महापालिकेच्या मालमत्ता विभागांमध्ये वर्षांनुवर्षे अधिकारी एकाच जागेवर, विकासकांची साठेलोटे असल्याचा बीआयटी चाळीतील भाडेकरुंचा आरोप

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या मालमत्ता विभागात मागील १६ वर्षांपासून अधिकारी कार्यरत असून यातील काही अधिकाऱ्यांचे तसेच निवृत्त अधिकाऱ्यांचे विकासकांशी साटेलोटे आहे. त्यामुळे विकासकांशी हातमिळवणी करणाऱ्या तथा संबंधितांच्या विरोधात लोकशाही दिनाच्या कार्यक्रमांतच बीआयटी चाळीतील भाडेकरुंनी आयुक्तांकडे हल्लाबोल करत अशा मालमत्ता विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी संबंधितांची चौकशी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.




मुंबई महापालिका आयुक्तांच्या माध्यमातून तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनानिमित्त लोकांच्या तक्रारी तसेच समस्या जाणून घेतल्या जातात. या लोकशाही दिनाच्या निमित्त उपस्थित काही नागरिकांनी एकत्रपणे हल्लाबोल करत मालमत्ता विभागातील काही अधिकारी तसेच सेवा निवृत्त अधिकारी हे विकासकांशी हातमिळवणी करत आहेत, तसेच त्यांच्या इशाऱ्यानुसारच काम करत असल्याचा आरोप केला. या विभागांत मागील १६ वर्षांपासून काही अधिकारी त्याच विभागांत आहेत. ज्यांचे विकासकांशी संबंध असल्याने त्यांची चौकशी केली जावी अशी मागणी समस्त भाडेकरुंनी माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांच्यासमवेत आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली. हे सर्व भाडेकरु बीआयटी चाळीतील असून या त्रस्त भाडेकरुंनी लोकशाही दिनाच्या निमित्त जनता दरबारमध्ये सहभागी मांडली आहे. त्यामुळे भाडेकरुंच्या तक्रारींची दखल घेत उपायुक्त (सुधार) यांना चौकशीचे आदेश दिल्याचे भाडेकरुंच्या शिष्टमंडळाचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये याबाबतचे चौकशीचे आदेश निघण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Mumbai BJP President MLA Amit Satam : बीएमसीकडून सर्व आरोग्यविषयक खरेदी GeM पोर्टलद्वारे केली जाणार – मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

बीएमसी रुग्णालयांमधील उपलब्ध खाटांची रिअल-टाइम माहिती दर्शविण्यासाठी ऑनलाइन डॅशबोर्ड विकसित केला जाणार;

Middle East War : युद्धविरामाच्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत १७ टक्क्यांची घसरण

मुंबई : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धात युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय

Pod Taxi : लवकरच मुंबईत धावणार भारतातील पहिली 'पॉड टॅक्सी'

मुंबई : मुंबई शहरं हे कधीच विश्रांती घेत नाही इथे २४ तास सतत वर्दळ पाहायला मिळते असते. मुंबईत लोकांची गर्दी

Bmc News : मुंबईत ई-कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारा

महापालिकेत ठरावाच्या सूचनेद्वारे झाली मागणी मुंबई : शहरात झपाट्याने वाढणाऱ्या ई-कचऱ्याच्या समस्येवर तोडगा

Ashwini Bhide : रस्ते सिमेंटीकरण कामांना कोणतीही मुदतवाढ नाही

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या

BMC News : मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डयांच्या दुरुस्ती खर्चात ७५ टक्के घट

तब्बल २०२ कोटींवरुन खर्च आता अंदाजे ४४ कोटींवर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या