आरबीआयची मोठी अपडेट- टॅरिफला कंटाळलेल्या निर्यातदारांना आरबीआयकडून खुप मोठा दिलासा फेमा कायद्यात फेरबदल जाहीर

मुंबई:विशेषतः केंद्र सरकार टॅरिफ फटक्यातून मुक्त करण्यासाठी विविध योजना राबवत आहे. त्यातील पुढील अध्याय म्हणजे आरबीआयकडून फेमा (Foreign Exchange Management Act FEMA) अंतर्गत नियमावलीत सूट देत निर्यातदारांसाठी दिलासा दिला आहे. नवीन माहितीप्रमाणे निर्यातदारांना वित्त सहाय्य, तरलता (Liquidity) सहाय्य यासह व्यापारासाठी लवचिकता आणण्यास आरबीआय मदत करणार आहे. या नव्या शिथिलतेनुसार, आता निर्यातदारांना निर्णयात (एक्सपोर्ट प्रोसिड) अंतर्गत केलेल्या निर्यातीनंतर संपूर्ण करारात वस्तूंचा परतावा, अथवा वस्तूंचे मूल्य परत भारतात आणण्यासाठी ९ महिन्याऐवजी आता १५ महिन्यांचा कालावधी असणार आहे. सॉफ्टवेअर, सेवा, वस्तू यांच्या निर्यातीत काही बदल असल्यास तो भारतात परत आणण्यासाठी कालावधी आरबीआयने वाढवला आहे. तसेच आता पैसे मिळाल्यावर संपूर्ण माल पोहोचवण्यासाठी मर्यादा १ वर्षांवरून ३ वर्षावर वाढवण्यात आली आहे. त्यामुळे राहिलेला व्यवहार समायोजित (Adjust) अथवा सेटलमेंट करण्यासाठी निर्यातदारांना अतिरिक्त वेळ मिळू शकेल.


यासह वित्तीय सहाय्य, अथवा मुदतठेव कर्ज घेतलेल्या निर्यातदारांना नव्या फेमा कायद्यासह नवीन ट्रेड रिलिफ मेजर्स डायरेक्शन २०२५ अंतर्गत खेळत्या भांडवलावर अथवा खेळत्या भांडवलासाठी (Working Capital) आर्थिक सहाय्याला मुदतवाढ मिळू शकते.१ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत या प्रकारच्या घेतलेल्या आर्थिक सहाय्यात हा बदल होणार आहे.


याशिवाय, आरबीआयने आपल्या प्रकाशनात म्हटल्याप्रमाणे आरबीआयने निर्यात-क्रेडिट परतफेडीचे नियम शिथिल केले आहेत. ३१ मार्च २०२६ पर्यंत वितरित केलेल्या कर्जांसाठी प्री-शिपमेंट आणि पोस्ट-शिपमेंट निर्यात क्रेडिटसाठी कमाल (जास्तीत जास्त) क्रेडिट कालावधी एक वर्षावरून ४५० दिवसांपर्यंत वाढविण्यात आल्याचे आरबीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. माहितीनुसार ज्या निर्यातदारांनी ३१ ऑगस्ट २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी पॅकिंग क्रेडिट घेतले होते, परंतु वस्तू पाठवू शकले नाहीत त्यांना देशांतर्गत विक्री किंवा इतर निर्यात ऑर्डरमधून मिळालेल्या रकमेसह पर्यायी कायदेशीर स्रोतांचा वापर करून या सुविधा परतफेड करण्याची परवानगी असणार आहे असे आरबीआयने आपल्या नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

crop registration : प्रत्येक हंगामात १०० टक्के पीक नोंदणी बंधनकारक

मुंबई : राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाला अधिक गती देण्यासाठी आणि त्यात पारदर्शकता

Nashik : नाशिक आणि जळगावच्या शेतकऱ्यांना शासनाचा मदतीचा हात

नाशिक : अवकाळी पावसाच्या तडाख्याने उध्वस्त झालेल्या नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने

anna bhau sathe : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला गती देण्याचे निर्देश

मुंबई : घाटकोपर येथील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी ३३२.६२ कोटी रुपयांच्या

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त टूर सर्किट

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून

Mumbai : बोरिवलीतील बीएसएनएल व एमटीएनएलची आरक्षित जागा पीएम आवास योजनेसाठी वापरणार

मुंबई : पीएम आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे बांधण्यासाठी बोरिवली येथील भारत संचार निगम लि. (बीएसएनएल) आणि महानगर

IPL 2026 Points Table : १५ सामन्यांनंतर राजस्थान रॉयल्स टॉपवर; हे ४ संघ प्लेऑफच्या रेसमध्ये आघाडीवर

मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत १५ सामने पूर्ण झाले असून स्पर्धा आता रंगात आली आहे. काही संघ जबरदस्त