बिहारमध्ये एनडीएची सत्ता, भाजप सर्वात मोठा पक्ष


पाटणा : बिहारमध्ये विधानसभेच्या २४३ जागांसाठी ६ आणि ११ नोव्हेंबर असे दोन टप्प्यात मतदान झाले. आता मतमोजणी सुरू आहे. हाती आलेले आतापर्यंतचे कल बघता भारतीय जनता पार्टी ९० जागांवर तर जनता दल युनायटेड ८२ जागांवर, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास पासवान गट) २० आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चा (सेक्युलर) ५ जागांवर आघाडीवर आहे. एनडीएने आतापर्यंत १९७ जागांवर आघाडी घेतली आहे. बिहारमध्ये बहुमताचा जादुई आकडा १२२ आहे. एनडीएने तर त्यापेक्षा जास्त जागांवर आघाडी घेऊन स्वतःची बाजू भक्कम केली आहे. विरोधात असलेल्या महागठबंधनने निराशाजनक कामगिरी केली आहे. राष्ट्रीय जनता दल २८ जागांवर, काँग्रेस ५ आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ३ जागांवर आघाडीवर आहे. आतापर्यंतची स्थिती बघता बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरणार असे चित्र आहे. जनता दल युनायटेड राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष झाला आहे.


बिहारमध्ये सध्या नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत. पण भाजप राज्यात मोठा पक्ष झाल्यामुळे आता मुख्यमंत्री नितीश होणार की भाजपचा एखादा आमदार होणार हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे. भाजपचे नेते सध्या एनडीएचा विजय हा मुद्दा मांडत आनंद साजरा करत आहेत. पण मुख्यमंत्री या विषयावर बोलणे टाळत आहेत. यामुळे बिहारमध्ये एनडीएचा विजय झाला तरी मुख्यमंत्री या पदावरुन पुढील काही दिवस राजकारण रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



बिहार विधानसभा निवडणूक निकाल २०२५ (आघाडीवर)



भाजप ९०

जेडीयू ८२

एलजेपी (रामविलास पासवान गट) २०

एचएएम ५

आरजेडी २८

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ३

एमआयएम ५

काँग्रेस ५

राष्ट्रीय लोकमोर्चा ४

बसप १



बिहारमध्ये एकूण मतदार


बिहारमध्ये ७४.२ दशलक्ष नोंदणीकृत मतदार आहेत. यात ३९.२ दशलक्ष पुरुष आणि ३५ दशलक्ष महिला आहेत. विधानसभेसाठी बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात ६५.०८ टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात ६८.७६ टक्के मतदान झाले.



बिहार विधानसभा निवडणूक निकाल २०२०


भाजप - ७४


जेडीयू - ४३


आरजेडी - ७५


काँग्रेस - १९


कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया - ९


एमआयएम - ५




Comments
Add Comment

Vikroli Crime : 'गाणी हळू वाजव' एवढंच बोलला अन्... ; दोन सख्या भावांमध्ये रक्तरंजित खेळ; दोघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील विक्रोळी पार्कसाईट परिसरात कौटुंबिक वादातून घडलेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. राहुल

Jalgaon Gold Rate : सोने चांदीचे भाव गगनाला ! जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मोठी उलथापालथ

Jalgaon Gold Rate : जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत (Jalgaon Gold Market) गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात कमी-अधिक फरकाने

Tiranga Rally : भाजप प्रत्येक जिल्ह्यात काढणार 'तिरंगा रॅली'

- ९ ते १७ ऑगस्टदरम्यान आयोजन; १० ऑगस्टला मुंबईत २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार मुंबई :

Rickshaw-Taxi Driver : 15 ऑगस्टनंतर 'या' रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाईची शक्यता; मुदतवाढ मिळणार नाही

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाची

Ahilyanagar : शेततळ्यात बुडून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक मन हेलावणारी घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील बाहदराबाद

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशात 100 वर्षे जुने घर कोसळले; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात मध्यरात्री घडलेल्या भीषण दुर्घटनेत 100 वर्षे जुने घर कोसळून