शिवसेनेकडून निवडणूक प्रभारींची घोषणा

सिंधुदुर्गची आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकरांवर जबाबदारी


मुंबई  : आगामी नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेकडून निवडणूक प्रभारींची गुरुवारी शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. पक्षाने राज्यभरातील ३१ जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रभारींची यादी जाहीर केली असून यात शिवसेना मंत्री खासदार यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी खास रणनीती तयार केल्याचे या यादीतून दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाकडून निवडणूक प्रभारी जाहीर करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना पक्ष आणि महायुतीला कोणताही धक्का बसू नये, यासाठी अत्यंत काटेकोर नियोजन करत राज्यभरातील ३१ जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रभारींची यादी जाहीर करण्यात आली आहे.
या प्रभारींना स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांशी समन्वय साधून पक्षाची धोरणे, विकासकामे आणि महायुती सरकारची लोकहिताची कामे आणि योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.


सिंधुदुर्गसाठी आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, रत्नागिरीसाठी मंत्री उदय सामंत, माजी आमदार सदानंद चव्हाण, मंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, रायगडसाठी मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी, पुण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, आमदार शरद सोनावणे, अहिल्यानगरसाठी आमदार विठ्ठल लंगे पाटील, माजी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार अमोल खताळ, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, धुळेसाठी आमदार मंजुळा गावित, जळगावसाठी मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार चंद्रकांत सोनावणे, आमदार अमोल पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार गिरीश चौधरी आणि नाशिकसाठी आमदार सुहास कांदे, आमदार किशोर दराडे, माजी आमदार धनराज म्हाले, माजी खासदार हेमंत गोडसे, उपनेते विजय करंजकर यांच्यावर निवडणूक प्रभारींची जबाबदारी सोपविली आहे.

Comments
Add Comment

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

जगभरात लोकप्रिय ‘रेडिओ सिलोन’ची शताब्दी

‘बिनाका गीतमाला’सह गाजलेले अनेक कार्यक्रम कोलंबो : भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या ‘रेडिओ

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ