Narayan Rane : नारायण राणे यांचं कणकवलीतील युती आणि राज्याच्या विकासावर मोठं भाष्य; राणे म्हणाले उद्धव ठाकरेंशी...

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कणकवली येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत राज्यातील राजकीय आणि विकासकामांच्या स्थितीवर सविस्तर भाष्य केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील कोणत्याही गटाशी युती होण्याची शक्यता साफ नाकारली. राजकीय भूमिकेबरोबरच राणे यांनी जमीन घोटाळ्यांच्या मुद्द्यांवर कठोर भूमिका घेतली. ते म्हणाले की, राज्यातील जमीन घोटाळ्यांवर तातडीने आणि कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.


याबद्दल बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त केला. राणे म्हणाले, "मुख्यमंत्री या गंभीर विषयावर योग्य निर्णय घेतील आणि दोषींवर निश्चितच कठोर कारवाई होईल, अशी माझी अपेक्षा आहे."



सिंधुदुर्ग विमानतळ आणि कोकण रेल्वेवर भाष्य


यावेळी त्यांनी विविध विकास प्रकल्पांविषयी माहिती दिली. सिंधुदुर्ग येथील विमानतळाच्या कामासाठी त्यांनी केंद्रातून निधीची व्यवस्था केल्याचे सांगितले. या कामांसाठी केंद्रीय मंत्र्यांकडून मदत मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. राणे यांची इच्छा आहे की, लवकरच इंडिगो एअरलाइनने या विमानतळावरून आपली सेवा सुरू करावी. कोकण रेल्वेच्या आर्थिक अडचणींवर बोलताना राणे यांनी महाराष्ट्र सरकारकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, "कोकण रेल्वेच्या आर्थिक अडचणींमुळे काम थांबले आहे. जर महाराष्ट्र सरकारने आर्थिक मदत केली, तर हे काम त्वरित पूर्ण होईल." स्थानिक समस्यांवर बोलताना त्यांनी रुग्णवाहिकांच्या संदर्भात एक महत्त्वाचे आश्वासन दिले. त्यांनी स्पष्ट केले की, रुग्णांना त्रास होऊ नये यासाठी, रुग्णवाहिकांसाठी लागणाऱ्या पेट्रोलची व्यवस्था केली जाईल. राजकीय परिस्थितीचा अंदाज व्यक्त करताना, राणे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील, असे ठाम भाकीत केले.

Comments
Add Comment

भारतात किती आहे LPG चा साठा ? दररोज किती आवश्यक आहे आणि आपली व्यवस्था समजून घ्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे भारतासह जगभर तेल आणि

इलेक्ट्रॉनिक जॅमर सक्रीय, समुद्रात जहाजांची वाहतूक कोलमडली

तेहरान : पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू आहे. या युद्धाचा एक भाग म्हणून शत्रू देशांनी

ठाणे, पुणे नागपूरसह ११ जिल्ह्यांत होणार अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये

प्रशासकीय भार हलका करण्यासाठी निर्णय; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील वाढती

'केवळ जीएसटी परताव्यावर अवलंबून न राहता ठोस उत्पन्नाचे स्रोत निर्माण करा'

आमदार निलेश राणे यांचे अर्थसंकल्पावर अभ्यासपूर्ण भाषण; महसुली तुटीवर व्यक्त केली चिंता मुंबई : महाराष्ट्राचा

विधान परिषदेचा अवमान करणार्‍या शरद पवार गटाच्या पदाधिकार्‍याला शिक्षा ?

पदाधिकार्‍याला ३० दिवसांच्या कारावासाची शिफारस घटनात्मक पदांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले;

विधिमंडळातील चर्चांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

विधानसभा अध्यक्षांनी घेतली गंभीर दखल; कठोर कारवाईचा दिला इशारा मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पासारख्या अतिशय