महापालिकेच्या मालमत्ता विभागांमध्ये वर्षांनुवर्षे अधिकारी एकाच जागेवर, विकासकांची साठेलोटे असल्याचा बीआयटी चाळीतील भाडेकरुंचा आरोप

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या मालमत्ता विभागात मागील १६ वर्षांपासून अधिकारी कार्यरत असून यातील काही अधिकाऱ्यांचे तसेच निवृत्त अधिकाऱ्यांचे विकासकांशी साटेलोटे आहे. त्यामुळे विकासकांशी हातमिळवणी करणाऱ्या तथा संबंधितांच्या विरोधात लोकशाही दिनाच्या कार्यक्रमांतच बीआयटी चाळीतील भाडेकरुंनी आयुक्तांकडे हल्लाबोल करत अशा मालमत्ता विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी संबंधितांची चौकशी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.




मुंबई महापालिका आयुक्तांच्या माध्यमातून तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनानिमित्त लोकांच्या तक्रारी तसेच समस्या जाणून घेतल्या जातात. या लोकशाही दिनाच्या निमित्त उपस्थित काही नागरिकांनी एकत्रपणे हल्लाबोल करत मालमत्ता विभागातील काही अधिकारी तसेच सेवा निवृत्त अधिकारी हे विकासकांशी हातमिळवणी करत आहेत, तसेच त्यांच्या इशाऱ्यानुसारच काम करत असल्याचा आरोप केला. या विभागांत मागील १६ वर्षांपासून काही अधिकारी त्याच विभागांत आहेत. ज्यांचे विकासकांशी संबंध असल्याने त्यांची चौकशी केली जावी अशी मागणी समस्त भाडेकरुंनी माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांच्यासमवेत आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली. हे सर्व भाडेकरु बीआयटी चाळीतील असून या त्रस्त भाडेकरुंनी लोकशाही दिनाच्या निमित्त जनता दरबारमध्ये सहभागी मांडली आहे. त्यामुळे भाडेकरुंच्या तक्रारींची दखल घेत उपायुक्त (सुधार) यांना चौकशीचे आदेश दिल्याचे भाडेकरुंच्या शिष्टमंडळाचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये याबाबतचे चौकशीचे आदेश निघण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

दादर पश्चिमेची वाहतूक कोंडी सुटणार

जे. के. सावंत मार्ग जोडणारा येलवे रस्ता सेनापती बापट मार्गाला जोडणार मुंबई : एलफिन्स्टन पूल बंद करण्यात आल्याने

मुंबईत आधीपासूनच ८ ठिकाणी भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण, लसीकरण

मुलुंडमध्ये विरोध झाल्याने महापालिका अधिकारी झाले अवाक् मुंबई : महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबईत एकूण ८

भरती परीक्षेच्या निकालानंतर चार दिवसांत नियुक्तीपत्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश मुंबई (प्रतिनिधी) : शासकीय सेवांमध्ये विविध पदांच्या

वरळी विधानसभेत प्रभाग आरक्षित झाल्याने मनसेची पंचाईत

भाजप, शिवसेनेच्या वाट्याला येणार प्रत्येकी तीन प्रभाग यंदा वरळीत भाजप कमळ फुलवणार? सचिन धानजी मुंबई : दक्षिण

राज्यात अनेक जिल्ह्यांना आज थंडीचा इशारा

मुंबई : राज्यात सर्वदूर तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. गेले अनेक दिवस थंडीचा कडाका कायम असून मंगळवारी (दि. १८

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ

मुंबई - मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलिकडे