मुंबईतील इतर भागांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर कधी होणार कारवाई ?

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कुलाबा कॉजवेवरील अनधिकृत फेरीवाले हटवले



मुंबई (खास प्रतिनिधी) : कुलाबा कॉजवेवरील बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच माजी नगरसेवक ऍड मकरंद नार्वेकर यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महापालिकेच्या ए विभागाने अखेर या अतिक्रमणावर कारवाई केली. त्यामुळे अखेर याविरोधात पुकारलेले आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे नार्वेकर यांनी जाहीर केले. पण कुलाबा कॉजवेवरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांवर नागरिकांच्या मागणीनुसार आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जर कारवाई होत असेल तर मग दादर, घाटकोपर, कांदिवली, गोरेगाव, वांद्रे पूर्व आदींसह इतर भागांमधील वाढत्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. लोकप्रतिनिधीही याची मागणी करत असतानाही कॉजवे प्रमाणे इतर विभागांमध्ये महापालिकेचे अधिकारी कधी कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.


भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली कुलाबा येथील रहिवाशांनी अतिक्रमण हटवण्याची मागणी केल्यानंतर आणि बीएमसी अधिकाऱ्यांना ए वॉर्ड ऑफिसबाहेर निदर्शने करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर कुलाबा कॉजवे वरील अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाई तीव्र करून बुधवारी ६७ बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. याबाबत कुलाबा रहिवाशांसह नार्वेकर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि ही कारवाई पुढेही कायम राहिली पाहिजे अशी मागणी केली. यासाठी महापालिकेला एक आठवड्याची मुदत देण्यात आली. या बैठकीत कुलाब्यातील सुमारे १५-२० रहिवाशी उपस्थित होते, महापालिका उपायुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव आणि ए वॉर्डचे प्रभारी जयदीप मोरे आदींसह अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर महापालिका कार्यालयावर करण्यात येणारे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली.


कुलाब्यातील वाढत्या फेरीवाल्यांमुळे रहिवाशी त्रस्त असल्याने नार्वेकर यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर महापालिकेच्या ए विभागाने धडक कारवाई केली. परंतु अशीच समस्या दादर पश्चिम आणि पूर्व दिशेला तसेच गोरेगाव, कांदिवली,मालाड.घाटकोपर,वांद्रे पूर्व, कुर्ला, मालाड, भांडुप, मुलुंड आदी भागांमध्ये असून रहिवाशांच्या मागणीनुसार लोकप्रतिनिधींकडून तक्रार करून तसेच आंदोलनाचा इशारा देवूनही महापालिकेचे अधिकारी कोणतीही कारवाई करत नाही. दादर परिसरात रेल्वे स्थानकाला विळखा घातला जात असतानाही महापालिकेचे अधिकारी याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे दादरची जनता प्रचंड त्रस्त आहे. त्यामुळे नागरिकांना रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त कधी मिळणार असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.


Comments
Add Comment

AI च्या मदतीने दूध भेसळ रोखण्यासाठी IIT ची मदत घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मुंबई : राज्यात दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने टेस्ट स्ट्रीप तयार केली

hydroelectric project : उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्थेबरोबर ५ हजार २०० कोटींचा करार

मुंबई : जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्था मर्यादित यांच्यात मुख्यमंत्री

Panvel : पनवेलच्या आदई-नेवाळी दगडखाणीबाबत गावकऱ्यांच्या विश्वासाने तोडगा काढणार

मुंबई : रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातल्या आदई आणि नेवाळी येथील दगडखाणींमुळे स्थानिक ग्रामस्थांना

Navi Mumbai : शर्तभंग झालेल्या सिडको, नैनाकडील जागा सरकारजमा करा!

मुंबई : महसूल विभागाकडील जागा सिडको, नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्र) अशा स्थानिक

Maharashtra : राज्यात लवकरच ५३ स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रे उभारण्याचे काम तातडीने पूर्ण करा

मुंबई : राज्यातील वाहनांची फिटनेस तपासणी केवळ नोंदणीकृत स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राद्वारे (ऑटोमेटेड

Marathi : रिक्षा-टॅक्सी चालकांना आता ‘व्यावहारिक मराठी’चे धडे

मुंबई : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा बोलणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून सुरू असलेल्या