नवले पुलावरील अपघातानंतर ‘लूटमारी’चा व्हिडिओ व्हायरल ; नागरिकांमध्ये संतापाची लाट!

Pune Navale Bridge Accident : नवले पुलाजवळ गुरुवारी (दि. १३) सायंकाळी झालेल्या साखळी अपघाताने संपूर्ण शहर हादरले. काही क्षणांतच दोन कंटेनर आणि एका कारचा भीषण अपघात झाला आणि आठ जण जळून मृत्युमुखी पडले. सुमारे २० जण जखमी झाले. काळोखात उजळलेल्या आगीच्या ज्वाळा आणि विखुरलेली वाहने पाहून उपस्थितांची पावले थरथरली. अपघातानंतर काही वेळातच सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ फिरू लागला ज्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.


या व्हिडिओमध्ये अपघातस्थळी पडलेले रोख पैसे आणि सोन्यासारख्या वाटणाऱ्या वस्तू गोळा करण्यासाठी काही लोक धाव घेताना दिसत आहेत. जीव गेलेल्या व्यक्तींच्या वस्तूंची अशी लूटमार होत असल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केले आहे. “ही घटना मानवतेला कलंक लावणारी आहे,” अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर व्यक्त केल्या जात आहेत.





नवले पुलाजवळ कंटेनरचा ताबा सुटल्याने त्याने समोरच्या आठ ते दहा वाहनांना जोरदार धडक दिली. एका कारचा अक्षरशः चुराडा झाला व तिने पेट घेतला. या भीषण अपघातात आठ जण जळून मृत्युमुखी पडले. मृतांच्या अंगावरील दागिन्यांचे तुकडे किंवा रस्त्यावर पडलेले पैसे उचलण्याच्या व्हिडिओने हृदय पिळवटून टाकले असून पुणेकरांनी संताप व्यक्त केला आहे.


प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज बोगद्याकडून उतारावरून वेगाने येत असलेल्या कंटेनरचे अचानक ब्रेक निकामी झाले. वाहनचालकाचा ताबा सुटताच कंटेनरने समोर असलेल्या १० ते १५ वाहनांना जोरदार धडक दिली.


धडकेनंतर एका ट्रॅव्हलर बसला जोरदार धक्का देऊन ती पलटी झाली. या बसमध्ये १८–२० प्रवासी होते. याचदरम्यान कंटेनरच्या डिझेल टँकला आग लागली आणि क्षणात धूराचे लोट आकाशाला भिडले.

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास