सततच्या अपघातांमुळे नवले पूल परिसर ‘मृत्यूचा सापळा’

पाच वर्षांत २५७ अपघात; ११५ जणांचा बळी


पुणे  : नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघातांची साखळी थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या पाच वर्षांत या परिसरात २५७ अपघात नोंदवले गेले असून, त्यापैकी ९५ अपघात गंभीर स्वरूपाचे होते. मागील पाच वर्षांत नवले पूल परिसरात ११५ जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती वाहतूक पोलिसांकडून समोर आली आहे. याच काळात ९४ नागरिक जखमी झाल्याची नोंद आहे. त्यामुळे नवले पूल परिसर मृत्यूचा सापळाच झाला असल्याचे गुरुवारी झालेल्या अपघातामुळे अधिकच अधोरेखित झाले आहे.


नवले पूल हा पुणे-बंगळूरु महामार्गावरील महत्त्वाचा टप्पा असून, सततची वर्दळ, वाहतूक कोंडी, एकमेकांना ओलांडून जाण्याची स्पर्धा आणि वेगाची हौस या परिसराला अपघातप्रवण क्षेत्र बनवत आहे. सर्वाधिक अपघात होणारे ब्लॅकस्पॉट म्हणून नवले पूल प्रसिद्ध आहे. या नवले पुलावरून वाहतूक करताना जीव मुठीत घेऊनच नागरिक प्रवास करतात, कारण कधी काय होईल अन् अपघाती मृत्यूला सामोरे जावे लागेल याचा नेम नाही.


२०२१ मध्ये २१ अपघात झाले आणि २८ जणांचा मृत्यू झाला, तर २०२२ मध्ये अपघातांची संख्या वाढून २५ झाली आणि मृत्यू २७ झाले. शहरात पाच वर्षांत म्हणजे २६० आठवड्यात ११५ जणांचा मृत्यू झाला म्हणजे दोन ते तीन दिवसांनंतर नवले पूल परिसरात एकाचा अपघातील मृत्यू होत असल्याचे भयावह वास्तव आहे.


२०२३ मध्ये सर्वाधिक मृत्यू


२०२३ वर्षात २२ अपघातांमध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला. हे सर्वांत जास्त मृत्यू संख्या असलेले वर्ष ठरले. २०२४ मध्ये १८ अपघातांत २० जणांचा मृत्यू झाला. २०२५ मध्ये १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबरपर्यंत ९ अपघात झाले असून, त्यात ९ जणांचा मृत्यू झाला आहे.


नवले पूल सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर


या सर्व घटनांमुळे नवले रस्ता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना व वाहतूक तज्ज्ञांनी वारंवार केलेल्या सूचना असे असूनही येथे सुधारणा मंद गतीने होत असल्याची टीका केली जात आहे. पुलाजवळील उतार, अनियमित पार्किंग, चुकीच्या ओव्हरटेकिंग वेळी कमी दृश्यता आणि वेगमर्यादांचे पालन न होणे ही प्रमुख कारणे म्हणून सांगितले जात आहेत. वाहतूक पोलिसांच्या म्हणण्यानुसार येथे सातत्याने गस्त वाढविण्यात आली आहे; परंतु नागरिकांनीही वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पुलाखाली व आसपासच्या भागात सिग्नल प्रणाली सुधारण्याची, सीसीटीव्ही कॅमेरे वाढविण्याची, वेगमर्यादा दर्शक फलक अद्ययावत करण्याची आणि रस्त्याच्या डिझाइनमध्ये आवश्यक बदल करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Comments
Add Comment

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह

Crime : पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, मित्रावर संशय गेला; पारा चढला अन मित्रानंच मित्राचा काटा काढला

Beed Crime : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचं चित्र आहे. बीडमध्ये मैत्रीला काळिमा

Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी बंधनकारकच; परिवहन मंत्र्यांची ठाम भूमिका; आजच्या बैठकीत काय घडलं ?

(Marathi Language Compulsory Taxi-Auto ) : आगामी 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना ₹१५०० येणार की ₹३००० येणार? अपडेट काय ?

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अनेक गरजू

Maharashtra Heat Wave : राज्यभर उष्णतेचा कहर; अकोल्यात ४५.६ अंशांची नोंद, पुढील दोन दिवसांत आणखी वाढीचा अंदाज

महाराष्ट्रात सध्या उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवत असून राज्यभर तापमानाने अक्षरशः उच्चांक गाठला आहे. मराठवाडा,

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या