विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक; मंगल नांगरे पाटील यांचे निधन

मुंबई : महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री मंगल नारायण नांगरे पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सालीतील शिराळा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली.


देशमुख यांनी आपल्या पोस्टमध्ये मंगल नांगरे पाटील यांच्या शांत स्वभावाचे, त्यांच्याकडून मिळालेल्या संस्कारांचे आणि त्यांच्या निस्वार्थ मायाळूपणाचे स्मरण केले. त्यांनी लिहिले की, आज मन जड झाले आहे; विश्वास नांगरे पाटील आणि विकास नांगरे पाटील यांच्या मातोश्रींच्या निधनाने एक भावनिक पोकळी निर्माण झाली आहे.


सत्यजित देशमुख यांनी पुढे नमूद केले की, सकाळपासून मन अस्वस्थ होतं. कोकरूडमध्ये जाऊन काकींना भेटण्याचा योग आला, मात्र त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती. त्यांना भेटताना मला माझ्या आईची आठवण झाली. शिराळ्याला पोहोचताच त्यांच्या निधनाची बातमी कळली आणि मन सुन्न झाले. काकींचा शांत स्वभाव, त्यांची माया आणि संस्कारांची शिदोरी हे सर्व आयुष्यभर स्मरणात राहील.


देशमुख यांनी ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि या कठीण प्रसंगातून संपूर्ण कुटुंबाला धीर, आधार आणि सामर्थ्य मिळो, अशी प्रार्थना व्यक्त केली.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला