'भाजप काँग्रेसचा सर्वाधिक आमदारांचा विक्रम मोडणार'

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर, देशभरात भाजपच्या आमदारांची संख्या वाढली आहे. भाजपला मिळालेल्या आमदारांची ही आतापर्यंतची मोठी संख्या आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये विधानसभेच्या जागा जिंकून भाजपने आपले स्थान सातत्याने मजबूत केले आहे. पक्षाचे नेते अमित मालवीय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये भाजपच्या चढत्या आलेखाबद्दल माहिती दिली. पुढील दोन वर्षांत भाजपच्या देशभरातील आमदारांची एकूण संख्या १८०० च्या पुढे जाण्याची शक्यता आहे, असा विश्वास अमित मालवीय यांनी व्यक्त केला.

देशात इंदिरा गांधींची लाट होती त्या काळात १९८५ मध्ये काँग्रेसने २०१८ आमदारांचा टप्पा गाठला होता. ही देशातल्या काँग्रेस आमदारांची सर्वोच्च संख्या होती. हा विक्रम एक दिवस भारतीय जनता पार्टी नक्की मोडीत काढेल, असाही विश्वास अमित मालवीय यांनी व्यक्त केला.



 

भाजप आमदारांची संख्या कशी वाढली ?

भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या संख्येत २०१४ पासून वाढ होत आहे. या संदर्भातली आकडेवारी भाजपच्यावतीने जाहीर करण्यात आली आहे. भाजप आमदारांची संख्या २०१४ मध्ये १,०३५ होती. नंतर २०१५ मध्ये ९९७, २०१६ मध्ये १,०५३ आणि २०१७ मध्ये १,३६५ अशी लक्षणीय वाढ झाली. त्यानंतर २०१८ मध्ये ही संख्या १,१८४, २०१९ मध्ये १,१६० आणि २०२० मध्ये १,२०७ झाली. यानंतर २०२१ मध्ये १,२७८ आमदार, २०२२ मध्ये १,२८९, २०२३ मध्ये १,४४१, २०२४ मध्ये १,५८८ आणि आता २०२५ मध्ये १,६५४ आमदारांसह वाढीचा कल कायम आहे
Comments
Add Comment

जन्म नोंदणी आणि प्रमाणपत्र विषयक कार्यवाहीचा महापौर घेणार दर महिन्याला आढावा

मुंबई: जन्म नोंदणी करून त्याचे प्रमाणपत्र देणे, हा फक्त शासकीय दस्तावेज देण्यापुरता मर्यादित विषय नसून त्याचाच

उपमहापौरांची कुपर रुग्णालयाला भेट; स्वच्छता आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर दिले कारवाईचे आदेश

मुंबई: मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अवघ्या पाच दिवसांपूर्वी विलेपार्ले येथील डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय येथे

नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार कठोर कायदा; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या

Oil Crisis 2026: ३२ देशांचा महत्त्वपूर्ण निर्णय; तेल संकट दूर...

मुंबई: मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. ही

विजय सूर्यवंशी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी

मुंबई : राज्य सरकारने बुधवारी प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले असून, तीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे

'अकारी पडीत जमीनी शेतकऱ्यांना मिळाव्यात हीच माझी भूमिका'

मुंबई: काॅग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे आरोप अतिशय बिनबुडाचे असून,त्यांनी उपस्थित केलेल्या माहीतीशी