महानगरपालिका शाळांतील दोन खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर निवड

मुंबई (खास प्रतिनिधी): नुकत्याच पार पडलेल्या शासकीय क्रीडा स्पर्धांमध्ये महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी कुस्ती, मल्लखांब खेळांमध्ये चकमदार कामगिरी बजावत राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. मालाड हिंदी माध्यमिक शाळेतील अंकुश यादव (कुस्ती), शीव (सायन) मुंबई पब्लिक स्कूलमधील राजू वर्मा (मल्लखांब) या दोन विद्यार्थ्यांनी राज्य स्तरावर विजय मिळवित राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रवेश मिळविला आहे. यासोबतच चकाला हिंदी माध्यमिक शाळेतील सुजीत बिंद (मुष्टियुद्ध) या विद्यार्थ्याने राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला.


महानगरपालिकेच्या विविध माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासह त्यांच्या शारीरिक विकासासाठी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी करून घेतले जाते. या स्पर्धांतील सहभागामुळे विद्यार्थ्यांमधून नेतृत्वगुण आणि खिलाडू वृत्तीही जोपासली जाते.


मालाड हिंदी माध्यमिक शाळेतील अंकुश यादव या विद्यार्थ्यांने राज्य स्तरावर पार पडलेल्या १७ वर्ष वयोगटात कुस्ती स्पर्धेत विजय मिळविला. या विजयामुळे अंकुशची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. शीव (सायन) मुंबई पब्लिक स्कूलचा विद्यार्थी राजू वर्मा याने राज्य स्तरावर पार पडलेल्या १४ वर्ष वयोगटात मल्लखांब स्पर्धेत दाखविलेल्या प्रात्यक्षिकांमुळे त्याचीही राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. तसेच चकाला हिंदी माध्यमिक शाळेतील सुजीत बिंद या विद्यार्थ्यांने राष्ट्रीय स्तरावरील १४ वर्ष वयोगटात मुष्टियुद्ध (बॉक्सिंग) स्पर्धेत सहभाग घेतला.



रग्बी संघाची हॅटट्रिक


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डी. एन. नगर मुंबई पब्लिक स्कूलमधील रग्बी संघाने विभाग स्तरावर दाखविलेल्या सांघिक कौशल्यामुळे त्यांची सलग तिसऱयांदा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शासकीय क्रीडा स्पर्धांमध्ये महानगरपालिकेच्या डी. एन. नगर मुंबई पब्लिक स्कूलमधील १४ वर्ष वयोगटातील मुलांच्या संघाने रग्बी खेळात प्रथम क्रमांक मिळवत सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरीय स्पर्धेत मजल मारली आहे. तसेच याच वयोगटातील मुलींच्या संघाची देखील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १७ वर्ष वयोगटात याच शाळेतील मुलींच्या संघाने विभाग स्तरावर विजय मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे. या यशाबद्दल रग्बी संघाचे प्रशिक्षक ओमकार तळेकर यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.








Comments
Add Comment

Cyber Crime : मुंबईत सायबर गुन्ह्यातील १०० कोटी वाचविण्यात यश

मुंबई : गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सायबर पोलिसांनी

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका

सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; ग्रामविकास विभाग प्रस्ताव तयार करणार मुंबई : ग्रामपंचायत

वाई येथे लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

वाईच्या लघुकुंभ मेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार:-जयकुमार गोरे सातारा वाई नगरीला “दक्षिण काशी” अशी ओळख

गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्यांना आता 'मकोका' लागणार!

गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी; बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाईसाठी संयुक्त भरारी पथके आणि सीमांवर

वरिष्ठांनी भाजपसोबत जायचे ठरवल्यास दुसरा पर्याय निवडेन!

आ. रोहित पवार यांचा दावा; आजोबा आणि आत्याला दिला इशारा मुंबई : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय

एकनाथ शिंदेंकडून २०२९ साठी स्वबळाची चाचपणी?

२०० मतदारसंघात संघटनात्मक बांधणी सुरू; मंत्री उदय सामंत आणि श्रीकांत शिंदेंवर सोपवली मोठी जबाबदारी मुंबई :