राज्यात पाऊस आणि थंडीचं दुहेरी संकट; हवामान खात्याकडून १२ आणि १३ नोव्हेंबरला अलर्ट

 मुंबई : नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच पावसाने धडक दिल्यानंतर आता वातावरणात मोठा बदल पाहायला मिळतोय. देशभरात काही ठिकाणी पाऊस, तर काही भागात कडाक्याची थंडी अशी स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांसाठी उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा इशारा दिला असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत आहे.


हवामान खात्याच्या माहितीनुसार, चंदीगड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढणार आहे. त्याच वेळी महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका पाऊस आणि थंड वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.


अरबी समुद्रावर केरळच्या किनाऱ्याजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असल्याने दक्षिण भारतातील हवामानही अस्थिर आहे. तामिळनाडू आणि केरळच्या काही भागांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असं हवामान खात्याचं भाकीत आहे.


दरम्यान, महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, निफाड, परभणी आणि जेऊर या भागांत थंडीचा कडाका अधिक जाणवतोय. पुण्यातही किमान तापमान 13.4 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं असून, पुढील काही दिवसांत तापमान आणखी 4 ते 5 अंशांनी घटण्याची शक्यता वर्तवली आहे.


गेल्या काही दिवसांपासून संध्याकाळी आणि पहाटे गारवा वाढला आहे. हवेत कोरडेपणा जाणवू लागला असून, नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.


महाराष्ट्रातील काही भागांमध्ये १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पावसासोबत थंडीची लाटही नागरिकांना जाणवणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या आठवड्यात राज्यातील हवामान बदलत राहण्याची शक्यता असून, हिवाळ्याची चाहूल आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५

Eknath Shinde : एकनाथ शिंदे-गणेश नाईक यांच्यात मनोमिलन? - मंत्रालयात बंद दाराआड चर्चा

नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तीढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : "ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा असून, जनतेला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई

Devendra Fadanvis : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा धडाका! नगराध्यक्षांची ताकद वाढली; आता मिळणार थेट...वाचा सविस्तर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता