एसबीआयची लोकप्रिय एमकॅश सेवा १ डिसेंबरपासून बंद

खातेदारांना शोधावे लागतील नवीन पर्याय


नवी दिल्ली  : देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयने त्यांची लोकप्रिय एमकॅश सेवा ३० नोव्हेंबर २०२५नंतर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे ऑनलाइन एसबीआय आणि लाइट अॅपद्वारे पैशांची देवाणघेवाण आणि क्लेम करण्याची सुविधा संपेल. जे खातेदार फक्त मोबाइल नंबर किंवा ईमेलद्वारे त्वरित पैसे पाठवत होते, त्यांना आता नवीन पर्याय शोधावे लागतील. बँकेने वेबसाइटवर नोटीस जारी करून ग्राहकांना सुरक्षित डिजिटल मार्गांचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे.


 ३० नोव्हेंबर २०२५ नंतर एमकॅश सेवा पूर्णपणे बंद होईल. ऑनलाइनएसबीआय आणि योनो लाइट अॅपद्वारे पैसे पाठवणे व क्लेम करणे शक्य राहणार नाही.  एमकॅश बंद झाल्यावर यूपीआय (भीम एसबीआय पे), आयएमपीएस (२४ तास त्वरित), एनईएफटी (दिवसभर बॅच) आणि आरटीजीएस (मोठ्या रकमेसाठी) हे सुरक्षित पर्याय वापरा. ही सेवा जुनी तंत्रज्ञानावर आधारित होती आणि यूपीआयसारख्या आधुनिक पद्धतींमुळे ती अप्रासंगिक झाली. त्यामुळे एसबीआय डिजिटल रूपांतरासाठी बंद करत आहे.


एमकॅशमध्ये काय खास?


एमकॅश ही एसबीआयची खास योजना होती, ज्यात लाभार्थ्याची माहिती जोडण्याची गरज नव्हती. फक्त मोबाइल किंवा ईमेल आयडी टाकून पैसे पाठवता येत होते. पैसे घेणाऱ्याला एसएमएस किंवा ईमेलद्वारे सुरक्षित लिंक आणि ८ अंकी पासकोड मिळत असे, ज्याने तो कोणत्याही बँक खात्यात रक्कम हस्तांतरित करू शकायचा. लाइट किंवा एमकॅश अॅप (गूगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड) वापरून एमपीआयएन सेट करून लॉगिन करून क्लेम करता येत होते. भविष्यासाठी आवडीनुसार खाते सेव्हही करता येत. ही सेवा छोट्या-मोठ्या व्यवहारांसाठी
लोकप्रिय होती.


बंद होण्याचे कारण काय?


एमकॅश ही सेवा जुन्या तंत्रज्ञानावर आधारित सेवा असल्याने ती कालबाह्य झाली आहे. यूपीआयसारख्या आधुनिक पद्धतींनी त्याचे महत्त्व कमी झाले. आता बहुतेक लोक सेकंदात व्यवहार करतात, त्यामुळे एमकॅशचा वापर खूपच कमी झाला. एसबीआय डिजिटल रूपांतराच्या मोठ्या योजनेत गुंतले असून, सुरक्षित आणि वेगवान पर्यायांना प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.


ग्राहकांसाठी सल्ला


१ डिसेंबरपासून एमकॅश बंद होत असल्याने ग्राहकांना त्वरित नवीन पद्धती शिकाव्या लागणार आहेत. बँकेच्या अॅप किंवा वेबसाइटवरून तुम्हालायाचा सराव करावा लागणार आहे. यूपीआयद्वारे व्यवहार सुरक्षित राहतील आणि वेळ वाचणार आहे. दरम्यान थर्ड पार्टीला पैसे पाठवण्यासाठी हा नवा पर्याय तुमच्यासाठी उत्तम राहील. यामुळे डिजिटल बँकिंग अधिक मजबूत होईल, असे एसबीआयने म्हटलंय.


पर्यायी व्यवहार पद्धत
एमकॅश बंद झाल्यानंतर यूपीआय हा मुख्य पर्याय आहे. एसबीआयचे भीम एसबीआय पे अॅप सर्व बँक ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहे. शॉपिंग, बिल भरणे, रिचार्ज, टॅक्सी बुकिंग यासाठी हे सोयीचे आहे. यासोबतच आयएमपीएस (२४ तास त्वरित ट्रान्स्फर), एनईएफटी आणि आरटीजीएस हे सर्व सुरक्षित आणि सोपे पर्याय आहेत.

Comments
Add Comment

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शुभेंदू अधिकारी

बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय

पाटणा : बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. विधानसभेनंतर

विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच पश्चिम बंगालमध्ये अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

कोलकाता : पश्चिम बंगालसह देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा रविवार १५ मार्च रोजी निवडणूक

राज्यसभेसाठी उमेदवार कसे निवडले जातात? एका जागेसाठी किती मते आवश्यक आहेत?, समजून घ्या.

नवी दिल्ली: संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेच्या ३७ जागा रिक्त आहेत. या ३७ जागांसाठी मतदान होणार होते.

ऑस्करच्या रेड कार्पेटवर ईशा अंबानीच्या ग्लॅमरस लूकने हॉलिवूड स्टार्स पडल्या फिक्या

मुंबई: ९८ व्या ॲकॅडमी पुरस्कार सोहळा (Oscars 2026) लॉस एंजेलिस इथल्या 'डॉल्बी थिएटर'मध्ये मोठ्या दिमाखात पार पडला.

ओडिशात रुग्णालयाच्या ICU ला आग, एवढ्या रुग्णांचा मृत्यू

कटक : ओडिशातील कटकच्या सरकारी एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये सोमवारी पहाटे आग लागली. रुग्णालयाच्या आयसीयूला आग लागली.