तीन दिवसांत 28 काळवीटांचा मृत्यू; कर्नाटक प्राणीसंग्रहालयावर संशयाचे सावट

कर्नाटक : बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर राणी चेन्नम्मा प्राणीसंग्रहालयात गेल्या तीन दिवसांत तब्बल 28 काळवीटांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. प्राणिसंग्रहालयात १३ नोव्हेंबरला ८ आणि १५ नोव्हेंबरला आणखी 20 काळवीटांची मृत्यू नोंद झाली आहे. अचानक वाढलेल्या मृत्युमुळे वन विभाग सतर्क झाल्याचे माहितीवरून समजते. वरिष्ठ अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.


कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खांद्रे यांनी या घटनेवर गंभीर चिंता व्यक्त करून तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. प्राथमिक अहवालात काळवीटांमध्ये संसर्गजन्य आजाराची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानुसार प्राणीसंग्रहालयातील इतर प्राण्यांना धोका होऊ नये म्हणून सर्व प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


याशिवाय दूषित पाणी-अन्न किंवा मांजरींसारख्या पाळीव प्राण्यांमुळे आजार पसरला का, हेही तपासले जाणार आहे. यासाठी तज्ज्ञ समिती गठित करण्याचे आदेश देत वनमंत्र्यांनी भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, तसेच कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचेही स्पष्ट केले आहे.


कित्तूर राणी चेन्नम्मा किंवा भूतरामनहट्टी प्राणीसंग्रहालय1989 मध्ये स्थापन झाले असून बेळगाव शहरापासून सुमारे 12 किलोमीटरवर राष्ट्रीय महामार्ग 4 जवळ 31.68 हेक्टर जागेत वसले आहे. विभागीय वन अधिकारी एन.ई. क्रांती यांनी सांगितले की मृत्यू जिवाणू संसर्गामुळे झाले असून, बंगळुरूच्या बन्नेरघट्टा पशुवैद्यकीय विज्ञान संस्थेतील तज्ज्ञांची टीम तपासासाठी येणार आहे.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू