पाकिस्तानवरील हवाईक्षेत्र रोखले गेल्याने एअर इंडिया आर्थिक अडचणीत

पहलगाम घटनेनंतर संबंध विकोपाला गेल्याचा फटका


नवी दिल्ली  :  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबध विकोपाला गेले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांचा थेट परिणाम विमान कंपन्यांवर होत आहे. दोन्ही देशांनी एकमेकांसाठी एअरस्पेस बंद केल्याने एअर इंडियासहित अनेक आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. लांब पल्ल्याच्या मार्गांवर प्रवास वेळ तीन तासांपर्यंत वाढला असून इंधन खर्चात २९% वाढ झाली आहे.


एअरस्पेस बंदीमुळे एअर इंडियाला वर्षाकाठी ४५५ मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात सुमारे ३ हजार ८०० कोटी इतके नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे नुकसान २०२४-२५ मधील ४३९ मिलियन डॉलरच्या तुलनेत अधिक आहे. या वाढत्या आर्थिक ताणातून सुटण्यासाठी एअर इंडियाने केंद्र सरकारकडे चीनच्या शिनजियांग प्रांतातील हॉटन, काश्गर, उरुमकी मार्गे ‘इमर्जन्सी एअर एक्सेस’ मिळण्याची मागणी केली आहे. मागणी मान्य झाल्यास अमेरिका, कॅनडा आणि युरोपकडे जाणाऱ्या उड्डाणांचे अंतर कमी होईल. यामुळे प्रवासाच्या कालावधीत बचत होईल आणि इंधन खर्चातही मोठी कपात होईल.


लांब पल्ल्याचा प्रवासात तीन तासांनी वाढ, इंधन खर्चात २९ टक्के वाढ, वर्षाला ३,८००  कोटींचे नुकसान होण्याचा अंदाज



चीनच्या शिनजियांग प्रांतातील ‘इमर्जन्सी एअर एक्सेस’ची मागणी


एअर इंडियाच्या मागणीला चीन मान्यता देण्याची शक्यता कमी
एअर इंडिया मागत असलेला शिनजियांगचा रुट जगातील सर्वात उंच पर्वतरांगांमधून जातो. येथे पर्वतांची उंची २० हजार फुटांपेक्षा जास्त आहे. या क्षेत्रात डीकंप्रेशनचा (केबिनमधील वायुदाब अचानक कमी होणे) धोका अत्यंत गंभीर मानला जातो. यामुळे, प्रवाशांना श्वास घेण्यास अडचण, खिडक्या वा दरवाजे अचानक उघडणे, विमानाच्या संरचनेला नुकसान होणे अशा प्रकारच्या घटना घडू शकतात. ही जोखीम पाहून अनेक आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स हा मार्ग टाळतात. याशिवाय हा भाग चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी वेस्टर्न थिएटर कमांडच्या अधिकारात येतो. त्यामुळे हा संवेदनशील ‘मिलिटरी एअरस्पेस’ आहे. अशा परिस्थितीत, चीन या मार्ग वापरण्याची परवानगी देईल का? असा प्रश्न आहे.

Comments
Add Comment

Schools Open : राज्यातील सर्व शाळा गुरुवारी सुरू राहणार; शाळा बंद ठेवल्यास वेतन कपातीची कारवाई

मुंबई : ९ जुलै २०२६ रोजी प्रस्तावित शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कोणतीही शाळा बंद राहणार

Sourav Ganguly : 'दादा - द सौरव गांगुली स्टोरी'चा फर्स्ट लूक प्रदर्शित

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या बहुप्रतिक्षित

Mahanagar Gas Limited : मुंबईत इंडिया पोस्ट आणि महानगर गॅस लिमिटेड यांची भागीदारी

मुंबई : नागरिक-केंद्रित सेवा वितरण अधिक सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून भारतीय टपाल विभाग

Heavy Rain In Palghar : घोणसई गावाला पाण्याचा वेढा; मुख्य पूल पाण्याखाली

- मुख्य पूल बुडाल्याने गावाचा बाहेरील संपर्क खंडित वाडा : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार

Karnataka News : पावसात ४० वर्षांचं चंदनाचं झाड कोसळलं; ८५ वर्षीय वृद्ध लखपती!

कर्नाटक : पावसाळ्यात (Monsoon) मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि तुफान वाऱ्यांमुळे (Strong Winds) झाडं कोसळल्याच्या घटना वारंवार घडतात. अशा

Nashik : आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलीय, नाशिक–पुणे रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा एल्गार

नाशिक : नाशिक–पुणे रेल्वे हा केवळ वाहतुकीचा नव्हे, तर नाशिकच्या विकासाचा आणि भविष्यातील आर्थिक प्रगतीचा