मुंबईतील इतर भागांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर कधी होणार कारवाई ?

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कुलाबा कॉजवेवरील अनधिकृत फेरीवाले हटवले



मुंबई (खास प्रतिनिधी) : कुलाबा कॉजवेवरील बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच माजी नगरसेवक ऍड मकरंद नार्वेकर यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महापालिकेच्या ए विभागाने अखेर या अतिक्रमणावर कारवाई केली. त्यामुळे अखेर याविरोधात पुकारलेले आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे नार्वेकर यांनी जाहीर केले. पण कुलाबा कॉजवेवरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांवर नागरिकांच्या मागणीनुसार आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जर कारवाई होत असेल तर मग दादर, घाटकोपर, कांदिवली, गोरेगाव, वांद्रे पूर्व आदींसह इतर भागांमधील वाढत्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. लोकप्रतिनिधीही याची मागणी करत असतानाही कॉजवे प्रमाणे इतर विभागांमध्ये महापालिकेचे अधिकारी कधी कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.


भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली कुलाबा येथील रहिवाशांनी अतिक्रमण हटवण्याची मागणी केल्यानंतर आणि बीएमसी अधिकाऱ्यांना ए वॉर्ड ऑफिसबाहेर निदर्शने करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर कुलाबा कॉजवे वरील अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाई तीव्र करून बुधवारी ६७ बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. याबाबत कुलाबा रहिवाशांसह नार्वेकर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि ही कारवाई पुढेही कायम राहिली पाहिजे अशी मागणी केली. यासाठी महापालिकेला एक आठवड्याची मुदत देण्यात आली. या बैठकीत कुलाब्यातील सुमारे १५-२० रहिवाशी उपस्थित होते, महापालिका उपायुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव आणि ए वॉर्डचे प्रभारी जयदीप मोरे आदींसह अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर महापालिका कार्यालयावर करण्यात येणारे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली.


कुलाब्यातील वाढत्या फेरीवाल्यांमुळे रहिवाशी त्रस्त असल्याने नार्वेकर यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर महापालिकेच्या ए विभागाने धडक कारवाई केली. परंतु अशीच समस्या दादर पश्चिम आणि पूर्व दिशेला तसेच गोरेगाव, कांदिवली,मालाड.घाटकोपर,वांद्रे पूर्व, कुर्ला, मालाड, भांडुप, मुलुंड आदी भागांमध्ये असून रहिवाशांच्या मागणीनुसार लोकप्रतिनिधींकडून तक्रार करून तसेच आंदोलनाचा इशारा देवूनही महापालिकेचे अधिकारी कोणतीही कारवाई करत नाही. दादर परिसरात रेल्वे स्थानकाला विळखा घातला जात असतानाही महापालिकेचे अधिकारी याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे दादरची जनता प्रचंड त्रस्त आहे. त्यामुळे नागरिकांना रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त कधी मिळणार असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.


Comments
Add Comment

Bandra : वांद्रेतील नर्सिंग महाविद्यालय पीपीपी आधारीतच

मुंबई  : महापालिकेच्या वतीने वांद्रे पश्चिम येथील आर. के. पाटकर मार्गावरील भाभा रुग्णालयाजवळील आरोग्याबाबत

Old Building : जुन्या इमारती अतिधोकादायक दाखवण्यामागे सल्लागारांचा खेळ?

मुंबई  : मुंबईतील ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट (संरचनात्मक परीक्षण) करताना, अनेक सल्लागार

Multi Tunneling Mumbai :मुंबईत उभारणार बोगद्यांचे जाळे ; ४,३९२ कोटींचा खर्च अपेक्षित

मुंबई : मुंबईत सातत्याने पायाभूत सुविधांचे जाळे उभारले जात असले, तरी रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या अद्याप

Devendra Fadnavis : इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर

मुंबई : इराण-अमेरिका युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा परिणाम देशातील पेट्रोलियम

Mrinal Tai Gore Flyover Extension : अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगावकरांचा वेळ वाचणार, मृणालताई गोरे विस्तारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोडदरम्यानच्या मृणालताई गोरे

The Fort owners : किल्लेदारांनी बोटीतून केली मिठी नदीची सैर... दाखवला नदीत कचऱ्यासह तीन फुटांपर्यंतचा गाळ

मुंबई : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात असून सत्ताधारी पक्षाकडून प्रत्येक