भारत-नेपाळ सीमेवर कारवाई; व्हिसा नसल्याने दोन विदेशी नागरिक अटकेत

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांचे तपास नेटवर्क अधिकच कठोर झाले आहे. दिल्ली आणि आसपासच्या भागांतील तपास अजूनही सुरू आहे. उत्तर प्रदेशातील काही शहरांमध्ये धाड सत्र सुरू आहे. स्फोट प्रकरणी काही डॉक्टरांना अटक झाली आहे. फरिदाबादच्या डॉ. शाहीन आणि लखनऊच्या डॉ. परवेझ यांना स्फोट प्रकरणाशी संबंध असल्याचे पुरावे हाती आले आहेत. या दोघांना अटक करण्यात आली आहे.


त्याचवेळी, भारत-नेपाळ सीमेवर एक मोठा घुसखोरीचा डाव पोलिसांनी उडवून लावला आहे. बहराइचमध्ये दोन ब्रिटिश नागरिकांना अटक करण्यात आली आहे, ज्यात एक ३५ वर्षीय पाकिस्तानी युवक आणि दुसरी ६१ वर्षीय महिला, ब्रिटिश नागरिक असून ती मूळची भारतीय आहे. यांना भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना अटक करण्यात आली, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.


शनिवारी सकाळी १० वाजता नेपाळगंजहून रुपैडिहाला प्रवास करणाऱ्या दोघांना थांबवण्यात आले आणि त्यांची कागदपत्रे तपासली गेली. त्यावेळी यांच्याकडे भारतात प्रवेश करण्यासाठी कोणतेही वैध कागदपत्रे आढळली नाहीत, त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन कारवाई सुरू केली गेली. या दोघांवरही भारतीय सीमेत अनधिकृतपणे प्रवेश करण्याचा आरोप ठेवला आहे आणि त्यांना बहराइच न्यायालयात हजर करण्यात आले आहे, असे रुपैडिहा पोलिस स्टेशनचे अधिकारी रमेश सिंह रावत म्हणाले.


अटक करण्यात आलेल्या दोन्ही व्यक्तींची ओळख पटली असून, ६१ वर्षीय सुमित्रा शकील ओलिव्हिया, ज्या कर्नाटकमधील उडुपी येथील आहे आणि ब्रिटिश पासपोर्ट धारक आहेत, त्याचा सध्याचा पत्ता ग्लुसेस्टर, युनायटेड किंग्डम आहे. हे दोघेही पाकिस्तानी हसन अम्मान सलीम याच्याशी संपर्कात आहेत. पुढील कारवाईसाठी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.


दिल्लीतील स्फोटाशी संबंधित तपास वेगाने पुढे जात आहे आणि त्यामध्ये युनायटेड किंग्डम आणि पाकिस्तानमधील नागरिकांचा समावेश असल्याने तपास यंत्रणा आंतरराष्ट्रीय पातळीवरही कार्यरत आहेत. आतापर्यंत काही महत्त्वपूर्ण माहिती उघडकीस आलेली आहे, परंतु याची तपासणी सुरू आहे.

Comments
Add Comment

‘आशियामध्ये शांततेसाठी अरब राष्ट्राची भूमिका कौतुकास्पद’

नवी दिल्ली : अरब देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी

भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे संरक्षण बजेट

नवी दिल्ली : यंदाच्या बजेटमध्ये संरक्षण विभागासाठी ७.८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षणासाठी

भूतान, नेपाळ, श्रीलंका याविश्वासू मित्रांसाठी मदतीचा हात, संबंधातील कडवटपणामुळे बांगलादेशला आर्थिक झटका

नवी दिल्ली  : केंद्रातील मोदी सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना आपल्या परराष्ट्र धोरणाचे

इतर देशांच्या तुलनेत किती मोठे आहे देशाचे संरक्षण बजेट

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत बजेट सादर केले. यंदाच्या बजेटमध्ये भारताच्या

Budget 2026 : ‘विकसित भारताच्या दिशेने दमदार पाऊल’; केंद्रीय अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुंबई : देशाचा २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2026 ) सादर झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र

Budget 2026 : मच्छिमारांसाठी आनंदाची बातमी! खुल्या समुद्रातील मासेमारी आता 'करमुक्त'; निर्यातीला मिळणार मोठी गती

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात देशातील ग्रामीण