राज्यात पाऊस आणि थंडीचं दुहेरी संकट; हवामान खात्याकडून १२ आणि १३ नोव्हेंबरला अलर्ट

 मुंबई : नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच पावसाने धडक दिल्यानंतर आता वातावरणात मोठा बदल पाहायला मिळतोय. देशभरात काही ठिकाणी पाऊस, तर काही भागात कडाक्याची थंडी अशी स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांसाठी उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा इशारा दिला असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत आहे.


हवामान खात्याच्या माहितीनुसार, चंदीगड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढणार आहे. त्याच वेळी महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका पाऊस आणि थंड वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.


अरबी समुद्रावर केरळच्या किनाऱ्याजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असल्याने दक्षिण भारतातील हवामानही अस्थिर आहे. तामिळनाडू आणि केरळच्या काही भागांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असं हवामान खात्याचं भाकीत आहे.


दरम्यान, महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, निफाड, परभणी आणि जेऊर या भागांत थंडीचा कडाका अधिक जाणवतोय. पुण्यातही किमान तापमान 13.4 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं असून, पुढील काही दिवसांत तापमान आणखी 4 ते 5 अंशांनी घटण्याची शक्यता वर्तवली आहे.


गेल्या काही दिवसांपासून संध्याकाळी आणि पहाटे गारवा वाढला आहे. हवेत कोरडेपणा जाणवू लागला असून, नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.


महाराष्ट्रातील काही भागांमध्ये १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पावसासोबत थंडीची लाटही नागरिकांना जाणवणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या आठवड्यात राज्यातील हवामान बदलत राहण्याची शक्यता असून, हिवाळ्याची चाहूल आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

महापुरुषांची नावे संक्षिप्त घेणाऱ्यांवर कारवाई करा; शिवसेना नगरसेवकांची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या वतीने जोगेश्वरी रुग्णालयाचे नामकरण हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब

महापालिका शाळांमधील न्युट्रीबार वादात; मध्यान्ह भोजनात इस्कॉनच्या खिचडीची झाली मागणी

मुंबई: मुंबई महापालिका शाळांमधील मुलांना पोषक आहारांतर्गत देण्यात येणाऱ्या न्युट्रीबारच्या वाटपाबाबत आता

मुंबईतील टँकर माफियांची लॉबी नष्ट करा; महापालिका सभागृहात सर्वच नगरसेवकांची एकमुखी मागणी

मुंबई: मुंबईत सध्या पाण्याची काही भागांमध्ये समस्या निर्माण झाली असून ही टंचाई फक्त आणि फक्त टँकर माफियांसाठी

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात