मुंबईतील इतर भागांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर कधी होणार कारवाई ?

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कुलाबा कॉजवेवरील अनधिकृत फेरीवाले हटवले



मुंबई (खास प्रतिनिधी) : कुलाबा कॉजवेवरील बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच माजी नगरसेवक ऍड मकरंद नार्वेकर यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महापालिकेच्या ए विभागाने अखेर या अतिक्रमणावर कारवाई केली. त्यामुळे अखेर याविरोधात पुकारलेले आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे नार्वेकर यांनी जाहीर केले. पण कुलाबा कॉजवेवरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांवर नागरिकांच्या मागणीनुसार आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जर कारवाई होत असेल तर मग दादर, घाटकोपर, कांदिवली, गोरेगाव, वांद्रे पूर्व आदींसह इतर भागांमधील वाढत्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. लोकप्रतिनिधीही याची मागणी करत असतानाही कॉजवे प्रमाणे इतर विभागांमध्ये महापालिकेचे अधिकारी कधी कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.


भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली कुलाबा येथील रहिवाशांनी अतिक्रमण हटवण्याची मागणी केल्यानंतर आणि बीएमसी अधिकाऱ्यांना ए वॉर्ड ऑफिसबाहेर निदर्शने करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर कुलाबा कॉजवे वरील अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाई तीव्र करून बुधवारी ६७ बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. याबाबत कुलाबा रहिवाशांसह नार्वेकर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि ही कारवाई पुढेही कायम राहिली पाहिजे अशी मागणी केली. यासाठी महापालिकेला एक आठवड्याची मुदत देण्यात आली. या बैठकीत कुलाब्यातील सुमारे १५-२० रहिवाशी उपस्थित होते, महापालिका उपायुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव आणि ए वॉर्डचे प्रभारी जयदीप मोरे आदींसह अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर महापालिका कार्यालयावर करण्यात येणारे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली.


कुलाब्यातील वाढत्या फेरीवाल्यांमुळे रहिवाशी त्रस्त असल्याने नार्वेकर यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर महापालिकेच्या ए विभागाने धडक कारवाई केली. परंतु अशीच समस्या दादर पश्चिम आणि पूर्व दिशेला तसेच गोरेगाव, कांदिवली,मालाड.घाटकोपर,वांद्रे पूर्व, कुर्ला, मालाड, भांडुप, मुलुंड आदी भागांमध्ये असून रहिवाशांच्या मागणीनुसार लोकप्रतिनिधींकडून तक्रार करून तसेच आंदोलनाचा इशारा देवूनही महापालिकेचे अधिकारी कोणतीही कारवाई करत नाही. दादर परिसरात रेल्वे स्थानकाला विळखा घातला जात असतानाही महापालिकेचे अधिकारी याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे दादरची जनता प्रचंड त्रस्त आहे. त्यामुळे नागरिकांना रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त कधी मिळणार असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.


Comments
Add Comment

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व

Devendra Fadnavis : कला, संस्कृती अन् खाद्यसंस्कृतीची ओळख पटवून देणारा 'माटी ९ पूर्वांचल महोत्सव' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती महान असून ही संस्कृती समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राने anj पूर्वांचलने महत्त्वपूर्ण

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे