पालघरमध्ये पक्ष्यांच्या प्रजाती होत आहेत दुर्मीळ

मोखाडा : सूर्याची किरण पडताच पक्षाच्या किलबिलाटाने रमणीय होणारी पहाट आता हरवत चालली आहे. गवताळ डोंगराळ भागात आढळणाऱ्या पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. वाढते शहरीकरण नवनवीन प्रकल्पांच्या नावाखाली होणारी बेसुमार वृक्षतोड, वणवे, शिकार यामुळे मागील काही वर्षांपूर्वी सहज आढळून येणारे पक्षी आता दिसेनासे झाले आहेत.


ठाणे पालघर जिल्ह्यात अंदाजे २०० ते २७४ प्रजाती पक्ष्यांच्या आढळतात यामधील भारतीय पिटा, पाईड हेरियर, वनपिंगळा, हरियाल, युरेशियन ग्रीफन गिधाड, निलपंख या पक्ष्यांच्या प्रजाती दुर्मीळ झाल्या असून त्या संवर्धनासाठी उपाययोजना करण्याची मागणी पक्षी सप्ताह निमित्ताने पक्षीप्रेमीकडून केली जात आहे.


तानसा अभयारण्य हे ठाणे पालघर जिल्ह्याचा अविभाज्य भाग असून यामध्ये रेडिंटेड बुलबुल, एशोप्रिनिया, टेलर बर्ड, बी इटर, क्लिप शॅलो, वेगटेल, ससाने, गरुड, रान चिमण्या, नीलपोपट, नीलपंख महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी हरियाल असे विविध प्रकारचे पक्षी तथा अनेक घुबडांच्या जाती यामध्ये ठिपके वाला पिंगळा, मोल्टेड घुबड,मासेमार घुबड, ईगल घुबड असे निशाचर पक्षीही आढळतात.या सर्व पक्षांचे संवर्धन होणे आवश्यक असून याबाबत उपाययोजना गरजेच्या आहेत.

Comments
Add Comment

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

माकडांची मस्ती बेतली तरुणीच्या जीवावर; राजगडावर घडली भयंकर घटना

पुणे : राजगड किल्ला सर करण्यासाठी गेलेल्या मुंबईच्या तरुणीच्या डोक्यात दगड पडल्याने तरुणी जखमी झाली आहे.

विक्रोळीच्या बुद्ध विहारातून भगवान गौतमांची चोरीला गेलेली मूर्ती मिळाली, सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांनी केला चोराचा पर्दाफाश

मुंबई: विक्रोळी येथील बुध्द विहारातून भगवान गौतम बुध्दांची पुरातन मूर्ती चोरणाऱ्यांना विक्रोळी पोलिसांनी

विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक; मंगल नांगरे पाटील यांचे निधन

मुंबई : महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री

बॉलीवूडचे खलनायक प्रेम चोप्रांची तब्येत स्थिर, लीलावती रुग्णालयातून दिला डिस्चार्ज

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते प्रेम चोप्रा यांची तब्येत बरी नव्हती. वयानुसार

मुलांच्या तिकीट बुकिंगच्या नियमात बदल ५-१२ वर्षे वयादरम्यान तिकिटाचे धोरण ठरणार

मुंबई : भारतीय रेल्वेच्या २०२५ च्या बाल तिकीट धोरणानुसार ५ वर्षांखालील मुले स्वतंत्र बर्थ किंवा सीट न घेता