गांधीनगर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास आधुनिक सुविधांनी होणार सज्ज

सीमा पवार गांधीनगर : जयपूरमधील गांधीनगर रेल्वेस्थानक लवकरच आधुनिक सुविधांनी सज्ज होणार आहे.‘अमृत भारत स्टेशन योजने’अंतर्गत या स्थानकाचा पुनर्विकास केला जात आहे, हा प्रकल्प जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती गांधीनगर जयपूर रेल्वे विभागाकडून देण्यात आली. आधुनिक दर्जाच्या सुविधांसह रेल्वे स्थानकाचा पुर्नविकास अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पासाठी २१२.४८ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. स्थानकांवरील दोन्ही इमारतींना जोडणारा ७२ मीटर रुंद आणि दोन हजार ७०० चौ.मी. क्षेत्रफळात हा एक मार्ग तयार करण्यात आला आहे. या एअर कॉनकेअर्समध्ये प्रवाशांसाठी संपूर्ण आधुनिक सुविधा असणार आहे.


‘अमृत भारत स्टेशन योजने’ अंतर्गत या स्थानकाचा पुनर्विकास केला जात आहे, ज्यामध्ये प्रवाशांसाठी लिफ्ट, एस्केलेटर, दिव्यांगजन-अनुकूल सुविधा, ग्रीन बिल्डिंग वैशिष्ट्ये आणि सुरक्षितता तपासणी यांसारख्या सुविधांचा समावेश असेल. यामध्ये बॅगेज स्कॅनर आणि मेटल डिटेक्टर यांसारख्या सुरक्षा उपकरणांचा समावेश असेल. स्थानकावर मॉड्यूलर शौचालये, प्रतीक्षा कक्ष आणि शॉपिंग मॉल, कॅफेटेरिया गेम झोन यांसारख्या सुविधा असेल. प्रवाशांच्या सोयीसाठी३० लिफ्ट आणि १८ एस्केलेटर बसवण्याची योजना आहे. दिव्यांगांना सहज प्रवास करता यावा यासाठी विशेष सुविधा पुरवल्या जातील.हा विभाग प्रवाशांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला असणार आहे. प्रकल्पाचे जानेवारीपर्यंत लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती जयपूर रेल्वे विभागाकडून देण्यात आली.


हरित इमारत (ग्रीन बिल्डिंग) वैशिष्ट्ये


स्थानकाचा पुनर्विकास प्रकल्पात ऊर्जेचा वापर कमी करण्यासाठी ग्रीन बिल्डिंग वैशिष्ट्ये समाविष्ट केली जातील, ज्यात कचरा व्यवस्थापन आणि पावसाच्या पाण्याची साठवणूक यांचा समावेश आहे. या पुनर्विकासात पर्यावरणास अनुकूल अशा टिकाऊपणावर लक्ष केंद्रित केले जाईल.

Comments
Add Comment

२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार

मंत्री एस. जयशंकर यांची राज्यसभेत माहिती नवी दिल्ली : अमेरिकेने २००९ पासून एकूण १८,८२२ भारतीय नागरिकांना हद्दपार

अंदमान येथे होणार स्वा. सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

अंदमान : अंदमान येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेल्या ‘सागरा प्राण तळमळला’ या अजरामर गीताला

‘अयोध्या बस झाँकी है, काशी-मथुरा बाकी है’: योगी आदित्यनाथ

सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहांचे कामकाज चालणार नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार (८

गोव्यातील नाईट क्लबमध्ये अग्नितांडव! २५ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री प्रमोद सांवतांनी दिले चौकशीचे आदेश

अर्पोरा: गोव्यातील अर्पोरा गावातील एका नाईट क्लबमध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास भीषण आग लागली. बर्च बाय रोमियो

फॉलोअर्सच्या शर्यतीत मुलांचं बालपण धोक्यात, सुधा मूर्तींची सरकारकडे महत्त्वाची मागणी

नवी दिल्ली : इंटरनेटवर आज असंख्य रील्स आणि व्हिडिओ पाहायला मिळतात ज्यात लहान मुलांचा थेट कंटेंट म्हणून वापर केला

उड्डाणं रद्द, तिकीटदर वाढले; हवाई प्रवासातील गोंधळावर सरकारची मोठी कारवाई

नवी दिल्ली : इंडिगोच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय अडचणींमुळे मागील काही दिवसांपासून देशात मोठे विमान प्रवास