पालघरमध्ये पक्ष्यांच्या प्रजाती होत आहेत दुर्मीळ

मोखाडा : सूर्याची किरण पडताच पक्षाच्या किलबिलाटाने रमणीय होणारी पहाट आता हरवत चालली आहे. गवताळ डोंगराळ भागात आढळणाऱ्या पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. वाढते शहरीकरण नवनवीन प्रकल्पांच्या नावाखाली होणारी बेसुमार वृक्षतोड, वणवे, शिकार यामुळे मागील काही वर्षांपूर्वी सहज आढळून येणारे पक्षी आता दिसेनासे झाले आहेत.


ठाणे पालघर जिल्ह्यात अंदाजे २०० ते २७४ प्रजाती पक्ष्यांच्या आढळतात यामधील भारतीय पिटा, पाईड हेरियर, वनपिंगळा, हरियाल, युरेशियन ग्रीफन गिधाड, निलपंख या पक्ष्यांच्या प्रजाती दुर्मीळ झाल्या असून त्या संवर्धनासाठी उपाययोजना करण्याची मागणी पक्षी सप्ताह निमित्ताने पक्षीप्रेमीकडून केली जात आहे.


तानसा अभयारण्य हे ठाणे पालघर जिल्ह्याचा अविभाज्य भाग असून यामध्ये रेडिंटेड बुलबुल, एशोप्रिनिया, टेलर बर्ड, बी इटर, क्लिप शॅलो, वेगटेल, ससाने, गरुड, रान चिमण्या, नीलपोपट, नीलपंख महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी हरियाल असे विविध प्रकारचे पक्षी तथा अनेक घुबडांच्या जाती यामध्ये ठिपके वाला पिंगळा, मोल्टेड घुबड,मासेमार घुबड, ईगल घुबड असे निशाचर पक्षीही आढळतात.या सर्व पक्षांचे संवर्धन होणे आवश्यक असून याबाबत उपाययोजना गरजेच्या आहेत.

Comments
Add Comment

BSNL युजर्ससाठी खुशखबर; नेटवर्क नसले तरी करता येतील कॉल्स आणि मेसेज

मुंबई : मोबाईल नेटवर्क नसले तरी आता कॉल आणि मेसेज करता येणार आहेत. होय तुम्ही बरोबर वाचताय. नवीन वर्षाच्या

हेमंत ढोमेच्या सिनेमाची धडाकेबाज कमाई ; लवकरच पार करणार १ कोटींचा आकडा

KJVMM Box Office: वर्षाच्या पहिल्याच दिवशी मराठी शाळेतल्या पोरांनी बॉक्स ऑफिस गाजवलं मुंबई: महाराष्ट्रात आज 'मराठी भाषा'

भारतच नव्हे, लंडनच्या ट्रेनमध्येही विकले जातात समोसे..

लंडन : सध्या सोशल मीडियावर अमेरिकेतील ट्रेनमधील एक फोटो व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक भारतीय व्यक्ती

दीपिकाला सोडून आता संदीप रेड्डी वांगांच्या ‘स्पिरिट’मध्ये ‘नॅशनल क्रश’ ची एंट्री

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या संदीप रेड्डी वांगा यांच्या आगामी ‘स्पिरिट’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

जेवल्यानंतर एक ग्लास ताक पिण्याने आरोग्याला होतात अनेक फायदे

ताक हे आरोग्यासाठी गुणकारी असून पूर्वीपासूनच आहारामध्ये ताकाचा समावेश केला जातो. ताक आणि दही हे दोन्हीही पदार्थ

प्लंबिंगपासून ते दिग्दर्शनापर्यंतचा प्रवास, ‘रुबाब’मधून मराठी सिनेसृष्टीत नव्या दिग्दर्शकाची एन्ट्री

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत नवनव्या विषयांसोबतच स्वतःच्या संघर्षातून घडलेले नवे दिग्दर्शक आपली ओळख निर्माण