एसबीआयची लोकप्रिय एमकॅश सेवा १ डिसेंबरपासून बंद

खातेदारांना शोधावे लागतील नवीन पर्याय


नवी दिल्ली  : देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयने त्यांची लोकप्रिय एमकॅश सेवा ३० नोव्हेंबर २०२५नंतर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे ऑनलाइन एसबीआय आणि लाइट अॅपद्वारे पैशांची देवाणघेवाण आणि क्लेम करण्याची सुविधा संपेल. जे खातेदार फक्त मोबाइल नंबर किंवा ईमेलद्वारे त्वरित पैसे पाठवत होते, त्यांना आता नवीन पर्याय शोधावे लागतील. बँकेने वेबसाइटवर नोटीस जारी करून ग्राहकांना सुरक्षित डिजिटल मार्गांचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे.


 ३० नोव्हेंबर २०२५ नंतर एमकॅश सेवा पूर्णपणे बंद होईल. ऑनलाइनएसबीआय आणि योनो लाइट अॅपद्वारे पैसे पाठवणे व क्लेम करणे शक्य राहणार नाही.  एमकॅश बंद झाल्यावर यूपीआय (भीम एसबीआय पे), आयएमपीएस (२४ तास त्वरित), एनईएफटी (दिवसभर बॅच) आणि आरटीजीएस (मोठ्या रकमेसाठी) हे सुरक्षित पर्याय वापरा. ही सेवा जुनी तंत्रज्ञानावर आधारित होती आणि यूपीआयसारख्या आधुनिक पद्धतींमुळे ती अप्रासंगिक झाली. त्यामुळे एसबीआय डिजिटल रूपांतरासाठी बंद करत आहे.


एमकॅशमध्ये काय खास?


एमकॅश ही एसबीआयची खास योजना होती, ज्यात लाभार्थ्याची माहिती जोडण्याची गरज नव्हती. फक्त मोबाइल किंवा ईमेल आयडी टाकून पैसे पाठवता येत होते. पैसे घेणाऱ्याला एसएमएस किंवा ईमेलद्वारे सुरक्षित लिंक आणि ८ अंकी पासकोड मिळत असे, ज्याने तो कोणत्याही बँक खात्यात रक्कम हस्तांतरित करू शकायचा. लाइट किंवा एमकॅश अॅप (गूगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड) वापरून एमपीआयएन सेट करून लॉगिन करून क्लेम करता येत होते. भविष्यासाठी आवडीनुसार खाते सेव्हही करता येत. ही सेवा छोट्या-मोठ्या व्यवहारांसाठी
लोकप्रिय होती.


बंद होण्याचे कारण काय?


एमकॅश ही सेवा जुन्या तंत्रज्ञानावर आधारित सेवा असल्याने ती कालबाह्य झाली आहे. यूपीआयसारख्या आधुनिक पद्धतींनी त्याचे महत्त्व कमी झाले. आता बहुतेक लोक सेकंदात व्यवहार करतात, त्यामुळे एमकॅशचा वापर खूपच कमी झाला. एसबीआय डिजिटल रूपांतराच्या मोठ्या योजनेत गुंतले असून, सुरक्षित आणि वेगवान पर्यायांना प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.


ग्राहकांसाठी सल्ला


१ डिसेंबरपासून एमकॅश बंद होत असल्याने ग्राहकांना त्वरित नवीन पद्धती शिकाव्या लागणार आहेत. बँकेच्या अॅप किंवा वेबसाइटवरून तुम्हालायाचा सराव करावा लागणार आहे. यूपीआयद्वारे व्यवहार सुरक्षित राहतील आणि वेळ वाचणार आहे. दरम्यान थर्ड पार्टीला पैसे पाठवण्यासाठी हा नवा पर्याय तुमच्यासाठी उत्तम राहील. यामुळे डिजिटल बँकिंग अधिक मजबूत होईल, असे एसबीआयने म्हटलंय.


पर्यायी व्यवहार पद्धत
एमकॅश बंद झाल्यानंतर यूपीआय हा मुख्य पर्याय आहे. एसबीआयचे भीम एसबीआय पे अॅप सर्व बँक ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहे. शॉपिंग, बिल भरणे, रिचार्ज, टॅक्सी बुकिंग यासाठी हे सोयीचे आहे. यासोबतच आयएमपीएस (२४ तास त्वरित ट्रान्स्फर), एनईएफटी आणि आरटीजीएस हे सर्व सुरक्षित आणि सोपे पर्याय आहेत.

Comments
Add Comment

‘आशियामध्ये शांततेसाठी अरब राष्ट्राची भूमिका कौतुकास्पद’

नवी दिल्ली : अरब देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी

भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे संरक्षण बजेट

नवी दिल्ली : यंदाच्या बजेटमध्ये संरक्षण विभागासाठी ७.८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षणासाठी

भूतान, नेपाळ, श्रीलंका याविश्वासू मित्रांसाठी मदतीचा हात, संबंधातील कडवटपणामुळे बांगलादेशला आर्थिक झटका

नवी दिल्ली  : केंद्रातील मोदी सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना आपल्या परराष्ट्र धोरणाचे

इतर देशांच्या तुलनेत किती मोठे आहे देशाचे संरक्षण बजेट

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत बजेट सादर केले. यंदाच्या बजेटमध्ये भारताच्या

Budget 2026 : ‘विकसित भारताच्या दिशेने दमदार पाऊल’; केंद्रीय अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुंबई : देशाचा २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2026 ) सादर झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र

Budget 2026 : मच्छिमारांसाठी आनंदाची बातमी! खुल्या समुद्रातील मासेमारी आता 'करमुक्त'; निर्यातीला मिळणार मोठी गती

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात देशातील ग्रामीण