दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ कारमध्ये भीषण स्फोट! दहशतवादी कटाचा संशय; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली (Delhi) सोमवारी सायंकाळी एका मोठ्या स्फोटाने हादरली. येथील ऐतिहासिक लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या (Red Fort Metro Station) गेट क्रमांक एकजवळील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारमध्ये सायंकाळी साधारण ६ वाजून ४५ मिनिटांनी हा शक्तिशाली स्फोट झाला. या भीषण घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून दिल्लीत हाय अलर्ट (High Alert) जारी करण्यात आला आहे.


स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, स्फोट झालेल्या कारसह आजूबाजूच्या आणखी तीन गाड्यांना लागलीच आग लागली आणि परिसर धुराने व्यापला. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत किमान आठ जणांचा मृत्यू झाल्याची तर १५ जण जखमी झाल्याची भीती व्यक्त होत आहे. जखमी आणि मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्फोटानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) सुमारे सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले.


?si=tn46B0b01LQi-BRh

ज्या ठिकाणी हा स्फोट झाला, ते ठिकाण लाल किल्ल्यापासून (Red Fort) केवळ ८०० मीटर अंतरावर आहे आणि हा भाग उच्च सुरक्षा (High Security Zone) असलेला तसेच नेहमी गजबजलेला असतो. विशेषतः सायंकाळच्या वेळी येथे पर्यटकांची आणि नागरिकांची मोठी गर्दी असते. नेमक्या याच वेळी हा स्फोट झाला.


या घटनेनंतर, खबरदारी म्हणून लाल किल्ला परिसर तातडीने रिकामा करण्यात आला असून, दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी परिसराचा ताबा घेतला आहे. स्फोटाचे नेमके स्वरूप आणि कारण काय आहे, याचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाचे (NSG) वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.


गेल्या चार दिवसांत, म्हणजेच ७ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत आयसिसच्या चार दहशतवाद्यांना (ISIS Terrorists) मोठ्या प्रमाणात स्फोटकांसह अटक केली आहे. याच पार्श्वभूमीवर लाल किल्ल्याजवळ झालेल्या या स्फोटाकडे अत्यंत गंभीरपणे आणि दहशतवादी कटाच्या संशयाने पाहिले जात आहे. सुरक्षा यंत्रणा या सर्व शक्यतांच्या आधारावर कसून तपास करत आहेत. स्फोटामागील खरे कारण आणि सूत्रधार लवकरच समोर येतील, अशी अपेक्षा आहे.


Comments
Add Comment

उड्डाणानंतर दिल्ली - मुंबई विमानात बिघाड, इंजिन हवेतच पडलं बंद

नवी दिल्ली : दिल्लीहून मुंबईकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात उड्डाणानंतर अवघ्या ४० मिनिटांत तांत्रिक

"दिपू दासच्या मृत्यूला जबाबदार कोण?" बंगालमधील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कोलकाता : भारतीय राजकारणात पश्चिम बंगाल हे नेहमीच संघर्षाचे केंद्र राहिले आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी

माजी अग्निवीरांना सीमा सुरक्षा दलातील भरतीत ५० टक्के कोटा

मोदी सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली : माजी अग्निवीरांना आता सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) ५० टक्के कोटा निश्चित

विवाह हे केवळ शारीरिक संतुष्टीचे साधन नव्हे...

‘लिव्ह-इन रिलेशनशिप’वर सरसंघचालक मोहन भागवत यांचे स्पष्ट मत कोलकाता : "कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक

रेल्वे प्रवासभाड्यात वाढ

२६ डिसेंबरपासून अंमलबजावणी नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार