केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. या मैदानावर प्रथमच कसोटी क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोलकात्यातील निराशाजनक पराभवानंतर मालिकेत पुनरागमन करण्याचा दबाव भारतीय संघावर आहे, तर पहिल्या विजयामुळे आफ्रिकन खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे.


दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फिरकीपटू केशव महाराज याच्या सलग तीन विकेट्सवरून उद्भवलेल्या “नॉन-हॅटट्रिक” चर्चेला जोर आला आहे. कोलकाता कसोटीत महाराजने भारताचे शेवटचे दोन फलंदाज अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांना दोन सलग चेंडूंवर बाद केले. त्यामुळे गुवाहाटीत तो गोलंदाजीसाठी येताच पहिल्याच चेंडूवर जर त्यांनी विकेट घेतली, तर त्याच्या तीन चेंडूंवर तीन विकेट्स पूर्ण होतील. मात्र, हे तांत्रिकदृष्ट्या हॅटट्रिक मानले जाणार नाही, कारण नियमांनुसार एखाद्या गोलंदाजाने एकाच सामन्यात सलग तीन चेंडूंवर विकेट घेतल्यावरच हॅटट्रिक मानली जाते. पुढील सामन्यात मिळालेली तिसरी विकेट त्या नियमात बसत नाही. यापूर्वी २०२१ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध महाराजने टेस्ट हॅटट्रिक नोंदवली आहे.


बारसापारा स्टेडियम कसोटी क्रिकेटसाठी नवे असल्याने येथील खेळपट्टीचा प्रभाव कसा असेल याबाबत मोठी उत्सुकता आहे. विकेट फलंदाजांसाठी अनुकूल राहील की स्पिन आणि सीम दोन्ही गोलंदाजांना मदत मिळेल? याकडे सर्वांचे लक्ष असेल. पहिल्याच तासात पिच सामन्याची दिशा ठरवू शकेल. मालिकेत १–० ने मागे असलेल्या भारतासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे, तर दक्षिण आफ्रिका आघाडी कायम ठेवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. कसोटी क्रिकेटच्या गुवाहाटीतील पहिल्या अध्यायाचा निकाल काय येणार, याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा खिळल्या आहेत.

Comments
Add Comment

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स

कोलकाता कसोटी तीन दिवसांत संपणार ?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ईडन