केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. या मैदानावर प्रथमच कसोटी क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोलकात्यातील निराशाजनक पराभवानंतर मालिकेत पुनरागमन करण्याचा दबाव भारतीय संघावर आहे, तर पहिल्या विजयामुळे आफ्रिकन खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे.


दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फिरकीपटू केशव महाराज याच्या सलग तीन विकेट्सवरून उद्भवलेल्या “नॉन-हॅटट्रिक” चर्चेला जोर आला आहे. कोलकाता कसोटीत महाराजने भारताचे शेवटचे दोन फलंदाज अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांना दोन सलग चेंडूंवर बाद केले. त्यामुळे गुवाहाटीत तो गोलंदाजीसाठी येताच पहिल्याच चेंडूवर जर त्यांनी विकेट घेतली, तर त्याच्या तीन चेंडूंवर तीन विकेट्स पूर्ण होतील. मात्र, हे तांत्रिकदृष्ट्या हॅटट्रिक मानले जाणार नाही, कारण नियमांनुसार एखाद्या गोलंदाजाने एकाच सामन्यात सलग तीन चेंडूंवर विकेट घेतल्यावरच हॅटट्रिक मानली जाते. पुढील सामन्यात मिळालेली तिसरी विकेट त्या नियमात बसत नाही. यापूर्वी २०२१ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध महाराजने टेस्ट हॅटट्रिक नोंदवली आहे.


बारसापारा स्टेडियम कसोटी क्रिकेटसाठी नवे असल्याने येथील खेळपट्टीचा प्रभाव कसा असेल याबाबत मोठी उत्सुकता आहे. विकेट फलंदाजांसाठी अनुकूल राहील की स्पिन आणि सीम दोन्ही गोलंदाजांना मदत मिळेल? याकडे सर्वांचे लक्ष असेल. पहिल्याच तासात पिच सामन्याची दिशा ठरवू शकेल. मालिकेत १–० ने मागे असलेल्या भारतासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे, तर दक्षिण आफ्रिका आघाडी कायम ठेवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. कसोटी क्रिकेटच्या गुवाहाटीतील पहिल्या अध्यायाचा निकाल काय येणार, याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा खिळल्या आहेत.

Comments
Add Comment

न्यूझीलंडविरुद्ध वनडेतून ३ स्टार खेळाडूंचा पत्ता कट ? दिग्गजांचं कमबॅक ?

मुंबई : जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट

भारतीय महिला हॉकीला सापडला नवा ‘हिरा’

प्रशिक्षिका हेलिना मेरीकडून बन्सुरी सोलंकीचे कौतुक नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकीच्या भविष्यातील सुरक्षित

श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय

तिरुवनंतपुरम : श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय झाला. या

स्मृती मानधनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमी झेप

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा