मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल यंदा लवकरच लागली आहे. मुंबईत नेहमी डिसेंबरमध्ये थंडी जाणवते. पण यंदा नोव्हेंबरमध्येच गारठा पडला आहे. सांताक्रूझ वेधशाळेत आज सकाळी १६.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले आहे. या तापमानाने मागील अकरा वर्षांचे रेकॉर्ड तोडले आहे. याआधी राज्यात २०१६ मध्ये १६.४ किमान तापमानाची नोंद झाली होती. या काळातील नेहमीचे २१ अंशांच्या आसपासचे तापमान यंदा तब्बल पाच अंशांनी घसरल्याने शहरात थंडीचे प्रमाण वाढले आहे.


मुंबईसह इतर उपनगरांमध्येही थंडीची तीव्रता अधिक वाढली आहे. बदलापूरमध्ये तापमान ११ अंशांपर्यंत खाली गेले आहे. महाबळेश्वरसारखी थंडी या भागात जाणवत होती. सकाळपासून मुंबईत धुरकट वातावरण दिसत असून, हवेतल्या प्रदूषणामुळे AQI सुमारे १७० च्या स्तरावर पोहोचला आहे. यामुळे थंडीसोबतच हवेची गुणवत्ता खालावण्याची समस्या अधिक गंभीर झाली आहे.


यंदा नोव्हेंबरपासूनच तापमानात जलद घट होण्यामागे विविध हवामान घटक कारणीभूत आहेत. उत्तर आणि मध्य भारतातून येणारे थंड व कोरडे वारे महाराष्ट्रात प्रवेश करत असल्याने तापमान खाली येत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळांच्या प्रभावामुळे वातावरणातील आर्द्रता कमी झाली असून, हवेतला बाष्प जलदगतीने कमी झाल्याने थंडीची तीव्रता वाढली आहे. मान्सूनचा पूर्णत: परतावा झाल्यानेही वातावरणात बदल दिसून येत आहे. हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे आगामी दिवसांत तापमानात आणखी घट होऊ शकते.


राज्यातील विविध शहरांमध्येही किमान तापमानात मोठी घट नोंदवली गेली आहे. सांताक्रूझमध्ये १६.२ अंश, कुलाब्यात २१.६ अंश, बदलापूरमध्ये ११ अंश, तर पुण्यात ९.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. लोणी काळभोरमध्ये तापमान ६.९ अंशांपर्यंत खाली गेले असून, हे राज्यातील सर्वात कमी तापमान ठरले आहे. राज्यभरातील या कमी तापमानामुळे नागरिकांना हिवाळ्याचा कडाका जाणवू लागला आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

MPSC Exam : औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; आता फेरपरीक्षा होणार, उमेदवारांना पुन्हा अर्जाची गरज नाही

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून