उत्पन्ना एकादशीचे महत्त्व आणि पाळा हे नियम! जाणून घ्या सविस्तर...

दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास आणि व्रत केले जाते. प्रत्येक एकादशीला विशिष्ट असे महत्त्व देखील आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पन्न एकादशी म्हणतात. कारण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला भगवान विष्णूंच्या शरीरातून देवीचा जन्म झाला होता. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी १५ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजून ४९ मिनिटांनी सुरू होईल. तर दुसऱ्या दिवशी १६ नोव्हेंबरला पहाटे २ वाजून ३७ मिनिटांनी संपेल. उत्पन्न एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा आणि उपवास करण्याची परंपरा आहे. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने सर्व पापांचे शुद्धीकरण होते आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. त्याच बरोबर या दिवशी तुळशीशी संबंधित नियमांचे पालन करणे देखील आवश्यक आहे.



एकादशीला तुळशीबद्दल पाळा हे नियम


हिंदू धार्मिक श्रद्धेनुसार असे म्हटले जाते की तुळशीमाता एकादशीला भगवान विष्णूसाठी निर्जल व्रत करते. त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालू नये. जर तुम्ही या दिवशी तुळशीला पाणी अर्पण केल्यास तुळशी मातेचा उपवास मोडतो. महत्त्वाचे म्हणजे या दिवशी तुळशीची पाने तोडू नका. खराब किंवा अस्वच्छ हातांनी तुळशीला स्पर्श करू नका. या चुका केल्यास तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल.



उत्पन्ना एकादशी मागील पौराणिक कथा


सत्ययुगात नदीजंग नावाचा एक राक्षस होता, त्याच्या मुलाचे नाव मुर होते. पराक्रमी आणि बलवान राक्षस मुरने इंद्र, वरुण, यम, अग्नि, वायू, ईश, चंद्रमा, नैरुत इत्यादी स्थानांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करत स्वर्गीय जगाचा ताबा घेतला होता. यावेळी सर्व देव त्याच्यापासून बचाव करण्यासाठी पळत होते. भगवान विष्णूंनी यावेळी युद्धभूमीचा स्वीकार करत मुर राक्षसासोबत लढत दिली. असे म्हणतात की, मुर आणि विष्णू यांच्यामधील हे युद्ध १० हजार वर्षे चालू होते. भगवान विष्णू युद्ध करताना थकले आणि बद्रिकाश्रम गुहेत जाऊन विश्रांती घेऊ लागले. राक्षस मुरही विष्णूचा पाठलाग करत तिथे पोहोचला. यावेळी भगवान विष्णूंच्या शरीरातून तेजस्वी रूप असलेली देवी जन्माला आली. या देवीने मुर राक्षसाचा वध केला. दैत्याचा नायनाट झाल्यामुळे भगवान विष्णूंनी देवीला वर दिला. देवीचा जन्म एकादशी तिथीला झाल्यामुळे उत्पन्ना एकादशी असे नाव ठेवण्यात आले.


 
Comments
Add Comment

मध्य रेल्वेच्या १८ होळी विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : होळी सणाच्या निमित्ताने होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज

Holi 2026 : रंग-पिचकाऱ्यांच्या किंमतीत सरासरी पाच टक्के वाढ, तरीही खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा रंगांनी न्हाऊन निघाल्या आहेत.

Big Boss Marathi Season 6 : बिग बॉस मराठी ६ मध्ये आयुषच्या विषयावरून तन्वीची खरडपट्टी; प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : बिग बॉस मराठी ६ मध्ये सातव्या आठवड्यात ड्रामा, आरोप-प्रत्यारोप आणि भावनिक उद्रेक यांचा जोर वाढला आहे.

वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई

श्रद्धेच्या सान्निध्यातील शाश्वततेचा भव्य संकल्प ‘निसर्गायण’

टिटवाळा ठरणार पर्यावरण –पर्यटनाचे नवे केंद्र कल्याण : श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच