रस्त्यालगतच्या चायनीज गाड्या हटवणार; मंत्री नरहरी झिरवळ यांचे आश्वासन

मुंबई: मुंबई-पुण्यासह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये रस्त्यांच्या कडेला उघड्यावर चायनीज खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या गाड्यांची दोन दिवसांत तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी गुरूवारी विधानसभेत दिले. तसेच, भेसळखोरांवर कठोर कारवाईची तरतूद असलेल्या प्रस्तावित कायद्याचे प्रारूप अंतिम मंजुरीसाठी विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.


आमदार सुनील कांबळे यांनी पुणे शहरातील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत सिद्धार्थ शिरोळे, विकास ठाकरे, योगेश सागर, मनीषा चौधरी आणि सुरेश धस यांनी हॉटेलमधील निकृष्ट दर्जाच्या अन्नाबाबत प्रश्न केले. तसेच, अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आवश्यक कारवाईसाठी मनुष्यबळ आणि योग्य यंत्रणा नसल्याचा मुद्दा मांडला.


त्यावर उत्तर देताना झिरवळ म्हणाले की, ‘प्रशासनाकडून १९७ नवीन अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात तपासणी मोहिमेला गती येईल. तसेच, प्रत्येक विभागात प्रयोगशाळा सुरू करण्याची सरकारची भूमिका आहे. त्यापैकी पुणे आणि नाशिक येथील प्रयोगशाळा अंतिम टप्प्यात असून लवकरच त्या पूर्ण क्षमतेने सुरू केल्या जातील. तसेच, खासगी प्रयोगशाळांच्या सेवाही घेतल्या जातील.


दरम्यान, नागरिकांनी अन्न व औषधांसंदर्भात तक्रारीसाठी १८००-२२२-३६५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. मात्र, ‘या नंबरवर फोन करून काहीच होत नाही,’ असे म्हणत आमदार योगेश सागर यांनी या व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी केली.

Comments
Add Comment

Plane Crashes : बीजिंगमध्ये हाहाकार! १७०० फुटी 'चायना झुन' टॉवरमध्ये घुसलं विमान

बीजिंगच्या सर्वात उंच इमारतीला विमानाची जोरदार धडक   चीन: चीनची (China) राजधानी बीजिंगमध्ये (Beijing) शुक्रवारी एक

ISSF Junior World Championship. :आयएसएसएफ ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा देदिप्यमान विजय

आयएसएसएफ (ISSF) ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०२६: भारताचा देदिप्यमान विजय; २४ पदकांसह अव्वल स्थान

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

India-Nepal Trade : भारताचा नेपाळला मोठा दणका! सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला; नव्या नियमांमुळे व्यापारावर परिणाम

सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला भारताच्या नव्या नियमांमुळे नेपाळच्या व्यापारावर परिणाम नवी दिल्ली : भारत आणि

Home Minister Amit Shah : एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार

एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार नवी दिल्ली : पुढील १५ दिवसांत संपूर्ण देशात ६००० कोटी रुपये