोटी?, रोहित पवारांचा गंभीर आरोप

मुंबई : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी कोठडीत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्याभोवतीचा चौकशीचा फास अधिक

बाकी उठाठेव सोडून संजय राऊत यांनी स्वत:च्या पक्षात काय चालले ते पाहावे; भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार

मुंबई: अशोक खरात यांच्या तपासासंदर्भात अंजली दमानिया यांना मिळत असलेला तपशील मुख्यमंत्री कार्यालयातून लिक होत

Devendra Fadnavis: 'बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी'

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात राजकीय मतभेद बाजूला ठेवून बारामती विधानसभा मतदारसंघाची

Nitesh Rane : मुंब्र्याचे नाव 'मुंब्रादेवी' करणार! - मंत्री नितेश राणे

- मदरशांमध्ये डॉक्टर-इंजिनिअर नव्हे, दहशतवादी तयार होतात मुंबई : "मुंब्रा-कळवा परिसर हिरवा करण्याचे स्वप्न

‘एमआयडीसी’च्या बनावट पत्राद्वारे अधिवेशनाच्या पासची विक्री

६ जणांना अटक; मंत्रालय आणि विधिमंडळ सचिवालयातील कर्मचाऱ्यांचा कारनामा मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय

अशोक खरात आणि रुपाली चाकणकर तसेच खरात आणि चाकणकरांची बहीण यांच्यात अनेकदा झालेले फोन कॉल ?

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात आणि रुपाली चाकणकर तसेच खरात आणि चाकणकरांची बहीण यांच्यात अनेकदा फोन कॉल झाल्याचा