Bhandara Accident News : भंडारा हादरले! - २२ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा भीषण अपघात; २२ विद्यार्थी जखमी

भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. २२ शालेय विद्यार्थ्यांना (School Bus Accident) घेऊन जाणाऱ्या एका शाळेच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत बसमधील सर्व २२ विद्यार्थी जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात बसचालकाचा बसवरील ताबा सुटल्यामुळे घडल्याचे समोर आले आहे. रस्त्यावर किंवा तांत्रिक कारणामुळे नियंत्रण सुटले असावे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि जखमी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढले. अपघातात जखमी झालेल्या सर्व २२ विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू असून, सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण काय होते, चालक दारूच्या नशेत होता का किंवा तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला, या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.



बस झाडावर आदळली अन्...


मिळालेल्या माहितीनुसार, निलज फाटा येथे येताच बसचालकाचा बसवरील ताबा सुटला आणि गाडी अनियंत्रित झाली. चालकाने प्रसंगावधान राखून मोठी दुर्घटना टाळण्यासाठी बस रस्त्याच्या कडेच्या झाडावर धडकवली. बसमध्ये एकूण २२ विद्यार्थी, १ केअर टेकर आणि चालक होता. अपघातानंतर जखमी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय भिवापूर येथे हलविण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत दिलासादायक बाब समोर आली आहे. सर्व विद्यार्थी सुरक्षित असून, त्यांना केवळ किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांचे पालक अधिक संतप्त झाले आहेत. शालेय वाहतुकीतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर पालकांनी मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा अपघात नेमका कसा झाला, चालकाच्या निष्काळजीपणामुळे की बसमध्ये तांत्रिक बिघाड होता, या प्रकरणाची गहन चौकशी पोलीस करत आहेत. हा अपघात मोठा होता होता टळला असला तरी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा आणि प्रशासनाने ठोस पाऊले उचलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०