अमित शाहांशी बोलले एकनाथ शिंदे, महायुतीतला संघर्ष टाळण्यासाठी केली चर्चा

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही बैठक सुमारे ४५ मिनिटे चालली, या बैठकीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सखोल चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे राज्यातील काही राजकीय घडामोडींबद्दल नाराजी व्यक्त केली आणि काही तक्रारी मांडल्या.

एकनाथ शिंदे यांनी बैठक दरम्यान हे स्पष्ट केले की, काही नेत्यांची कार्यशैली आणि स्वार्थी वागणूक युतीसाठी धोका निर्माण करत आहे. युतीतल्या सदस्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप टाळावे, असे त्यांनी सुचवले. शिंदे यांच्या मते, राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उत्तम वातावरण निर्माण झाले आहे, पण काही नेत्यांच्या कृतीमुळे ते वातावरण खराब होऊ शकते, आणि त्यामुळे विरोधकांना फायदा होऊ शकतो.

शिंदे यांनी सांगितले की, "युतीच्या विजयाच्या घोडदौडीत काही अनावश्यक अडथळे निर्माण होऊ नयेत. मीडियात येणाऱ्या उलटसुलट बातम्या आणि चर्चांमुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण होतोय. त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होतो आहे." यासाठी, शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांना आणि युतीतील इतर नेत्यांना संयमाने वागण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्र्यांनीदेखील युतीतील अंतर्गत प्रवेश टाळण्याच्या बाबतीत आपला ठाम भूमिका घेतली आहे, आणि एकत्रितपणे योग्य आणि सामंजस्यपूर्ण वागणूक ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले.
Comments
Add Comment

Food poisoning from Aamras : पाकिटबंद आमरस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा

अहिल्यानगर : मुंबईत कलिंगड खाऊन विषबाधा झाल्यामुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची बातमी काही

Latur : शिवराज मोटेगावकरांना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस; अनधिकृत बांधकाम प्रकरण तापले

लातूर : लातूर ग्रामीणमधील खोपेगाव ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक ११४ मधील बांधकाम प्रकरणी विकासक Shivraj Motegaonkar यांना

Latur : लातूरच्या ‘ट्युशन एरिया’वर प्रशासनाचा मोठा घाव; अनधिकृत व्यवसाय बंद करण्याचे आदेश

लातूर : लातूरच्या शिक्षण व्यवसायावर आता प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर

दादर ते सिद्धिविनायक थेट 'बेस्ट' बससेवा

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास आता अधिक सोयीचा

Gadchiroli : गडचिरोलीत माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त करण्याच्या दिशेने पोलिसांनी आणखी एक मोठे यश संपादन केले आहे. ‘ऑपरेशन

नवी मुंबईतील एनआरआय वेटलँडमध्ये फ्लेमिंगो संरक्षणासाठी इशारा फलक, पर्यटकांसाठी कडक नियम लागू

नवी मुंबई : सीवूड्स येथील एनआरआय वेटलँड परिसरात फ्लेमिंगोंच्या संरक्षणासाठी वन विभागाच्या मॅन्ग्रोव्ह सेलने