राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी ब्रिटिश सरकारकडे करणे अपेक्षित होते का ?

सरसंघचालक मोहन भागवत यांचा काँग्रेसला सवाल


मुंबई : "आरएसएसची स्थापना १९२५ मध्ये झाली; मग आम्ही ब्रिटिश सरकारकडे संघटनेची नोंदणी करावी, अशी अपेक्षा करता का?" असा सवाल करत "आम्हाला व्यक्तींची संघटना म्हणून वर्गीकृत केले आहे आणि आम्ही एक मान्यताप्राप्त संघटना आहोत," असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी स्पष्ट केले.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) १०० व्या वर्धापन दिनानिमित्त बंगळूरु याठिकाणी आयोजित दोन दिवसांच्या व्याख्यानमालेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भाषण केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अलीकडेच आरएसएसवर बंदी घालायला हवी असे म्हटले होते. तसेच यानंतर खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी सरकारी संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी आरएसएसच्या उपक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यांनी आरएसएसचा नोंदणी क्रमांक आणि त्यांच्या निधीच्या स्रोतावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर आता सरसंघचालकांनी प्रत्युत्तर दिले आहे.


यावेळी भागवत म्हणाले की, आयकर विभाग आणि न्यायालयांनी आरएसएसला व्यक्तींची संघटना म्हणून संबोधले आहे. संघटनेला आयकरातून सूट देण्यात आली आहे. "आमच्यावर तीनदा बंदी घालण्यात आली. म्हणून सरकारने आम्हाला मान्यता दिली आहे. जर आम्ही तिथे नसतो तर त्यांनी कोणावर बंदी घातली?" असा सवालही सरसंघचालकांनी केला.

Comments
Add Comment

Maharashtra Monsoon Update : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

- कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात सतर्कतेचे आवाहन मुंबई : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम

Devendra Fadnavis : "तुका म्हणे उगे रहावे..."; म्हणत दिल्लीत जाण्याच्या चर्चांना फडणवीसांनी दिला पूर्णविराम

- दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा फुलस्टॉप! 'जे मिळालंय तेच सर्वोत्तम', समाधानाचा मंत्र" पंढरपूर :

Devendra Fadnavis : "पंढरपूर कॉरिडॉरमुळे भाविकांना मोठा दिलासा, कोणावरही अन्याय होणार नाही"; आषाढी एकादशीच्या महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा

- अडीच वर्षांत पूर्ण होणार मंदिर परिसर विकास, वारकऱ्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार पंढरपूर : आषाढी

Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीला पंढरपुरात भक्तीचा महासागर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त संपूर्ण पंढरपूर (Pandharpur) विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेले आहे. लाखो

Ashadhi Wari 2026 : आषाढी वारी दरम्यान प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णाची केली विचारपूस

पंढरपूर : आषाढी वारी (Ashadhi Wari) निमित्त पंढरपूर (Pandharpur) येथे आलेल्या एका भाविकाला अचानक छातीत त्रास (Chest Pain) जाणवू लागल्याने

Ashadhi Ekdashi 2026 : सलग २० वर्षे वारीचं फळ! धाराशिवच्या माने दाम्पत्याला विठुरायाच्या महापूजेचा मान

पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त पंढरपूर (Pandharpur) येथे लाखो वारकऱ्यांच्या (Warkari) उपस्थितीत विठ्ठल-रुक्मिणीची