'मी कट्टर भाजप समर्थक', गंधार जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे विधान चर्चेत!

ठाणे: बालदिनाचे औचित्य साधून प्रख्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निवेदिता सराफ यांना हा पुरस्कार त्यांचे पती आणि पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी, मनोगत व्यक्त करताना 'मी कट्टर भाजप समर्थक' असल्याने बिहार मधील भाजपाच्या विजयचा आनंद झाल्याचे निवेदिता सराफ म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे.


गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणाल्या की, "आजचा हा क्षण माझ्यासाठी खूपच भावनिक आहे. मी खरंच मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. ज्यांच्याकडून पुरस्कार मिळाला ती व्यक्ती माझे गुरु, माझे पती, आज मी जी काही आहे, ती फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे आहे. त्यांच्या हस्ते तुम्ही मला हा पुरस्कार दिलात, हे तुम्हाला सुचलं त्यासाठी मनःपूर्वक आभार." पुढे त्या म्हणाल्या, "बिहारबद्दल खूप खूप अभिनंदन, मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच अभिमान वाटत आहे."



बालनाट्याबाबत सांगताना निवेदिता सराफ म्हणाल्या, "माझ्या आयुष्याची सुरुवात बालनाट्यातून झाली. सुधा करमरकर यांच्या बालनाट्यातून मी कामाला सुरुवात केली. सुधाताईंनी स्टेजवर उभं राहायला शिकवलं. सगळेच क्रिकेटच्या शिबिराला गेल्यावर सचिन तेंडुलकर बनत नाहीत, आणि सगळेच गाणं शिकायला लागल्यावर सोनू निगम बनत नाहीत. पण चांगले श्रोते-प्रेक्षक बनतात. यामुळे तुमचा व्यक्तिमत्त्व विकास होण्यासाठी मदत होते."


गंधार बालनाट्य संस्थेच्यावतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. यावर्षी गंधार गौरव पुरस्काराचे दहावे वर्षे होते. हा पुरस्कार सोहळा शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडला असून यावर्षी या पुरस्काराच्या मानकरी अभिनेत्री निवेदिता सराफ ठरल्या. या पुरस्कारावेळी व्यासपीठावर आमदार संजय केळकर, लेखक अभिजित पानसे, अभिनेते विजय पाटकर, राज्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप ढवळ, दिग्दर्शक निर्माते मंगेश देसाई, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, विलास ठुसे, गंधारचे संस्थापक मंदार टिल्लू यांची उपस्थिती होती.

Comments
Add Comment

‘पंचायत’ला ६ वर्षे पूर्ण, प्राइम व्हिडिओने केली पाचव्या पर्वाची घोषणा

मुंबई : द वायरल फीवर (टीव्हीएफ) निर्मित ‘पंचायत’च्या पाचव्या पर्वाची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत येत आहे 'सालबर्डी'

मुंबई : मराठी चित्रपट त्याच्या आशय विषयासोबतच त्याच्या उच्च निर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे.

"देऊळ बंद २" येतोय २१ मे रोजी

मुंबई : २०१५ साली प्रदर्शित झालेल्या "देऊळ बंद" चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अध्यात्म आणि

मातृभूमी’मधील ‘चांद देख लेना’ गाण्याचा मेकिंग व्हिडीओ प्रदर्शित

मुंबई : सलमान खान फिल्म्स संगीतने सर्वांच्या आवडीच्या ‘चांद देख लेना’ या गाण्याचा एक विशेष पडद्यामागील व्हिडीओ

'मराठी माणसाच्या असंख्य आठवणींचे गाठोडे म्हणजे भारतमाता'

मुंबई : लालबाग, परळ आणि गिरणगावातील असंख्य मराठी माणसाच्या आठवणींचे एक मोठे गाठोडे घेऊन भारतमाता सिनेमागृह उभे

Bigg Boss Marathi 6 : शेवटची कॅप्टनसी कोणाला मिळणार ? प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन यंदा अनेक गोष्टींमुळे सतत चेर्चेत आहे. आता या सीझनचे काही दिवसच शिल्लक राहिले असून बिग