बिहारमध्ये नव्या सरकारच्या हालचालींना वेग; २२ नोव्हेंबरपूर्वी शपथविधीची शक्यता

पटना : बिहारमध्ये नवं सरकार येत्या २२ नोव्हेंबरपूर्वी स्थापन होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री आणि एलजेपीचे (रामविलास) प्रमुख चिराग पासवान यांनी दिली. त्यांनी सांगितलं की, विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला मिळालेल्या विजयामुळे सरकार स्थापनेची हालचाल वेगाने सुरू झाली आहे.


बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२  नोव्हेंबरला संपत असल्याने, त्यापूर्वीच प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चर्चा सुरू आहे. घटक पक्षांमध्येही मंत्रिमंडळ वाटप आणि पुढील धोरणांवर विचारमंथन सुरू असल्याचं समजतं.


विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएने अभूतपूर्व यश मिळवत २४३ पैकी २०२ जागांवर विजय मिळवला. भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष झाला तर जेडीयूने ८५ जागा जिंकल्या. लोक जनशक्ती पक्षाने १९, हिंदुस्थानी अवाम मोर्चाने पाच आणि राष्ट्रीय लोक मोर्चाने चार जागांवर विजय मिळवला.


महागठबंधनमधील आरजेडीने २५, काँग्रेसने सहा, सीपीआयएमएलएलने दोन, सीपीआयएम आणि आयआयपीने प्रत्येकी एक जागा जिंकली.


बीएसपीने एक तर एमआयएमने ५ जागांवर विजय मिळवला. नव्या कॅबिनेटमध्ये भाजपचं प्रतिनिधित्व वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदासाठी नितीशकुमार यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. नव्या मंत्रिमंडळात जेडीयूचे १४ आणि भाजपचे १६ मंत्री असतील तसेच भाजपकडे अनेक महत्त्वाची खाती असतील, असे समजते.

Comments
Add Comment

इंडिया AI इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये 'कुंभदूत' एजेंटिक AI संकल्पनेचे सादरीकरण

सिंहस्थ २०२७ पूर्वी टप्प्याटप्प्याने तंत्रज्ञानाचा उपयोग नवी दिल्ली / नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आता गुपचूप लग्न शक्य नाही? गुजरातमध्ये विवाह नोंदणीसाठी नवा प्रस्ताव

अहमदाबाद : गुजरातमध्ये विवाहाच्या नोंदणीत काही बदल करण्यात आले आहेत. सध्याच्या नियमांनुसार, विवाहाची नोंदणी

VIRAL VIDEO : सावधान! देवभूमीचा ट्रिप प्लॅन करताय? हा थरारक व्हिडिओ पाहून तुमचेही पाय लटपटतील!

देहराडून : उत्तराखंडमधील प्रसिद्ध सिद्धपीठ माता धारी देवी मंदिराजवळ नदीपात्रात दोन बोटींची समोरासमोर भीषण धडक

India AI Impact Summit 2026 : एआय समिटमध्ये महाराष्ट्राचा डंका! कृषी विकासासाठी 'महाॲग्री एआय' ठरणार गेमचेंजर - मुख्यमंत्री फडणवीस

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे

Nitesh Rane : नवी दिल्लीतील ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये मंत्री नितेश राणे यांचा सहभाग

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'डिजिटल इंडिया'ला आता कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) जोड देऊन

AI Authenticity Label : एआय-निर्मित डिजिटल कंटेंटसाठी ‘ऑथेंटिसिटी लेबल’ आजपासून अनिवार्य

केंद्र सरकारने एआयच्या मदतीने तयार होणाऱ्या डिजिटल कंटेंटबाबत कडक मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. १०