मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल यंदा लवकरच लागली आहे. मुंबईत नेहमी डिसेंबरमध्ये थंडी जाणवते. पण यंदा नोव्हेंबरमध्येच गारठा पडला आहे. सांताक्रूझ वेधशाळेत आज सकाळी १६.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले आहे. या तापमानाने मागील अकरा वर्षांचे रेकॉर्ड तोडले आहे. याआधी राज्यात २०१६ मध्ये १६.४ किमान तापमानाची नोंद झाली होती. या काळातील नेहमीचे २१ अंशांच्या आसपासचे तापमान यंदा तब्बल पाच अंशांनी घसरल्याने शहरात थंडीचे प्रमाण वाढले आहे.


मुंबईसह इतर उपनगरांमध्येही थंडीची तीव्रता अधिक वाढली आहे. बदलापूरमध्ये तापमान ११ अंशांपर्यंत खाली गेले आहे. महाबळेश्वरसारखी थंडी या भागात जाणवत होती. सकाळपासून मुंबईत धुरकट वातावरण दिसत असून, हवेतल्या प्रदूषणामुळे AQI सुमारे १७० च्या स्तरावर पोहोचला आहे. यामुळे थंडीसोबतच हवेची गुणवत्ता खालावण्याची समस्या अधिक गंभीर झाली आहे.


यंदा नोव्हेंबरपासूनच तापमानात जलद घट होण्यामागे विविध हवामान घटक कारणीभूत आहेत. उत्तर आणि मध्य भारतातून येणारे थंड व कोरडे वारे महाराष्ट्रात प्रवेश करत असल्याने तापमान खाली येत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळांच्या प्रभावामुळे वातावरणातील आर्द्रता कमी झाली असून, हवेतला बाष्प जलदगतीने कमी झाल्याने थंडीची तीव्रता वाढली आहे. मान्सूनचा पूर्णत: परतावा झाल्यानेही वातावरणात बदल दिसून येत आहे. हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे आगामी दिवसांत तापमानात आणखी घट होऊ शकते.


राज्यातील विविध शहरांमध्येही किमान तापमानात मोठी घट नोंदवली गेली आहे. सांताक्रूझमध्ये १६.२ अंश, कुलाब्यात २१.६ अंश, बदलापूरमध्ये ११ अंश, तर पुण्यात ९.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. लोणी काळभोरमध्ये तापमान ६.९ अंशांपर्यंत खाली गेले असून, हे राज्यातील सर्वात कमी तापमान ठरले आहे. राज्यभरातील या कमी तापमानामुळे नागरिकांना हिवाळ्याचा कडाका जाणवू लागला आहे.

Comments
Add Comment

Prajakta Lavangare : महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी सुविधा देण्यासाठी उपाययोजना करा

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजाचा, सुविधांचा अतिरिक्त आयुक्तांकडून आढावा मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या

MPSC Exam : MPSC परीक्षेत मोठा बदल, आता २१ दिवसांत निकाल येणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत मोठा बदल; पूर्व परीक्षा आता CBT पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा

Lokmanya Tilak road fire : लोकमान्य टिळक रोडवर आग; परिसरातील नागरिकांची पळापळ!

मुंबई : मुंबईत आगीच्या सत्रामुळे खळबळ उडाली असून, शुक्रवारी दादरच्या (Dadar) लोकमान्य टिळक रोडवर (Lokmanya Tilak Road) आगीची

Aarey Road : गोरेगाव आरे भास्कर रस्त्यांची तात्पुरती डागडुजी

स्थानिक नगरसेविकेने रस्ता खचण्याची वर्तवली भीती पावसाळ्यात पूर्वस्थितीत रस्ता आणून देताना घेतली नाही

Mumbai Police : मुंबई पोलीस अधिकारी संभाजी गुरव यांची मोठी कामगिरी; उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च डेनाली शिखर सर

मुंबई : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक संभाजी गुरव ( Sambhaji Gurav) यांनी उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च माउंट

Suicide News: धक्कादायक! वरळी सी लिंकवरून समुद्रात उडी; ठाण्यातील व्यावसायिकाचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील (Mumbai) वरळी सी लिंकवरून (Worli Sea Link) एका व्यक्तीने समुद्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.