विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक; मंगल नांगरे पाटील यांचे निधन

मुंबई : महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री मंगल नारायण नांगरे पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सालीतील शिराळा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली.


देशमुख यांनी आपल्या पोस्टमध्ये मंगल नांगरे पाटील यांच्या शांत स्वभावाचे, त्यांच्याकडून मिळालेल्या संस्कारांचे आणि त्यांच्या निस्वार्थ मायाळूपणाचे स्मरण केले. त्यांनी लिहिले की, आज मन जड झाले आहे; विश्वास नांगरे पाटील आणि विकास नांगरे पाटील यांच्या मातोश्रींच्या निधनाने एक भावनिक पोकळी निर्माण झाली आहे.


सत्यजित देशमुख यांनी पुढे नमूद केले की, सकाळपासून मन अस्वस्थ होतं. कोकरूडमध्ये जाऊन काकींना भेटण्याचा योग आला, मात्र त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती. त्यांना भेटताना मला माझ्या आईची आठवण झाली. शिराळ्याला पोहोचताच त्यांच्या निधनाची बातमी कळली आणि मन सुन्न झाले. काकींचा शांत स्वभाव, त्यांची माया आणि संस्कारांची शिदोरी हे सर्व आयुष्यभर स्मरणात राहील.


देशमुख यांनी ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि या कठीण प्रसंगातून संपूर्ण कुटुंबाला धीर, आधार आणि सामर्थ्य मिळो, अशी प्रार्थना व्यक्त केली.

Comments
Add Comment

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही