'मी कट्टर भाजप समर्थक', गंधार जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे विधान चर्चेत!

ठाणे: बालदिनाचे औचित्य साधून प्रख्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निवेदिता सराफ यांना हा पुरस्कार त्यांचे पती आणि पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी, मनोगत व्यक्त करताना 'मी कट्टर भाजप समर्थक' असल्याने बिहार मधील भाजपाच्या विजयचा आनंद झाल्याचे निवेदिता सराफ म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे.


गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणाल्या की, "आजचा हा क्षण माझ्यासाठी खूपच भावनिक आहे. मी खरंच मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. ज्यांच्याकडून पुरस्कार मिळाला ती व्यक्ती माझे गुरु, माझे पती, आज मी जी काही आहे, ती फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे आहे. त्यांच्या हस्ते तुम्ही मला हा पुरस्कार दिलात, हे तुम्हाला सुचलं त्यासाठी मनःपूर्वक आभार." पुढे त्या म्हणाल्या, "बिहारबद्दल खूप खूप अभिनंदन, मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच अभिमान वाटत आहे."



बालनाट्याबाबत सांगताना निवेदिता सराफ म्हणाल्या, "माझ्या आयुष्याची सुरुवात बालनाट्यातून झाली. सुधा करमरकर यांच्या बालनाट्यातून मी कामाला सुरुवात केली. सुधाताईंनी स्टेजवर उभं राहायला शिकवलं. सगळेच क्रिकेटच्या शिबिराला गेल्यावर सचिन तेंडुलकर बनत नाहीत, आणि सगळेच गाणं शिकायला लागल्यावर सोनू निगम बनत नाहीत. पण चांगले श्रोते-प्रेक्षक बनतात. यामुळे तुमचा व्यक्तिमत्त्व विकास होण्यासाठी मदत होते."


गंधार बालनाट्य संस्थेच्यावतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. यावर्षी गंधार गौरव पुरस्काराचे दहावे वर्षे होते. हा पुरस्कार सोहळा शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडला असून यावर्षी या पुरस्काराच्या मानकरी अभिनेत्री निवेदिता सराफ ठरल्या. या पुरस्कारावेळी व्यासपीठावर आमदार संजय केळकर, लेखक अभिजित पानसे, अभिनेते विजय पाटकर, राज्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप ढवळ, दिग्दर्शक निर्माते मंगेश देसाई, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, विलास ठुसे, गंधारचे संस्थापक मंदार टिल्लू यांची उपस्थिती होती.

Comments
Add Comment

दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ टीमकडून खास भेट; BTS व्हिडिओ प्रदर्शित

मुंबई : ‘पेड्डी’मधील पहिले गाणे ‘चिकीरी’ने आधीच सर्व प्लॅटफॉर्म्सवर 200 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. या

‘जय सोमनाथ’साठी बॉलिवूडचे दिग्गज करणार महायुती

मुंबई : ऐतिहासिक सोमनाथ मंदिरावर १०२६ मध्ये पहिल्यांदा हल्ला झाला. यानंतर वारंवार हल्ले झाले. या सर्व

बिग बॉस फेम कलाकाराचे 'तुरू तुरू' गाणे सुपरहिट, दोन दिवसांत दहा लाखांपेक्षा जास्त व्हयूज

मुंबई : मराठी म्युझिक इंडस्ट्रीत सध्या ‘तुरू तुरू’ या नव्या गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या दोन दिवसांत

पाकिस्तानमध्ये बॉलिवूडप्रेमींसाठी 'धुरंधर'ची पायरसी जोरात

कराची : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा हिंदी चित्रपट भारतात सुपरहिट झाला. अनिवासी भारतीय पण मोठ्या संख्येने हा

रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद

Valentines Day: अभिनेत्री नम्रता गायकवाड 'काहीतरी वेगळे' करणार? चर्चांना उधाण

मुंबई: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नम्रता गायकवाड हीने अभिनेता तुषार कावळे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करून