महानगरपालिका शाळांतील दोन खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर निवड

मुंबई (खास प्रतिनिधी): नुकत्याच पार पडलेल्या शासकीय क्रीडा स्पर्धांमध्ये महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी कुस्ती, मल्लखांब खेळांमध्ये चकमदार कामगिरी बजावत राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. मालाड हिंदी माध्यमिक शाळेतील अंकुश यादव (कुस्ती), शीव (सायन) मुंबई पब्लिक स्कूलमधील राजू वर्मा (मल्लखांब) या दोन विद्यार्थ्यांनी राज्य स्तरावर विजय मिळवित राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रवेश मिळविला आहे. यासोबतच चकाला हिंदी माध्यमिक शाळेतील सुजीत बिंद (मुष्टियुद्ध) या विद्यार्थ्याने राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला.


महानगरपालिकेच्या विविध माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासह त्यांच्या शारीरिक विकासासाठी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी करून घेतले जाते. या स्पर्धांतील सहभागामुळे विद्यार्थ्यांमधून नेतृत्वगुण आणि खिलाडू वृत्तीही जोपासली जाते.


मालाड हिंदी माध्यमिक शाळेतील अंकुश यादव या विद्यार्थ्यांने राज्य स्तरावर पार पडलेल्या १७ वर्ष वयोगटात कुस्ती स्पर्धेत विजय मिळविला. या विजयामुळे अंकुशची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. शीव (सायन) मुंबई पब्लिक स्कूलचा विद्यार्थी राजू वर्मा याने राज्य स्तरावर पार पडलेल्या १४ वर्ष वयोगटात मल्लखांब स्पर्धेत दाखविलेल्या प्रात्यक्षिकांमुळे त्याचीही राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. तसेच चकाला हिंदी माध्यमिक शाळेतील सुजीत बिंद या विद्यार्थ्यांने राष्ट्रीय स्तरावरील १४ वर्ष वयोगटात मुष्टियुद्ध (बॉक्सिंग) स्पर्धेत सहभाग घेतला.



रग्बी संघाची हॅटट्रिक


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डी. एन. नगर मुंबई पब्लिक स्कूलमधील रग्बी संघाने विभाग स्तरावर दाखविलेल्या सांघिक कौशल्यामुळे त्यांची सलग तिसऱयांदा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शासकीय क्रीडा स्पर्धांमध्ये महानगरपालिकेच्या डी. एन. नगर मुंबई पब्लिक स्कूलमधील १४ वर्ष वयोगटातील मुलांच्या संघाने रग्बी खेळात प्रथम क्रमांक मिळवत सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरीय स्पर्धेत मजल मारली आहे. तसेच याच वयोगटातील मुलींच्या संघाची देखील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १७ वर्ष वयोगटात याच शाळेतील मुलींच्या संघाने विभाग स्तरावर विजय मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे. या यशाबद्दल रग्बी संघाचे प्रशिक्षक ओमकार तळेकर यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.








Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला