नवले पुलावरील अपघातानंतर ‘लूटमारी’चा व्हिडिओ व्हायरल ; नागरिकांमध्ये संतापाची लाट!

Pune Navale Bridge Accident : नवले पुलाजवळ गुरुवारी (दि. १३) सायंकाळी झालेल्या साखळी अपघाताने संपूर्ण शहर हादरले. काही क्षणांतच दोन कंटेनर आणि एका कारचा भीषण अपघात झाला आणि आठ जण जळून मृत्युमुखी पडले. सुमारे २० जण जखमी झाले. काळोखात उजळलेल्या आगीच्या ज्वाळा आणि विखुरलेली वाहने पाहून उपस्थितांची पावले थरथरली. अपघातानंतर काही वेळातच सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ फिरू लागला ज्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.


या व्हिडिओमध्ये अपघातस्थळी पडलेले रोख पैसे आणि सोन्यासारख्या वाटणाऱ्या वस्तू गोळा करण्यासाठी काही लोक धाव घेताना दिसत आहेत. जीव गेलेल्या व्यक्तींच्या वस्तूंची अशी लूटमार होत असल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केले आहे. “ही घटना मानवतेला कलंक लावणारी आहे,” अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर व्यक्त केल्या जात आहेत.





नवले पुलाजवळ कंटेनरचा ताबा सुटल्याने त्याने समोरच्या आठ ते दहा वाहनांना जोरदार धडक दिली. एका कारचा अक्षरशः चुराडा झाला व तिने पेट घेतला. या भीषण अपघातात आठ जण जळून मृत्युमुखी पडले. मृतांच्या अंगावरील दागिन्यांचे तुकडे किंवा रस्त्यावर पडलेले पैसे उचलण्याच्या व्हिडिओने हृदय पिळवटून टाकले असून पुणेकरांनी संताप व्यक्त केला आहे.


प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज बोगद्याकडून उतारावरून वेगाने येत असलेल्या कंटेनरचे अचानक ब्रेक निकामी झाले. वाहनचालकाचा ताबा सुटताच कंटेनरने समोर असलेल्या १० ते १५ वाहनांना जोरदार धडक दिली.


धडकेनंतर एका ट्रॅव्हलर बसला जोरदार धक्का देऊन ती पलटी झाली. या बसमध्ये १८–२० प्रवासी होते. याचदरम्यान कंटेनरच्या डिझेल टँकला आग लागली आणि क्षणात धूराचे लोट आकाशाला भिडले.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे