'भाजप काँग्रेसचा सर्वाधिक आमदारांचा विक्रम मोडणार'

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर, देशभरात भाजपच्या आमदारांची संख्या वाढली आहे. भाजपला मिळालेल्या आमदारांची ही आतापर्यंतची मोठी संख्या आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये विधानसभेच्या जागा जिंकून भाजपने आपले स्थान सातत्याने मजबूत केले आहे. पक्षाचे नेते अमित मालवीय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये भाजपच्या चढत्या आलेखाबद्दल माहिती दिली. पुढील दोन वर्षांत भाजपच्या देशभरातील आमदारांची एकूण संख्या १८०० च्या पुढे जाण्याची शक्यता आहे, असा विश्वास अमित मालवीय यांनी व्यक्त केला.

देशात इंदिरा गांधींची लाट होती त्या काळात १९८५ मध्ये काँग्रेसने २०१८ आमदारांचा टप्पा गाठला होता. ही देशातल्या काँग्रेस आमदारांची सर्वोच्च संख्या होती. हा विक्रम एक दिवस भारतीय जनता पार्टी नक्की मोडीत काढेल, असाही विश्वास अमित मालवीय यांनी व्यक्त केला.



 

भाजप आमदारांची संख्या कशी वाढली ?

भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या संख्येत २०१४ पासून वाढ होत आहे. या संदर्भातली आकडेवारी भाजपच्यावतीने जाहीर करण्यात आली आहे. भाजप आमदारांची संख्या २०१४ मध्ये १,०३५ होती. नंतर २०१५ मध्ये ९९७, २०१६ मध्ये १,०५३ आणि २०१७ मध्ये १,३६५ अशी लक्षणीय वाढ झाली. त्यानंतर २०१८ मध्ये ही संख्या १,१८४, २०१९ मध्ये १,१६० आणि २०२० मध्ये १,२०७ झाली. यानंतर २०२१ मध्ये १,२७८ आमदार, २०२२ मध्ये १,२८९, २०२३ मध्ये १,४४१, २०२४ मध्ये १,५८८ आणि आता २०२५ मध्ये १,६५४ आमदारांसह वाढीचा कल कायम आहे
Comments
Add Comment

बीएमसी शाळा खासगीकरण वादाने अधिवेशन तापले; अस्लम शेख–लोढा आमनेसामने

नागपूर : मालवणीतील बीएमसी टाऊनशिप शाळेच्या मुद्द्यावरून मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख आणि मुंबई उपनगरचे

बारामती, इंदापूर पुण्यात ईडीची छापेमारी १०८ कोटींच्या डेअरी घोटाळ्याप्रकरणी नियामकांची मोठी कारवाई

पुणे: निष्पाप गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबाबत व १०८.३० कोटी रुपयांच्या डेअरी घोटाळ्याप्रकरणी बारामती व इंदापूर

मंदिरांच्या जमिनी वाचवण्यासाठी विशेष कायदा करा!

नागपूर : भूमाफियांनी राज्यातील देवस्थानांच्या शेकडो एकर शेतजमिनी हडपल्याने त्यांच्या संरक्षणासाठी गुजरात आणि

छोटी राज्ये चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतात! - वेगळ्या विदर्भाबाबतच्या प्रश्नावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे उत्तर

नागपूर : "छोटी राज्ये ही अधिक चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतात. त्यामुळे याबाबत भाजपचा नेहमीच पुढाकार राहिला

IndiGo Airlines Crisis: सरकार अ‍ॅक्शन मोडवर ! डीजीसीएकडून सीईओ पीटर इलिबर्स यांना उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स

मुंबई: इंडिगो एअरलाईन्स (Interglobe Aviation Limited) कंपनीचे सीईओ पीटर इलिबर्स यांना सरकारने चौकशीसाठी तत्काळ समन्स बजावले आहे.

संगमनेर येथील 'पोकळी हिस्से' नोंदीचा प्रश्न मार्गी

नागपूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील इंदिरा नगर भागात सर्वे