गांधीनगर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास आधुनिक सुविधांनी होणार सज्ज

सीमा पवार गांधीनगर : जयपूरमधील गांधीनगर रेल्वेस्थानक लवकरच आधुनिक सुविधांनी सज्ज होणार आहे.‘अमृत भारत स्टेशन योजने’अंतर्गत या स्थानकाचा पुनर्विकास केला जात आहे, हा प्रकल्प जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती गांधीनगर जयपूर रेल्वे विभागाकडून देण्यात आली. आधुनिक दर्जाच्या सुविधांसह रेल्वे स्थानकाचा पुर्नविकास अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पासाठी २१२.४८ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. स्थानकांवरील दोन्ही इमारतींना जोडणारा ७२ मीटर रुंद आणि दोन हजार ७०० चौ.मी. क्षेत्रफळात हा एक मार्ग तयार करण्यात आला आहे. या एअर कॉनकेअर्समध्ये प्रवाशांसाठी संपूर्ण आधुनिक सुविधा असणार आहे.


‘अमृत भारत स्टेशन योजने’ अंतर्गत या स्थानकाचा पुनर्विकास केला जात आहे, ज्यामध्ये प्रवाशांसाठी लिफ्ट, एस्केलेटर, दिव्यांगजन-अनुकूल सुविधा, ग्रीन बिल्डिंग वैशिष्ट्ये आणि सुरक्षितता तपासणी यांसारख्या सुविधांचा समावेश असेल. यामध्ये बॅगेज स्कॅनर आणि मेटल डिटेक्टर यांसारख्या सुरक्षा उपकरणांचा समावेश असेल. स्थानकावर मॉड्यूलर शौचालये, प्रतीक्षा कक्ष आणि शॉपिंग मॉल, कॅफेटेरिया गेम झोन यांसारख्या सुविधा असेल. प्रवाशांच्या सोयीसाठी३० लिफ्ट आणि १८ एस्केलेटर बसवण्याची योजना आहे. दिव्यांगांना सहज प्रवास करता यावा यासाठी विशेष सुविधा पुरवल्या जातील.हा विभाग प्रवाशांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला असणार आहे. प्रकल्पाचे जानेवारीपर्यंत लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती जयपूर रेल्वे विभागाकडून देण्यात आली.


हरित इमारत (ग्रीन बिल्डिंग) वैशिष्ट्ये


स्थानकाचा पुनर्विकास प्रकल्पात ऊर्जेचा वापर कमी करण्यासाठी ग्रीन बिल्डिंग वैशिष्ट्ये समाविष्ट केली जातील, ज्यात कचरा व्यवस्थापन आणि पावसाच्या पाण्याची साठवणूक यांचा समावेश आहे. या पुनर्विकासात पर्यावरणास अनुकूल अशा टिकाऊपणावर लक्ष केंद्रित केले जाईल.

Comments
Add Comment

Dadar-Ratnagiri passenger : दादर–रत्नागिरी पॅसेंजर रेल पुन्हा दादर स्थानकापर्यंत करा; खासदार रविंद्र वायकर यांची मागणी

- शक्य असल्यास ही रेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत विस्तारित करा - रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

Bihar Stampede: बिहारच्या शीतला मंदिरातील चेंगराचेंगरी प्रकरणी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

नालंदा: बिहारमधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.

Bihar Stampede: बिहारच्या शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ जणांचा मृत्यू, ८ जण जखमी

मुंबई: बिहारमधील नालंदा येथे एक मोठी घटना घडली आहे. शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत आठ जणांचा

CCTV Certification Rules: १ एप्रिलपासून अनेक चिनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या विक्रीवर बंदी; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

मुंबई: भारतातील सीसीटीव्ही बाजारपेठेत मोठे बदल होणार आहेत. भारत इंटरनेट-कनेक्टेड सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठीचे

नितीश यांच्या विधान परिषद सदस्यपदाच्या राजीनाम्यानंतर राजकीय खळबळ; कोण होणार मुख्यमंत्री?

नवी दिल्ली: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज विधान परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला. यापूर्वी ते राज्यसभेवर

Jobs Alert : १२ वी नंतर विमानतळावर करिअरची मोठी संधी; लाखोंचं पॅकेज आणि हाय-प्रोफाईल लाईफस्टाईल, जाणून घ्या सविस्तर

मुंबई : सध्याच्या काळात विमान वाहतूक (Aviation) क्षेत्र हे जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या उद्योगांपैकी एक