बिहारमध्ये भाजप अव्वल, महाराष्ट्रासह १३ राज्यांवर भाजपची सत्ता! जाणून घ्या सविस्तर...

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर आघाडी घेतल्याने एनडीएचा दणदणीत विजय झाला. जेडीयूपेक्षा ४ जागा अधिक मिळवल्याने बिहारमध्ये भाजपचे कमळ फुलणार असून विजयाचा भगवा फडकणार यात कोणतीच शंका नाही. महाराष्ट्रात सुद्धा विधानसभा निवडणूकीत महायुती एकत्र लढली, मात्र सर्वाधिक जागा भाजपच्या होत्या. त्यामुळे भाजपने मित्रपक्षांची साथ घेतली तरी पक्ष म्हणून निवडणूकीत अव्वल ठरल्याचे नाकारता येत नाही. महाराष्ट्र आणि बिहार प्रमाणे अजून कोणत्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे, हे सविस्तर जाणून घेऊया...


बिहार निवडणुकीतील घवघवीत यशानंतर भाजप आणि एनडीए आता १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सत्तेत आहे. केवळ भाजपकडे लक्ष केंद्रीत केल्यास भाजपने महाराष्ट्र आणि हरियाणासह अनेक प्रमुख राज्ये राखून आणि जम्मू आणि काश्मीरसारख्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये लक्षणीय यश मिळवून सर्वात लोकप्रिय राजकीय पक्ष म्हणून आपले स्थान मजबूत केले.


भाजपच्या मुख्यमंत्री पदाचे चेहरे म्हणून योगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेश), हिमंता बिस्वा सरमा (आसाम), देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र), आणि पुष्करसिंग धामी (उत्तराखंड) हे भाजपचे सर्वात प्रसिद्ध आहेत. याव्यतिरिक्त दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, गोवा, गुजरात, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत. यामध्ये आता बिहारचा मुख्यमंत्री म्हणून भाजपचा चेहरा असण्याची शक्यता असू शकते.



तर आंध्र प्रदेश, ईशान्य आसाम, नागालँड आणि मेघालय या राज्यांमध्ये भाजपच्या मित्रपक्षांची सत्ता आहे. त्यामुळे भाजप आणि एनडीएने एकूण १८ जागांवर आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे. यातून हे स्पष्ट होते की देशातील महत्त्वाची राज्ये ही एनडीएच्या ताब्यात आहेत.



मोदींचे आता 'बंगाल' लक्ष्य


दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील विजयानंतर कार्यकर्ते आणि जनतेला संबोधित करताना म्हटले की, ‘बिहारच्या विजयाने केरळ, तामिळनाडू, पाँडेचरी आणि पश्चिम बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांना नव्या ऊर्जेने भारावून टाकले आहे. गंगाही इथूनच जाते आणि बंगालला जाते. बिहारच्या विजयाने बंगालमध्ये भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा केला आहे. मी बंगालच्या नागरिकांनाही सांगतो, आता भाजप तुमच्या सोबत मिळून पश्चिम बंगालमधूनही जंगलराज उखडून फेकेल.



Comments
Add Comment

UPSC : UPSCची मोठी कारवाई! AI तपासणीत परीक्षेपूर्वीच ६०० बनावट अर्ज बाद

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) २०२६ अधिक पारदर्शक (Transparent) आणि

ISSF Junior World Championship. :आयएसएसएफ ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा देदिप्यमान विजय

आयएसएसएफ (ISSF) ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०२६: भारताचा देदिप्यमान विजय; २४ पदकांसह अव्वल स्थान

Ketan Agarwal Murder : एवढा मोठा कांड केला तरी पश्चात्ताप नाही ; त्यात लॉकअपमध्ये सियाने अशी काही मागणी केली की पोलीसही झाले थक्क

Ketan Agarwal Murder : लोहगड किल्ल्यावर पती केतन अग्रवाल (Ketan Agarwal) याला शेकडो फूट खोल दरीत ढकलून ठार मारल्याच्या आरोपामुळे सध्या

Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शहीद सहा जवानांची नावे प्रथमच जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकावर होणार कायमस्वरूपी नोंद

Operation Sindoor :  जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन

Raincore Trend : ओले रस्ते, स्टायलिश अंदाज : पावसाळी फॅशनमध्ये 'रेनकोर'चा डंका!

सध्या फॅशन विश्वात 'रेनकोर' (Raincore) या नवीन ट्रेंडची जोरदार चर्चा सुरू आहे. हा ट्रेंड केवळ पावसाळी हवामानापासून

Ayodhya Ram Mandir Donation Scam : अयोध्या राम मंदिर दान घोटाळा प्रकरणात नवे वळण; चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचा राजीनामा

अयोध्या राम मंदिर दान घोटाळा (Ayodhya Ram Mandir Donation Scam) प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र