शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दक्षिण आफ्रिका विरोधात खेळण्यास सज्ज! ऐतिहासिक ईडन गार्डनवर होणार पहिला कसोटी सामना

कोलकता: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना १४ नोव्हेंबरपासून कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डनवर खेळला जाणार आहे. हा सामना भारतासाठी खास आहे कारण भारत सहा वर्षांनी या मैदानावर कसोटी क्रिकेट खेळणार आहे. भारताने नोव्हेंबर २०१९ मध्ये या मैदानात शेवटचा कसोटी सामना बांगलादेश विरुद्ध खेळला होता. आता शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पुन्हा एकदा या प्रतिष्ठित मैदानात उतरण्यास सज्ज झाली आहे.


भारताने या मैदानावर एकूण ४२ कसोटी सामने खेळले आहेत. या ऐतिहासिक मैदानावर भारताचा पहिला कसोटी सामना १९३४ मध्ये खेळला गेला होता. तर शेवटचा सामना २०१९ मध्ये खेळला गेला होता. भारताने या मैदानावर १३ सामने जिंकले असून ९ सामने गमावले आहेत. तर २० सामने अनिर्णित राहिले आहेत. ईडन गार्डनवर भारताचा पहिला विजय १९६१-६२ मध्ये इंग्लंडविरुद्ध १८७ धावांनी झाला होता. तर शेवटचा पराभव २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध झाला होता.



या मैदानावर सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज


ईडन गार्डनवर काळ्या मातीची खेळपट्टी नेहमीच फलंदाजांना अनुकूल राहिली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण हे १० सामन्यांत १२१७ धावांसह यादीत अव्वल स्थानावर असून राहुल द्रविड ९६२ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर सचिन तेंडुलकरने या मैदानावर ८७२ धावा केल्या आहेत.



सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज


ही खेळपट्टी नेहमीच फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरली आहे. हरभजन सिंगने ७ सामन्यात ४६ जणांना विकेट घेत बाद करत यादीत अव्वल स्थानावर आहे. त्याच्यानंतर अनिल कुंबळे आणि बिशन सिंग बेदी यांचा क्रमांक लागतो. वेगवान गोलंदाजांमध्ये कपिल देव यांनी सुद्धा या मैदानावर येथे चांगली कामगिरी केली.



भारताचा कसोटी संघ


शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक) (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद कुमार पटेल, अक्षर कुमार रेड्डी, अक्षर कुमार पटेल, ऋषभ रेड्डी. आकाश दीप.


मालिकेतील पहिला कसोटी सामना १४ नोव्हेंबरपासून कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे खेळला जाईल , तर दुसरा कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळला जाईल.

 

 
Comments
Add Comment

वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायक मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या

भारताला मोठा धक्का, नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाचा खेळाडू रुग्णालयात

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया

वानिंदू हसरंगा विश्वचषकातून बाहेर

कोलंबो  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य

द. आफ्रिकेचा डबल सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय, अफगाणिस्तानची झुंज अपयशी

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुधवारी क्रिकेट इतिहासातील सर्वात नाट्यमय आणि चित्तथरारक सामना पाहायला

आयर्लंडची दाणादाण, ऑस्ट्रेलिया ६७ धावांनी विजयी

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये आयर्लंड विरुद्धचा सामना ऑस्ट्रेलियाने ६७ धावांनी जिंकला. या

अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा विजय

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील अमेरिकेविरुद्धच्या साखळी सामन्यात पाकिस्तानचा ३२ धावांनी विजय