गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर असलेल्या कोलकातातील इडन गार्डन या खेळपट्टीवर टीम इंडियाची खेळी कमी पडली. मात्र आता भारतीय संघाला ही मालिका गमावायची नसेल तर कोणत्याही स्थितीत दुसरा कसोटी सामना जिंकावाच लागणार आहे. भारताचा दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा दुसरा कसोटी सामना गुहावटीमध्ये होणार आहे.


भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा दुसरा आणि अंतिम सामना २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. दुसरा कसोटी सामना गुवाहाटीत होणार असून पहिल्या सामन्यापेक्षा काही मिनिटं आधी दुसर्‍या सामन्याला सुरुवात होणार आहे. कोलकातात पहिल्या कसोटी सामन्याला सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात झाली होती. मात्र कोलकाताच्या तुलनेत गुवाहाटीत ३० मिनिटांआधी नाणेफेक आणि सामना सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर अंदाजे ९ वाजता सामना सुरु होणार आहे. तर त्याआधी ८ वाजून ३० मिनिटांनी टॉस होईल.





कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत आधी लंच ब्रेक आणि नंतर टी ब्रेक होतो. मात्र गुवाहाटीत यंदा ही परंपरा बदलणार असून आधी टी ब्रेक आणि नंतर लंच ब्रेक होणार आहे. कसोटी सामन्यांच्या इतिहासात लंचआधी टी ब्रेक होण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुवाहाटीत पहिल्यांदाच कसोटी सामना होणार आहे. त्यामुळे चाहते गुवाहाटीतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी सज्ज आहेत.


भारतीय संघावर पहिल्या सामन्यातील पराभवामुळे जोरदार टीका करण्यात आली. त्यामुळे आता भारतीय संघ कसोटीचा दुसरा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेसोबत बरोबरीचा हिशोब करण्यासाठी मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पहिल्या पराभवानंतर भारतीय संघ या सामन्यात कोणत्या रणनितीने मैदानात उतरते? याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना लागून आहे.


Comments
Add Comment

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून

‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?

बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर

विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची परीक्षा

नागपुरात आज न्यूझीलंडविरुद्ध पहिली टी-२० लढत ; पांड्या, बुमराह, श्रेयसवर लक्ष नागपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या

कर्णधार सूर्यकुमार यादव गाठणार ‘शतकी’ टप्पा

नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार बुधवारपासून नागपूरच्या विदर्भ

‘गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मालिका गमाविली’

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना