आळंदीत भाविकांची गर्दी; ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीजवळ भक्तिमय वातावरण

आळंदी : संत परंपरेचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या आळंदीत आज पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी उसळली. ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरून आलेले वारकरी लांबलचक रांगेत उभे राहत आहेत. समाधी परिसरात अखंड कीर्तन-भजनाचा नाद घुमत असून संपूर्ण वातावरण भक्तिभावाने न्हाऊन निघाले आहे.


परंपरेनुसार इ.स. 1296 साली ज्ञानेश्वर महाराजांनी समाधीस्वरूपात प्रवेश केल, ज्याला संजीवन समाधी म्हणून ओळखले जाते. संत परंपरेतील हा टप्पा अत्यंत पवित्र मानला जातो. आज अलंकापुरीतील समाधीस्थळ पहाटेपासूनच भाविकांसाठी खुले करण्यात आले असून दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे.


गर्दीचा अंदाज ओळखत आळंदी नगरपालिका आणि मंदिर समितीने परिसरातील सुरक्षेबरोबरच स्वच्छतेची व्यवस्था अधिक मजबूत केली आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा, रांगेचे व्यवस्थापन आणि प्राथमिक वैद्यकीय सेवा याचीही खास तयारी करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

महापुरुषांची नावे संक्षिप्त घेणाऱ्यांवर कारवाई करा; शिवसेना नगरसेवकांची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या वतीने जोगेश्वरी रुग्णालयाचे नामकरण हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब

महापालिका शाळांमधील न्युट्रीबार वादात; मध्यान्ह भोजनात इस्कॉनच्या खिचडीची झाली मागणी

मुंबई: मुंबई महापालिका शाळांमधील मुलांना पोषक आहारांतर्गत देण्यात येणाऱ्या न्युट्रीबारच्या वाटपाबाबत आता

मुंबईतील टँकर माफियांची लॉबी नष्ट करा; महापालिका सभागृहात सर्वच नगरसेवकांची एकमुखी मागणी

मुंबई: मुंबईत सध्या पाण्याची काही भागांमध्ये समस्या निर्माण झाली असून ही टंचाई फक्त आणि फक्त टँकर माफियांसाठी

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र