चिराग पासवानांनी घेतली नितीश कुमारांची भेट! एनडीएमध्ये विकासाची नवी समीकरणे?

Bihar election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या दमदार विजयामुळे राज्याच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष मंत्री चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेऊन अभिनंदन केले.


जेडीयूने या निवडणुकीत ८५ जागा मिळवत मोठे यश मिळवले, तर चिराग पासवान यांच्या एलजेपीला १९ जागा प्राप्त झाल्या. भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला. नितीश कुमार यांच्यासोबतच्या भेटीचे काही क्षण चिराग पासवान यांनी “एनडीएच्या प्रचंड विजयाबद्दल शुभेच्छा देण्यासाठी आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली,” एक्सवर शेअर करत माहिती दिली.


पासवान म्हणाले की, बिहारच्या लोकांनी योग्य वेळेत योग्य निर्णय घेत देशाला संदेश दिला आहे. हा विजय कोणत्याही एका पक्षाचा नसून बिहारच्या नागरिकांच्या विश्वासाचा आणि त्यांच्या प्रगल्भतेचा आहे. लोक जनशक्ती पक्षाने ज्या आत्मविश्वासाने निवडणूक लढवली त्याला जनतेने भरभरून प्रतिसाद दिला, असे ते म्हणाले. एनडीएच्या सरकारमध्ये बिहारच्या विकासाला अधिक गती मिळेल आणि राज्यातील तरुण, महिला तसेच मागासवर्गीयांसाठी विशेष काम करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.


मुख्यमंत्रीपदाबद्दल विचारले असता पासवान म्हणाले की, अमित शहा यांनी स्पष्ट केले होते की मुख्यमंत्रीपदाची निवड विधिमंडळ पक्ष करणार आहे. त्यांची स्वतःची इच्छा नितीश कुमार यांनीच मुख्यमंत्री व्हावे अशी असल्याचेही त्यांनी म्हटले. २०२० मधील पराभवाचा संदर्भ देताना त्यांनी म्हटले की, त्या वेळी त्यांच्या पक्षाच्या अपयशासाठी अनेक जण जबाबदार होते आणि जेडीयूशी मतभेद असल्याच्या अफवा मुद्दाम पसरवल्या गेल्या होत्या.

Comments
Add Comment

गोव्यात नाईटक्लबमध्ये अग्नितांडव, २५ जणांचा मृत्यू; चौघांविरोधात FIR, मॅनेजरला अटक

पणजी : उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील 'बिर्च बाय रोमियो लेन' या नाईटक्लबमध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या

कारवाई का करू नये ? केंद्र सरकारची 'इंडिगो'ला नोटीस

नवी दिल्ली : इंडिगो एअरलाइन्समधील ऑपरेशनल संकट दूर करण्यासाठी आणि सामान्य परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी

प्लास्टिकवर प्रक्रिया करून तरुण बनला करोडपती

कचऱ्याचे रूपांतरण संपत्तीत दिल्ली : दिल्लीतील एका तरुणाने प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक नवीन

भारताला खुणावतेय रशियन बाजारपेठ

२०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातले

जगभरातील बालमृत्यूच्या घटनांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी

नवी दिल्ली : जगभरात जवळपास १० लाख मुले पाच वर्षांचे वय गाठण्याआधीच मृत्युमुखी पडली. कुपोषणाशी संबंधित घटक-जसे की

२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार

मंत्री एस. जयशंकर यांची राज्यसभेत माहिती नवी दिल्ली : अमेरिकेने २००९ पासून एकूण १८,८२२ भारतीय नागरिकांना हद्दपार