१५ दिवसांत तोडगा न निघाल्याने जैन मुनींचा आंदोलनाचा इशारा

सरकारला २० नोव्हेंबरपर्यंतची मुदत


मुंबई : मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यामुळे आक्रमक झालेल्या जैन समाजाने मुनी नीलेश चंद्र विजय यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणी १५ दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. राज्य सरकारच्या एकाही प्रतिनिधीने १५ दिवसांत आपल्याशी संपर्क साधलेला नाही. त्यामुळे आता दादरच्या कबुतरखान्यावर आंदोलन करण्याचा इशारा जैन मुनींनी दिला.


मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यामुळे आक्रमक झालेल्या जैन समाजाने जैन मुनी नीलेश चंद्र विजय यांच्या नेतृत्वाखाली ३ नोव्हेंबर रोजी आझाद मैदानावर आमरण उपोषण केले. त्यावेळी आझाद मैदानावर जाऊन पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन मुनींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हेही आझाद मैदानावर जैन मुनींची भेट घेण्यासाठी गेले होते. या प्रकरणी १५ दिवसांत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन नार्वेकर यांनी दिले. त्यानंतर जैन मुनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण सोडले.


जैन मुनी नीलेश यांनी ३ नोव्हेंबरला आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जैन समाजाच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. मुंबईकरांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्यासाठी पर्यायी जागांचा शोध घेऊन त्या उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. पालिका प्रशासनाने दोन दिवसांत मुंबईतील चार जागांची निवड करून त्या ठिकाणी सकाळी ७ ते ९ या वेळेत नियंत्रित पद्धतीने खाद्य देण्याची परवानगी दिली. दादरच्या कबुतरखान्याबाबत काहीही तोडगा निघाला नाही. त्यामुळे जैन मुनी नीलेश यांनी सरकारला २० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली असून त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असा इशारा दिला आहे. कबुतरखान्यांमुळे नागरिकांना धोका निर्माण होणार नाही व कबुतरांचाही जीव वाचेल अशा पद्धतीने तोडगा काढण्याचे आश्वासन नार्वेकर यांनी दिले होते.

Comments
Add Comment

ठाणे, पुणे नागपूरसह ११ जिल्ह्यांत होणार अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये

प्रशासकीय भार हलका करण्यासाठी निर्णय; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील वाढती

विधान परिषदेचा अवमान करणार्‍या शरद पवार गटाच्या पदाधिकार्‍याला शिक्षा ?

पदाधिकार्‍याला ३० दिवसांच्या कारावासाची शिफारस घटनात्मक पदांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले;

विधिमंडळातील चर्चांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

विधानसभा अध्यक्षांनी घेतली गंभीर दखल; कठोर कारवाईचा दिला इशारा मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पासारख्या अतिशय

आता महिनाभरात होणार जमीन मोजणी - राज्यात २०० 'खासगी भूमापकांची' नियुक्ती; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई : राज्यातील प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी आणि नागरिकांना जलद सेवा देण्यासाठी महसूल

आखाती देशांमध्ये अडकलेल्या तरुणांच्या सुरक्षिततेबाबत विधानपरिषदेत चर्चा

महाराष्ट्र विधानपरिषदेत आज कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी आखाती (Gulf) देशांमध्ये निर्माण

प्रवेशमार्गांवर घडणार मुंबईची ओळख

सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक  संकल्पनांवर आधारित असेल प्रवेशद्वार महापौरांनी तिन्ही प्रवेशमार्गांची केली