राज्यात अनेक जिल्ह्यांना आज थंडीचा इशारा

मुंबई : राज्यात सर्वदूर तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. गेले अनेक दिवस थंडीचा कडाका कायम असून मंगळवारी (दि. १८ नोव्हेंबर) राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. धुळे येथे ६.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद मंगळवारी झाली. सांताक्रूझ कोकणातील अलिबाग, रत्नागिरी, डहाणू भागातही थंडी वाढली आहे.


राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढले आहेत. त्यामुळे कोरड्या वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होताना दिसून येत आहे. परिणामी राज्यात पुढील दोन दिवस थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. विशेषत° मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमानात घसरण होणार असून थंडी वाढणार आहे. राज्यातील जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड , हिंगोली या जिल्ह्यात मंगळवारी थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.


अनेक जिल्ह्यांमधील कमाल आणि किमान तापामानात वेगाने घट होत आहे. उन्हाळ्यात प्रचंड तापणाऱ्या विदर्भात देखील किमान तापमान यवतमाळ येथे ९.६ अंश सेल्सिअस तर, गोंदिया येथे १० अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. गेल्या दोन दिवसांत राज्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद धुळे तसेच जेऊर येथे ८ अंश सेल्सिअस इतकी झाली आहे.


नोव्हेंबरचा दुसरा आणि तिसरा आठवडा चांगलाच गारठवणारा ठरला. त्यामुळे ग्रामीण भागातच नाही तर शहरातही रात्रीच्या वेळी रस्त्यांवर ठिकठिकाणी मजूर, कष्टकरी थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार घेत आहेत. आतापर्यंत रात्री ते पहाटेपर्यंत जाणवणारी थंडी आता दिवसाही जाणवत आहे.


राज्यात पुढील दोन दिवस थंडीची तीव्रता अधिक जाणवणार आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्यांनी थंडीपासून वाचण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. राज्यात नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपल्यानंतर अचानक थंडीत वाढ झाली. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा जोर वाढला असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

Comments
Add Comment

ठाणे आणि डोंबिवली स्थानकाच्या विस्तारासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेचा मुंबई विभाग हा १५ डब्यांच्या गाड्या सामावून घेण्यासाठी ठाणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म

विक्रोळी पूर्व - पश्चिम उड्डाणपुलावर तेल गळती, दुचाकीस्वार घसरून पडले; महापौरांनी केली मदत

महापौरांनी ताफा थांबवून यंत्रणांना केल्या सूचना मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विक्रोळी पूर्व - पश्चिम जोडणाऱ्या

मध्य रेल्वेचा ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेचा मुंबई विभाग विविध अभियांत्रिकी आणि देखभाल-दुरुस्तीची कामं करण्यासाठी रविवार २२ मार्च २०२६

मुंबईतील १३ नवीन मराठी शाळांना अनुदान मंजूर

प्रथमच अनुदान मंजूर झालेल्या २२ शाळांमध्ये १३ मराठी माध्यमांच्या शाळांचा समावेश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

बोरिवलीत तीन दिवसांचा मिलेट महोत्सव

मुंबई : राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी ही प्रमुख तृणधान्ये (मिलेट्स) आहेत. कमी पाण्यावर येणारी तसेच पर्यावरणपूरक

बाजार समित्यांचे आधुनिकीकरण व ‘मॅग्नेट’ प्रकल्पासाठी एडीबी सहकार्य करणार

मुंबई : महाराष्ट्रातील कृषी बाजार व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी आशियाई विकास बँकेचे (एडीबी)