फास्टटॅग नसलेल्या वाहनचालकांना आजपासून दुप्पट पैसे मोजावे लागणार


यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्यांना १.२५ पट जास्त रकमेचा दंड


मुंबई  : नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) ने देशभरातील राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरील सुमारे १,१५० टोल प्लाझावर 'फास्टटॅग वार्षिक पास' सुविधा नुकतीच सुरू केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या या नवीन पासला खरेदीदारांकडून अतिशय जबरदस्त प्रतिसाद मिळाला. केवळ एका दिवसात १.४ लाख लोकांनी हा पास खरेदी केला. या अभूतपूर्व प्रतिसादानंतर, एनएचएआयने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, १५ नोव्हेंबरपासून, ज्या वाहनांमध्ये फास्टटॅग नसेल आणि वाहन चालकांनी ऑनलाईन पेमेंट केले तर त्यांना टोल शुल्काच्या केवळ १.२५ पट रक्कम आकारली जाईल.


ऑनलाईन कॅश पेमेंट पद्धतीमुळे विशेषतः नॉन-फास्टटॅग वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापैकी अनेक प्रवासी महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरील टोल भरण्यासाठी यूपीआय किंवा इतर डिजिटल पेमेंट पद्धतींवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. सध्याच्या नियमानुसार, ज्यांच्याकडे वैध फास्टटॅग नाही, त्यांना रोखीने व्यवहार केल्यास मानक टोल रकमेच्या दुप्पट (दोन पट) शुल्क भरावे लागते. मात्र, १५ नोव्हेंबरपासून लागू होणाऱ्या सुधारित टोल रचनेमुळे नॉन-फास्टटॅग वापरकर्त्यांना यूपीआय वापरताना केवळ नियमित शुल्काच्या १.२५ पट रक्कम भरावी लागेल. यामुळे त्यांचा आर्थिक भार कमी होईल आणि देशात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन मिळेल.


या नवीन शुल्क धोरणाचे उद्दिष्ट आणि गरज स्पष्ट करताना मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘नॅशनल हायवे फी (दरांचे निर्धारण आणि वसुली) नियम, २००८ मध्ये करण्यात आलेली ही सुधारणा, कार्यक्षम टोल वसुलीसाठी आणि टोल प्लाझावरील गर्दी कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याच्या भारत सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. सुधारित नियमांमुळे डिजिटल पेमेंटचा अवलंब वाढेल, टोल ऑपरेशन्समध्ये पारदर्शकता वाढेल आणि राष्ट्रीय महामार्गावरील वापरकर्त्यांचा एकूण अनुभव लक्षणीयरीत्या सुधारेल.’


नवीन अधिसूचनेची आजपासून अंमलबजावणी


केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक उदाहरण देऊन हे स्पष्ट केले आहे. जर एखाद्या वाहनाला वैध फास्टटॅगद्वारे १००/- इतके शुल्क भरावे लागत असेल, तर ते शुल्क रोखीने भरल्यास २००/- होईल आणि यूपीआयद्वारे भरल्यास ते १२५/- असेल. हा सुधारणा राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांसाठी प्रवासाची सुलभता वाढवणे, टोल वसुलीच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि शुल्क संकलन प्रक्रिया मजबूत करणे या उद्देशाने करण्यात आली आहे. ही नवीन अधिसूचना १५ नोव्हेंबर, २०२५ पासून अंमलात येईल.


Comments
Add Comment

CSMT परिसरात सापडलेल्या त्या बॅगेत नेमकं काय सापडलं ?

मुंबई : देशातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षेची परिस्थिती अधिक ताणलेली असताना, मुंबईत आज पुन्हा एकदा संशयास्पद

मुंबईत मागील वर्षभरात कृष्ठरोगाचे ६२० नवीन रुग्ण

येत्या १७ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत कृष्ठरोग शोध अभियान, सुमारे ४९ लाख नागरिकांची होणार तपासणी मुंबई (खास

घाटकोपर झुणझुणवाला महाविद्यालय ते अंधेरी-घाटकोपर जोड मार्गाच्या रुंदीकरणाचा मार्ग खुला

आणखी ३७ बांधकामांवर महापालिकेची कारवाई मुंबई (खास प्रतिनिधी) : घाटकोपर येथील झुणझुणवाला महाविद्यालय ते

Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीचं कारण जगजाहीर...

मुंबई : देशभरात सध्या बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar Assembly Election) प्रचंड रणधुमाळी सुरू आहे. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर

Dharmendra Hospital Video Leak : अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत क्रिटिकल; हॉस्पिटलमधील VIDEO लीक, पत्नी प्रकाश कौर ढसाढसा रडल्या

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या नाजूक प्रकृतीमुळे संपूर्ण सिनेसृष्टीत चिंतेचे वातावरण असतानाच,

मुंबईतील उद्यान विभागाच्या निविदा होणार रद्द? महापालिका उद्यान विभागाकडून अनामत स्वीकारण्याच्या परिपत्रकाचे उल्लंघन

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईतील उद्यान विभागाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी मागवण्यात आलेली निविदा वादात