पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात आज पार पडणार आहे. बिहारच्या अंतिम टप्प्यातील मतदानात एकूण १२२ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. या टप्प्यातील निवडणूकीमध्ये एकूण १,३०२ उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद होणार आहे. मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेच्या देखरेखीखाली मतदानाला सुरुवात झाली आहे.
बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६५.८ टक्के मतदान झाले, ज्यामुळे मागील सर्व आकडेवारी मोडीस निघाली. यामुळे दुसऱ्या टप्प्यातही भरपूर मतदान होण्याची अपेक्षा आहे. आज होणाऱ्या मतदानात नेपाळ सीमेलगच्या जिल्ह्यांमध्ये श्चिम चंपारण, पूर्व चंपारण, सीतामढी, मधुबनी, सुपौल, अरारिया आणि किशनगंज यांचा समावेश आहे. ज्यात सीमांचलचा भाग महत्त्वाचा मानला जात आहे. कारण यातील बहुसंख्य जिल्हे मुस्लीमबहुल असल्याने येथे घुसखोरीचा मुद्दा धरून ठेवण्यात आला होता.
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली (Delhi) सोमवारी सायंकाळी एका मोठ्या स्फोटाने हादरली. येथील ऐतिहासिक लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या (Red Fort Metro Station) गेट क्रमांक ...
दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी ४५,३९९ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. ज्यात ४०,०७३ मतदारसंघ ग्रामीण भागातील आहे. तर मतदारांमध्ये ३० ते ६० वर्षे वयोगटात २.२८ कोटी मतदार असून १८ ते १९ वर्षे वयोगटात ७.६९ लाख मतदार आहेत. यातील अनेकजण पहिल्यांदा मतदान करणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे १२२ मतदारसंघांमध्ये होणाऱ्या या निवडणूकीत एकूण १.७५ कोटी महिला मतदार आहेत.