ठाणे-बोरिवली भूमिगत रस्त्याच्या कामासाठी सहा महिने वाहतुकीत बदल

ठाणे : ठाणे-बोरिवली दुहेरी भुयारी मार्गाच्या निर्माणाचे काम सध्या घोडबंदर येथील मुल्लाबाग भागात सुरू झाले आहे. या भागात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून बोगदे तयार केले जात आहे. त्यानिमित्ताने विविध वाहने, यंत्रांची वाहतूक करणारी वाहने या भागातून वाहतूक करणार आहे. या कामादरम्यान ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत.


हे वाहतूक बदल शुक्रवारपासून ते ११ मे २०२६ पर्यंत लागू केले आहेत. घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी, मानपाडा, ब्रम्हांड भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक वाहन चालक मुल्ला बाग मार्गे वाहतूक करत असतात. येथील वाहतूक बदलाचा परिणाम वाहन चालकांना होण्याची शक्यता आहे.


ठाणे, भिवंडी, कल्याणकरांना बोरिवली गाठण्यासाठी घोडबंदर मार्गाचा वापर करावा लागतो; परंतु या मार्गाची अवस्था अत्यंत वाईट आहे. घोडबंदर घाट रस्त्यात दररोज वाहन चालकांना कोंडीचा सामना सहन करावा लागत असून कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे ठाणे-बोरिवली प्रकल्पाच्या निर्माणाचे काम सध्या सुरू आहे.


बंदीची वेळ : रोज रात्री १:०० ते सकाळी ६:०० आणि दुपारी १२:०० ते सायंकाळी ६:००
बंद मार्ग : हिल क्रेस्ट सोसायटी, मुल्ला बागकडून नीलकंठ ग्रीनकडे जाणारा मार्ग
पर्यायी मार्ग : हिल क्रेस्ट सोसायटी, मुल्ला बागकडून नीलकंठ ग्रीनकडे जाणारी वाहने नीलकंठ ग्रीनकडून मुल्ला बागकडे येणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेडिंग केलेल्या मार्गाने विरुद्ध दिशेने जातील.
नियमातून वगळलेली वाहने : पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने.

Comments
Add Comment

भटका कुत्रा चावला अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

कल्याण : दहशतवादी संघटनांप्रमाणेच आता भटक्या कुत्रांचीही दहशत अनेक शहरात वाऱ्यासारखी परसरत आहेत. अनेक

ठाणाच्या नगरसेवकांचा वेगळाच थाट; ठाणे महापालिकेच्या दारात सजल्या आलिशान गाड्या

ठाणे : कार एक्स्पो नव्हे तर ठाण्याच्या महानगरपालिका मुख्यालयाच अंगण आलिशान गाड्यांनी व्यापून गेलं होत. निमित्त

डोंबिवलीत जलवाहिनी फुटली, हजारो लीटर पाण्याची नासाडी

डोंबिवली : डोंबिवलीत जेसीबीचा धक्का लागल्यामुळे जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची

Thane Municipal Corporation : ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये ठाणे महापालिकेने पटकाविला तिसरा क्रमांक

ठाणे : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’

Ravindra Chavan : भिवंडी पालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार : रवींद्र चव्हाण

काँग्रेसच्या सहकार्याने भाजपचे बंडखोर महापौर पदी मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत

भिवंडीतील बंडखोरांवर अपात्रतेची टांगती तलवार

भाजपचा व्हीप पाळावा लागणार; प्रदेश पातळीवरून वेगवान हालचाली सुरू मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या