बिहारमध्ये १२२ जागांसाठी दुसऱ्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात आज पार पडणार आहे. बिहारच्या अंतिम टप्प्यातील मतदानात एकूण १२२ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. या टप्प्यातील निवडणूकीमध्ये एकूण १,३०२ उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद होणार आहे. मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेच्या देखरेखीखाली मतदानाला सुरुवात झाली आहे.


बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६५.८ टक्के मतदान झाले, ज्यामुळे मागील सर्व आकडेवारी मोडीस निघाली. यामुळे दुसऱ्या टप्प्यातही भरपूर मतदान होण्याची अपेक्षा आहे. आज होणाऱ्या मतदानात नेपाळ सीमेलगच्या जिल्ह्यांमध्ये श्चिम चंपारण, पूर्व चंपारण, सीतामढी, मधुबनी, सुपौल, अरारिया आणि किशनगंज यांचा समावेश आहे. ज्यात सीमांचलचा भाग महत्त्वाचा मानला जात आहे. कारण यातील बहुसंख्य जिल्हे मुस्लीमबहुल असल्याने येथे घुसखोरीचा मुद्दा धरून ठेवण्यात आला होता.




दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी ४५,३९९ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. ज्यात ४०,०७३ मतदारसंघ ग्रामीण भागातील आहे. तर मतदारांमध्ये ३० ते ६० वर्षे वयोगटात २.२८ कोटी मतदार असून १८ ते १९ वर्षे वयोगटात ७.६९ लाख मतदार आहेत. यातील अनेकजण पहिल्यांदा मतदान करणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे १२२ मतदारसंघांमध्ये होणाऱ्या या निवडणूकीत एकूण १.७५ कोटी महिला मतदार आहेत.

Comments
Add Comment

Suvendu Adhikari's PA Murder : बंगालची निवडणूक संपली अन् रक्ताचा थरार रंगला, शुभेंदू अधिकारी यांच्या PA ची हत्या

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर झाला. निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा

Vietnamese President To Lam : व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी पंतप्रधान मोदींची हैदराबाद हाऊसमध्ये भेट

नवी दिल्ली : तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी आज हैदराबाद हाऊस येथे

Shimla Court : शिमला येथे न्यायालय आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय उडवण्याची धमकी

“दिल्लीपर्यंत आवाज जाईल” असा पोस्टरमधून इशारा, सुरक्षा यंत्रणा सतर्क शिमला : हिमाचल प्रदेशातील शिमला येथील तीन

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’चा अपमान करणे आता गंभीर गुन्हा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, कायद्यात दुरुस्ती

नवी दिल्ली : देशभक्तीशी निगडित प्रतीकांचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ‘वंदे

Supreme Court News : सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या वाढणार; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील न्यायव्यवस्था अधिक सक्षम आणि जलद करण्याच्या दिशेने मोठं पाऊल उचललं आहे.

Scooter Blast Near BSF Headquarters : BSF मुख्यालयाजवळ स्कूटरचा स्फोट; जालंधरमध्ये खळबळ, सर्व बाजूंनी तपास सुरू

पंजाब : पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल (BSF) मुख्यालयाजवळ अचानक स्कूटरचा स्फोट झाल्याची धक्कादायक