६५ व्या वर्षी 'आयर्नमॅन'चा बहुमान! गोवा येथे झालेल्या ७०.३ आयर्नमॅन स्पर्धेत आष्टा येथील डॉ. अरुण सरडे यांची विक्रमी कामगिरी

दोडामार्ग : जिद्द, मेहनत आणि आरोग्यदायी जीवनशैलीच्या बळावर कोणतीही गोष्ट अशक्य नसते, हे सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील डॉ. अरुण सरडे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. गोव्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या ७०.३ गोवा आयर्नमॅन स्पर्धेत वयाच्या ६५ व्या वर्षी डॉ. सरडे यांनी आष्टा नगरीतील पहिले 'आयर्नमॅन' होण्याचा ऐतिहासिक बहुमान पटकावला आहे. या अत्यंत खडतर मानल्या जाणाऱ्या स्पर्धेत स्पर्धकांना सलग ८.३० तासांच्या निर्धारित वेळेत तीन टप्पे पूर्ण करायचे होते.



१.९ किमी पोहणे, ९० किमी सायकलिंग,​२१.१ किमी धावणे हे ​तिन्ही टप्पे डॉ. सरडे यांनी केवळ ७ तास ४९ मिनिटे या विक्रमी वेळेत पूर्ण करून आपली शारीरिक क्षमता आणि मानसिक कणखरता सिद्ध केली. ​डॉ. सरडे यांच्या या कामगिरीमुळे सांगली जिल्हा सह आष्टा शहराची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यांनी ६०-६५ वयोगटात जागतिक स्तरावर ५वा क्रमांक पटकावला, तर याच वयोगटातील भारतीय स्पर्धकांमध्ये दुसरा क्रमांक मिळवून देशाचे प्रतिनिधित्व केले.



​डॉ. अरुण सरडे यांनी मिळवलेल्या या अभूतपूर्व यशामुळे त्यांचे आष्टा शहरातून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदन होत आहे. त्यांची ही कामगिरी युवा पिढीला आरोग्य, फिटनेस आणि वेळेचे व्यवस्थापन याबद्दल प्रेरणा देणारी ठरली आहे

Comments
Add Comment

Davkhare : गावदेवी भाजी मंडई आग दुर्घटनेप्रकरणी दुर्घटनाग्रस्तांना नुकसानभरपाई द्या, आमदार डावखरेंची मागणी

Thane : ठाण्यातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या गजबजलेल्या गावदेवी भाजी मंडईमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून

Prasad Lad : प्रसाद लाड यांनी स्वीकारले जरांगे पाटील यांचे चर्चेचे निमंत्रण; उद्या आंतरवलीत भेट

मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार?; २३ मे च्या 'डेडलाईन'पूर्वी सरकारच्या वतीने मध्यस्थी मुंबई : मराठा आरक्षणाच्या

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका

सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; ग्रामविकास विभाग प्रस्ताव तयार करणार मुंबई : ग्रामपंचायत

वाई येथे लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

वाईच्या लघुकुंभ मेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार:-जयकुमार गोरे सातारा वाई नगरीला “दक्षिण काशी” अशी ओळख

पक्षसंघटनेची एकजुटीने मजबूत बांधणी करणार

प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांचा निर्धार मुंबई; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व समज-गैरसमज दूर झाले आहेत.

BCCI : निवड समितीचा मोठा निर्णय! भारत अ संघात अचानक बदल; या ऑलराउंडरला मिळाली संधी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने भारत A संघात मोठा बदल केला आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यातील ट्राय