नितीश कुमारांनी दहाव्यांदा घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

सम्राट चौधरी, विजय सिन्हा सलग दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदी


पाटणा (वृत्तसंस्था) : नितीश कुमार यांनी गुरुवारी दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पाटणा येथील ऐतिहासिक गांधी मैदानात राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यानंतर सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. ते दुसऱ्यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू तसेच भाजप आणि एनडीएच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी २४ अन्य मंत्र्यांना शपथ दिली.


नितीश यांची प्रदीर्घ राजकीय वाटचाल


७४ वर्षीय नितीश कुमार यांनी नोव्हेंबर २००५ पासून राज्याचे मुख्यमंत्री आहेत. याला अपवाद २०१४-१५ मधील केवळ नऊ महिन्यांचा कालंखड आहे. यंदाची विधानसभा निवडणूक ही नितीश कुमार यांच्यासाठी एक महत्त्वाची परीक्षा म्हणून पाहिली जात होती. त्यांनी रालोआला अभूतपूर्व यश मिळवून देत पुन्हा एकदा सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळवले. जद(यू)चे प्रमुख नितीश कुमार यांची बुधवारी पाटणा येथे झालेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत पक्षाच्या विधिमंडळ गटाचे नेते म्हणून निवड झाली होती.


चिराग यांच्या पक्षातील दोन आमदार मंत्री


चिराग यांच्या पक्षाचे संजय कुमार पासवान आणि संजय सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. संजय कुमार पासवान हे बखरी येथून आमदार आहेत, तर संजय सिंह हे महुआ येथून आमदार आहेत. त्यांनी लालू यादव यांचे पुत्र तेज प्रताप यांचा पराभव केला.


प्रेम कुमार हे बिहार विधानसभेचे अध्यक्ष


प्रेम कुमार हे बिहार विधानसभेचे अध्यक्ष होतील. या मुद्द्यावर जेडीयू आणि भाजपमध्ये एक करार झाला आहे. डॉ. प्रेम कुमार हे गया टाउन विधानसभा मतदारसंघातून नवव्यांदा आमदार झाले आहेत. १९९० पासून ते गया टाउनची जागा सतत जिंकत आहेत. प्रेम कुमार यांनी बिहार सरकारमध्ये आरोग्य अभियांत्रिकी, रस्ते बांधकाम आणि शहरी विकास मंत्री म्हणून काम पाहिले आहे.


२६ मंत्र्यांपैकी ३ महिला, ११% वाटा


नितीश यांच्या मंत्रिमंडळातील २६ मंत्र्यांपैकी तीन महिला आहेत. टक्केवारीच्या बाबतीत, महिला मंत्रिमंडळात ११ टक्के आहेत. लेशी सिंह, रमा निषाद आणि श्रेयसी सिंह यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा, राज्यात कुठे होणार युती आणि कुठे मैत्रीपूर्ण लढती ?

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या

भाजपचा शरद पवार गटाला मोठा धक्का

धुळे : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसंग्राम लढणार

मुंबई : मुंबई, ठाणे, भिवंडी आणि नवी मुंबई येथील शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत

उबाठाने ५ टर्ममधील सव्वालाख कोटींचा हिशेब मुंबईकरांना द्यावा

मंत्री आशिष शेलार यांचे आव्हान; मुंबईत विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका मुंबई : मुंबई महापालिकेत गेल्या पाच

अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई, पुणे, नागपूरसह २९ शहरांत 'इलेक्शन'चा धुराळा; निकाल कधी ? वाचा सविस्तर

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या राज्यातील २९

निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना 'दे धक्का'; तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश, अमित साटम यांच्या उपस्थितीत सोहळा

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला