मुंबईतील २७ टक्केच नागरिक साखरेपासून राहतात लांब, व्यायामचा अभाव आणि चुकीचा आहारामुळे असंसर्गजन्य आजारांना दिले जाते निमंत्रण

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेतील २४ प्रशासकीय विभागांमध्ये जानेवारी २०२५ पासून 'मीठ - साखर अभियान २०२५' जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने केलेल्या एका सर्वेक्षण पाहणीत असे आढळून आले की, फक्त २७ टक्के मुंबईकरांना साखरेच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम माहीत होते. मुंबईसारख्या महानगरामध्ये नागरिकांमधील व्यायामाचा अभाव आणि आहाराच्या चुकीच्या सवयी यामुळे मधुमेह, उच्चरक्तदाब, ह्दयरोग यासारख्या असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.


विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना योग्य व संतुलित आहाराचे महत्त्व पटवून दिल्यास ते नागरिकांच्या जीवनशैलीत आवश्यक तो सकारात्मक बदल घडेल. मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. मधुमेहाचा प्रादुर्भाव रोखण्याचसाठी नागरिकांनी ‘हेल्दी कॅम्पस अभियान’ यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जागतिक मधुमेह दिनानिमित्त मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केले आहे.


जागतिक आरोग्या संघटनेनुसार ३ पैकी १ एक व्यक्ति असंसर्ग आजाराने पीडित असतो. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामागील मुख्य कारणे म्हणजे नागरीकरण, बसून राहण्याची जीवनशैली, अयोग्य आहाराच्या सवयी इत्यादी होत. तसेच मुंबईमध्ये एकूण १५.६ % मधुमेहपूर्व व्यक्ती आढळले आहेत.


आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्याअंदाजानुसार, भारतामध्ये सुमारे १,२८,५०० बालक आणि किशोरवयीन मुले टाइप १ मधुमेहाने (डायबिटीज) प्रभावित आहेत. जागतिक आरोग्य संघटना व महानगरपालिका यांनी संयुक्तपणे मुंबईमध्ये सन २०२१ मध्ये केलेल्या स्टेप्स सर्वेक्षणानुसार, १८ टक्के (१८-६९ वयोगटात) व्यक्तींमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले आढळले आहे.



'हेल्दी कॅम्पस उपक्रम'


'हेल्दी कॅम्पस उपक्रम' हा मीठ-साखर अभियान म्हणून राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत मुंबईतील सुमारे १०० हून आधिक महाविद्यालयांमध्ये 'हेल्दी खा, स्वस्थ रहा, मस्त रहा' या घोषवाक्याबाबत जनजागृती करण्यात येईल. आरोग्यदायी कँटिन मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी केली जाईल. ‘राष्ट्रीय छात्र सेवा' आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांद्वारे 'हेल्दी फूड फेस्ट’ स्पर्धा आणि डिजिटल मोहीमेचे आयोजन करण्यात येणार आहे. आहार तज्ज्ञांद्वारे विद्यार्थ्यांना पोषण दूत म्हणून प्रशिक्षित केले जाईल. तसेच स्वयंपाकी, पाककला तज्ज्ञ आणि महिला स्वयंसेविका व समुदाय प्रतिनिधी यांच्या सहकार्याने कमी मीठ - साखरयुक्त पाककृती, आरोग्यदायी खाद्यपदार्थ (मेन्यू) विकसित करून समाजात आरोग्यदायी आहाराबाबत जनजागृती केली जाईल.

Comments
Add Comment

महापुरुषांची नावे संक्षिप्त घेणाऱ्यांवर कारवाई करा; शिवसेना नगरसेवकांची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या वतीने जोगेश्वरी रुग्णालयाचे नामकरण हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब

महापालिका शाळांमधील न्युट्रीबार वादात; मध्यान्ह भोजनात इस्कॉनच्या खिचडीची झाली मागणी

मुंबई: मुंबई महापालिका शाळांमधील मुलांना पोषक आहारांतर्गत देण्यात येणाऱ्या न्युट्रीबारच्या वाटपाबाबत आता

मुंबईतील टँकर माफियांची लॉबी नष्ट करा; महापालिका सभागृहात सर्वच नगरसेवकांची एकमुखी मागणी

मुंबई: मुंबईत सध्या पाण्याची काही भागांमध्ये समस्या निर्माण झाली असून ही टंचाई फक्त आणि फक्त टँकर माफियांसाठी

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात