महिलांच्या सक्षमीकरणातच हिंदू राष्ट्राचे सक्षमीकरण : मंत्री नितेश राणे

गणेशगुळे येथे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या शिलालेखाचे अनावरण
राष्ट्र सेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठानच्या कार्याची प्रशंसा


रत्नागिरी : महिलांना सक्षम करणे म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणे हा संदेश आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला गेला असून राष्ट्र सेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठान यांचे हे मोठे काम आहे, असे उद्गार मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी काढले. त्यांच्या हस्ते आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्याच्या मूळस्थानी, म्हणजेच रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथे शिलालेखाचे अनावरण रविवारी करण्यात आले.


राष्ट्रसेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठान, रत्नागिरी यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला माजी सरपंच श्रावणी रांगणकर यांच्यासह कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या आणि राष्ट्रसेविका समितीच्या कोकण प्रांत सहकार्यवाहिका पद्मजा अभ्यंकर, रेणुका प्रतिष्ठान रत्नागिरीच्या अध्यक्ष दीपा पाटकर, जिल्हा दक्षिण रत्नागिरी कार्यवाहिका मीरा भिडे आणि कोकण प्रांत सहकार्यवाहिका उमा दांडेकर यावेळी उपस्थित होत्या. समिति शाखेच्यावतीने ध्वजारोहण, घोष वादन, प्रार्थना, ध्वजावतरण, शिवस्तुती पठण, सेविकांची विविध प्रात्यक्षिके आदी कार्यक्रम झाले.


यावेळी बोलताना राणे म्हणाले अतिशय शिस्तबद्ध असलेला हा कार्यक्रम मनाला स्पर्श करणारा होता. या गावाला भेट देणाऱ्या लोकांसाठी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा हा शिलालेख त्यांच्या कार्याचा परिचय करून देईल. त्याशिवाय समितीचे अनेक उपक्रम चांगले आहेत. कोकणात स्त्रीशक्ती प्रबळ असताना ती भक्कम बनविण्याचे मोठे काम राष्ट्र सेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठान या उपक्रमांच्या माध्यमातून करत आहे हे सध्याच्या काळात अत्यंत आवश्यक आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिला, माता भगिनींचे योगदान मोठे आहे.


रत्नागिरी सिंधुदुर्गमधे एकूण लोकसंख्येमध्ये ६२ टक्के महिला आहेत. त्यांना सक्षम करणे आणि त्यातून कोकणचा विकास करणे महत्त्वाचे आहे. आपल्या अलौकिक इतिहासाचे स्मरण करत असतानाच आजच्या काळात महिलांना सक्षम करणे म्हणजेच हिंदू राष्ट्राला सक्षम करणे हाच संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला आहे असे ना. राणे म्हणाले.


लव्ह जिहाद या अत्यंत गंभीर सामाजिक प्रश्नावर कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मुलींची सुरक्षितता किती महत्त्वाची आहे, त्यांना शारीरिक आणि मानसिक सक्षम करणे किती आवश्यक आहे हे लक्षात येते आणि त्याचवेळी आज ज्या पद्धतीने राष्ट्र सेविका समिती करत असलेल्या कामाचे महत्त्व वाढते. आज हिंदू समाज म्हणून एकत्र येण्याची गरज आहे हे ओळखणे गरजेचे आहे. अनेक सामाजिक प्रश्नांवर जनजागृतीची गरज आहे, आजूबाजूला असलेल्या कटू वास्तवाला सामोरे गेले पाहिजे असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

Nashik : टीसीएस धर्मांतर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, पीडितेचं नाव बदललं अन्....

नाशिक : नाशिक शहरातील टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या

Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्तीबाबत नवा फॉर्म्युला

दंडात्मक कारवाईला तूर्तास ब्रेक; १ मेपासून राज्यव्यापी मोहीम, चालकांना सहा महिन्यांचा 'दिलासा' मुंबई : राज्यातील

लग्नाला जाताना कुटुंबावर काळाचा घाला, तिघांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये ३ वर्षीय चिमुकलीचा समावेश

Amravati accident : अमरावती जिल्हातील वरूड-मोर्शी महामार्गावर रस्ते अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. खडका फाट्याजवळ

Massive fire in Bengaluru : बेंगळुरूमध्ये भीषण आग! नंदिनी लेआउटमध्ये PG इमारतीत अडकलेल्या ५० तरुणींचा थरारक बचाव

बेंगळुरू शहरातील नंदिनी लेआउट परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी उशिरा रात्री लागलेल्या भीषण

Iran - America War : अब्बास अराघचींचा ४८ तासांत तिसरा पाकिस्तान दौरा; शांतता प्रयत्नांना वेग

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची आज म्हणजेच मंगळवार २८ एप्रिल रोजी पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये पोहोचले

नाशिकमध्ये ACB ची मोठी कारवाई, जिल्हा परिषदेचे तीन अधिकारी लाच स्वीकारतांना जाळ्यात

नाशिक Nashik : नाशिकमध्ये ACB पथकाने मोठी कारवाई करत जिल्हा परिषदेच्या तीन अधिकाऱ्यांना लाच स्वीकारतांना रंगेहाथ