विदर्भाची बाजी! राज्यातील १३ विद्यापीठांमध्ये ‘या’ विद्यापीठाला अव्वल क्रमांक; पुणे शेवटच्या स्थानी

नागपूर : विदर्भाने पुन्हा एकदा राज्यात आपली ताकद दाखवत गोंडवाना विद्यापीठाने महाराष्ट्रातील १३ सार्वजनिक विद्यापीठांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २०२४-२५ या शैक्षणिक सत्रातील विद्यापीठांच्या कामकाजाचे स्वतंत्र मूल्यमापन केले असून, कोणत्याही विद्यापीठाकडून माहिती किंवा अर्ज मागविण्यात आले नव्हते. विद्यापीठांनी शासनाकडे वर्षभरात सादर केलेल्या नोंदींच्या आधारे हे मूल्यमापन करण्यात आले. अर्न्स्ट अँड यंग या संस्थेची मदत या प्रक्रियेसाठी घेण्यात आली.


या तपासणीत विद्यापीठांचे प्रशासकीय कामकाज, सेवाशर्ती, विविध संवर्गांच्या ज्येष्ठतासूची, पदोन्नती आणि सरळसेवा नियुक्त्या, अनुकंपा नियुक्ती, रिक्त जागांची स्थिती, बिंदुनामावलीचे प्रमाणीकरण, आयजीओटी पोर्टलवरील नोंदणी आणि अभ्यासक्रम पूर्णता, तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक डिजिटल व अद्ययावत ठेवणे अशा एकूण १०० गुणांच्या निकषांवर विद्यापीठांची चाचणी करण्यात आली.


या सर्व निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत गोंडवाना विद्यापीठाने ६८ गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला. मुंबई विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी प्रत्येकी ६६ गुण मिळवत संयुक्तरीत्या दुसरे स्थान मिळवले.


गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी सांगितले की, वर्षभर सातत्याने प्रक्रिया अद्ययावत ठेवून, प्रशासनिक कामांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे विद्यापीठाला ही कामगिरी साधता आली.


राज्यातील विद्यापीठांचे गुण असे:


गोंडवाना विद्यापीठ – ६८
मुंबई विद्यापीठ – ६६
शिवाजी विद्यापीठ – ६६
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ – ६२
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ – ६०
एसएनटीडी महिला विद्यापीठ – ५७
सोलापूर विद्यापीठ – ५४
कालिदास संस्कृत विद्यापीठ – ५२
नागपूर विद्यापीठ – ५२
छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विद्यापीठ – ५०
नांदेड विद्यापीठ – ४८
जळगाव विद्यापीठ – ४८
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – ४२

Comments
Add Comment

 रामनवमी भंडाऱ्यासाठी मंत्री लोढा यांच्याकडून मंडळांना गॅसची मद

गिरगावच्या ओम श्री सदगुरू साईनाथ मंडळाकडून मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आभार धार्मिक कार्यात सहकार्याची

Ashok Kharat Case Update: खरात प्रकरणात न्यायालयात काय घडलं?, जाणून घ्या A to Z माहिती

नाशिक: अशोक खरातच्या भोंदूगिरीने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण बाहेर आल्यापासून नवनवे खुलासे

Ashok Kharat Case: अशोक खरात महिलांना कसं भुलवायचा?; तपासात धक्कादायक माहिती समोर

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. अशोक खरात महिलांना टार्गेट करुन

मंत्री नितेश राणेंची विराट हिंदू संमेलनाला उपस्थिती; 'हिंदू एकतेची ऊर्जा आणि धर्माभिमान खरोखर प्रेरणादायी'

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे सकल हिंदू समाजाकडून विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

३० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचे नवीन सत्र

मुंबई: ३० मार्चपासून राज्यात आभाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंक

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तिपत्र  मुंबई : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,