मुंबईतल्या काँग्रेस आमदाराचे दोन मतदारयाद्यांमध्ये नाव, चोर कोण, दोष कुणाचा?

मुंबई: काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सध्या मतदारयाद्यांमधील घोळांचा पाढा वाचायला सुरुवात केली आहे. त्यांच्यासोबतच राज्यातील विरोधक सुद्धा मतदारयांद्याबाबत आक्रमक झाले आहेत. मात्र निवडणूक आयोगाची चूक दाखवण्यात व्यस्थ असणाऱ्या विरोधकांना स्वत:च्या पक्षातील आमदाराचे नाव दोन मतदारयाद्यांमध्ये असलेले माहित आहे का? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.


मुंबईतील काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री अस्लम शेख यांच्या नावाची दोन मतदारयाद्यांमध्ये नोंदणी असल्याचा प्रकार ७ नोव्हेंबर रोजी समोर आला. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी हे प्रकरण समोर आणले आहे. याबाबत साटम यांनी मतदारयाद्यांचे फोटो शेअर करत सांगितले आहे. दरम्यान, अमित साटम यांच्या आरोपानंतर शेख यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. शेख यांनी याबाबतीत निवडणूक आयोगाची चूक असल्याचे म्हटले आहे.




माझे नाव अजून कुठल्या निवडणूक याद्यांमध्ये आहे, याबाबत मला स्वप्न पडले का? तसेच माझे नाव दोन मतदारयाद्यांमध्ये असणे ही निवडणूक आयोगाची चूक आहे, असे म्हणत शेख यांनी मतदार यादीमध्ये दुबार नाव आल्याची चूक निवडणूक आयोगाच्या माथी फोडली आहे.

Comments
Add Comment

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व

Devendra Fadnavis : कला, संस्कृती अन् खाद्यसंस्कृतीची ओळख पटवून देणारा 'माटी ९ पूर्वांचल महोत्सव' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती महान असून ही संस्कृती समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राने anj पूर्वांचलने महत्त्वपूर्ण

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच