बिहारमध्ये एनडीएचा ऐतिहासिक विजय, भाजप सर्वात मोठा पक्ष


पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा ऐतिहासिक विजय झाला. भारतीय जनता पार्टी (BJP) बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष झाली. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांनुसार भारतीय जनता पार्टी ८२ जागांवर जिंकली आणि ७ जागांवर आघाडीवर आहे. जनता दल युनायटेड (JDU) ७५ जागांवर जिंकली आणि १० जागांवर आघाडीवर आहे. लोकजनशक्ती पार्टी (रामविलास पासवान) १७ जागांवर जिंकली आणि २ जागांवर आघाडीवर आहे. हिंदुस्तानी अवाम मोर्चा सेक्युलर (HAMS) ५ जागांवर जिंकली आहे तर राष्ट्रीय लोक मोर्चा ४ जागांवर जिंकली आहे. बिहार विधानसभेच्या २४३ पैकी २०२ जागांवर एनडीए विजयी किंवा आघाडीवर आहे. भाजपच्या नेतृत्वात एनडीएने विरोधकांचा धुव्वा उडवला.


बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकासाचे मॉडेल आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सुशासनाचे मॉडेल लोकप्रिय झाले. जनतेची या दोन्हीला पसंती लाभली. पंतप्रधान मोदींनी जंगलराजच्या मुद्यावरुन थेट लालूप्रसाद यादव आणि राष्ट्रीय जनता दलाला लक्ष्य केले तर राज्य सरकारने निवडणुकीच्या काही दिवस आधीच कल्याणकारी योजनांचा पाऊस पाडला. याचा एनडीएला निवडणुकीत फायदा झाला.


मराठा चेहरा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची पार्श्वभूमी, पक्षनिष्ठा यामुळे महाराष्ट्रातले नेते असलेल्या विनोद तावडे यांना राष्ट्रीय राजकारणात संधी मिळाली. राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून विनोद तावडेंनी संघटनात्मक पातळीवर पक्षाचे काम प्रभावीरित्या केले. एनडीएच्या ऐतिहासिक विजयात विनोद तावडे यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. त्यांना भाजप नेते धर्मेंद्र प्रधान यांचीही उत्तम साथ लाभली. या जोडगोळीने बिहारमध्ये भाजपला तळागाळापर्यंत पोहोचवले. लोकगायिका मैथिली ठाकूर यांना भाजपमध्ये आणण्यात विनोद तावडेंनी महत्त्वाची भूमिका बजावली. या सर्व प्रयत्नांला यश लाभले. बिहारमध्ये भाजपने अभूतपूर्व असे यश मिळवले.


Comments
Add Comment

तुम्हाला माहित आहे का डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे ?

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट खायला आवडतं. सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Raj Thackeray: रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ?

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. यानंतर नेहमीप्रमाणे

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी महायुती सरकारकडून विशेष खबरदारी

महिलांसाठीच्या ‘वन स्टॉप सेंटर्स’साठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करणार मुंबई : महिलांवरील हिंसाचार,

Sunetra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात हालचालींना वेग; लवकरच अध्यक्षपदाचा तिढा सुटणार

मुंबई: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.