पिसे पांजरापूर येथे ९१० दशलक्ष लिटर प्रतीदिन क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र उभारणार, आता केंद्राची क्षमता होणार १८२० दशलक्ष लिटर

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईकरांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यासाठी धरणातून आलेल्या पाण्यावर भांडुप संकुल आणि पिसे पांजरापूर येथील जलशुध्दीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते. सध्या पिसे पांजरापूर येथे ४५५ दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र असून याठिकाणी आता आणखी ९१० दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुध्दीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यामुळे याठिकाणच्या जलशुध्दीकरण प्रकल्पाची क्षमता आता अधिक वाढली जाणार आहे. या जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता प्रती दिन १८२० दशलक्ष लिटर एवढी होणार आहे. या जलशुध्दीकरण केंद्रातून पूर्व आणि पश्चिम उपनगराला पाणी पुरवठा केला जातो.


मुंबईला शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यासाठी १९७९ मध्ये म्हणजे ४६ वर्षांपूर्वी पिसे पांजरापूर येथे ४५५ दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुध्दी करण उभारण्यात आले. परंतु जलशुध्दीकरण प्रक्रियेत जलवाहिनींची झीज झाल्याने तसेच जलप्रक्रिया केंद्राचे आयुष्यमान संपुष्टात आल्याने त्याची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. भविष्यात पाणी पुरवठ्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येवू नये म्हणून ते त्वरीत बदलण्यासाठी टप्पा एकमधील बॉम्बे १मधील जलप्रक्रिया केंद्र जुने असल्यामुळे याला बांधण्यास काही वर्षे लागणार असल्याने ९१० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा नवीन जलप्रक्रिया केंद्र बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचे पाणी पुरवठा प्रकल्प विभागाच्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या जलशुध्दीकरण केंद्राची बांधणी झाल्यानंतर जुना ४५५ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचाे जलप्रक्रिया केंद्र बंद करण्यात येईल. नवीन बांधण्यात येणाऱ्या ९१० दशलक्ष लिटर प्रतिदिन जलशुदीकरण केंद्राीतील उर्वरीत ४५५ दशलक्षलिटरची अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठीही वापरली जावू शकते.



अशाप्रकारे पिसे पांजरापूर संकुलाची एकूण क्षमता सध्याच्या १३६५ वरून १८२० दशलक्ष लिटर प्रतिदिन पर्यंत वाढवली जाईल,असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नवीन जलशुध्दीकरण केंद्राची संकल्पना बॅक वॉश पुनर्वापर प्रवाहासह सामान्य जलप्रवाह क्षमता ९१० दशलक्ष लिटर प्रती दिन असेल. जलशुध्दीकरण केंद्र कमी जागेत विकसित करण्यासाठी प्रगत अशा हाय रेट ग्रॅव्हिटी फिल्ट्रेशनसह ऍडवान्स कॉग्युलेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे, हे काम पुढील चार वर्षांत पूर्ण केले जाईल आण पुढील १५ वर्षांची देखभाल संबंधित कंत्राटदार संस्थेवर राहील. येथील ७.६ हेक्टर जागेत नवीन ९१० क्षमतेचा नवीन जलप्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी वेलस्पन एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी विविध करांस ४४६३.६३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. कोटी रुपये

Comments
Add Comment

बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा

BMC Election 2026 : बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि

६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, याविरोधात