बिहारमध्ये नव्या सरकारच्या हालचालींना वेग; २२ नोव्हेंबरपूर्वी शपथविधीची शक्यता

पटना : बिहारमध्ये नवं सरकार येत्या २२ नोव्हेंबरपूर्वी स्थापन होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री आणि एलजेपीचे (रामविलास) प्रमुख चिराग पासवान यांनी दिली. त्यांनी सांगितलं की, विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला मिळालेल्या विजयामुळे सरकार स्थापनेची हालचाल वेगाने सुरू झाली आहे.


बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२  नोव्हेंबरला संपत असल्याने, त्यापूर्वीच प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चर्चा सुरू आहे. घटक पक्षांमध्येही मंत्रिमंडळ वाटप आणि पुढील धोरणांवर विचारमंथन सुरू असल्याचं समजतं.


विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएने अभूतपूर्व यश मिळवत २४३ पैकी २०२ जागांवर विजय मिळवला. भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष झाला तर जेडीयूने ८५ जागा जिंकल्या. लोक जनशक्ती पक्षाने १९, हिंदुस्थानी अवाम मोर्चाने पाच आणि राष्ट्रीय लोक मोर्चाने चार जागांवर विजय मिळवला.


महागठबंधनमधील आरजेडीने २५, काँग्रेसने सहा, सीपीआयएमएलएलने दोन, सीपीआयएम आणि आयआयपीने प्रत्येकी एक जागा जिंकली.


बीएसपीने एक तर एमआयएमने ५ जागांवर विजय मिळवला. नव्या कॅबिनेटमध्ये भाजपचं प्रतिनिधित्व वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदासाठी नितीशकुमार यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. नव्या मंत्रिमंडळात जेडीयूचे १४ आणि भाजपचे १६ मंत्री असतील तसेच भाजपकडे अनेक महत्त्वाची खाती असतील, असे समजते.

Comments
Add Comment

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने