Tata-Mestry Clash: मेहली मिस्त्री यांचा 'युटर्न' आपले कॅवेटच मागे घेतले म्हणाले..

प्रतिनिधी:मेहली मिस्त्री यांनी अचानक युटर्न घेत आपले महाराष्ट्र धर्मादायी आयुक्तालयात दिलेले कॅवेट काढून घेतले आहे. त्यामुळे टाटा समुहाच्या संचालक मंडळातील एकप्रकारे आपला हिस्सा सोडल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. प्रामुख्याने आपली बाजू न ऐकता आपल्याला टाटा संचालक मंडळाने काढले असे म्हणणे त्यांनी आयुक्तांकडे मांडले होते त्यामुळे कुठल्याही नियुक्तीचा निर्णय घेताना आपली बाजू न मांडण्याआधी निर्णयाला स्थगिती द्यावी याची विनंती त्यांनी नियामकाला केली होती. मात्र स्वखुषीने पुन्हा त्यांनी आपल्या कॅवेट काढून घेतले आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांकडे नव्याने प्रस्ताव पाठवलेला प्रस्ताव टाटा समुहानेही मागे घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.


टाटा समुह देखील कायदेशीर पेचप्रसंग लढण्यासाठी सज्ज झाला होता मात्र आता कॅवेट काढल्याने अघोषित समझोता झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात आपल्या आधीच्या टाटा समुहाला लिहीलेल्या पत्रकाप्रमाणे, 'टाटा समुहात कुठलीही वादग्रस्त घटनांशी जोडला जाऊ नये अशी माझी इच्छा ' असल्याचेही त्यांनी पुनरुच्चार अनेक वादावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे. बहुमताच्या आधारावर मेहली मिस्त्री यांची संचालक मंडळातून हकालपट्टी करण्यात आली होती. गेल्या महिन्यात टाटा समुहाच्या संचालक मंडळाच्या संचालकांची मुदत संपली होती. मात्र संचालक विजय सिंह यांच्यासह सी वेणुगोपाल यांना मुदतवाढ देण्यात आली होती. यापूर्वी नोएल टाटा यांची रतन टाटा यांच्या निधनानंतर ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली होती.


नोएल टाटा अध्यक्ष झाल्यापासून आणखीनच कंपनीचे प्रभावशाली भागभांडवलधारक व माजी संचालक व शापोरजी पालोनजी समूहाचे सर्वेसर्वा मेहली मिस्त्री यांच्यात संघर्ष सुरु झाला होता. शापोरजी पालोनजी समुहाकडे टाटा सन्समधील १७% भागभांडवल (Stake) आहे तर टाटा ट्रस्टचा (टाटा कुटुंबाचा) ६६% भागभांडवल कंपनीत आहे.

Comments
Add Comment

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही आता 'स्वीकृत सदस्य'

मुंबई : महापालिका, नगरपालिकांप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही 'स्वीकृत सदस्यां'च्या नियुक्तीचा

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशन संपण्यापूर्वीच मुख्यमंत्री नुकसानभरपाई जाहीर करणार

मुंबई : कोकणातील आंबा व काजू पिकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आज विधान भवन, मुंबई येथे आदरणीय मुख्यमंत्री

धर्मांतर विरोधी विधेयकात घुमला २००४ चा आवाज, डॉ. नीलम गोऱ्हेंनी सभागृहात जागवल्या जुन्या आठवणी

मुंबई: महाराष्ट्रात प्रलोभन किंवा बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या समस्येला आळा घालण्यासाठी आज विधान परिषदेत

धर्मस्वातंत्र्य कायद्यामुळे आमिष, बळजबरी करणाऱ्यांचे कंबरडे मोडणार!

मुंबई : राज्यातील १४ कोटी जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या प्रकारांना आळा