आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने मांडला आशिया कपचा मुद्दा, समस्येवर मार्ग काढण्यासाठी समितीची स्थापना

मुंबई : भारताने आशिया चषक २०२५ जिंकला पण विजेत्या भारतीय क्रिकेट संघाला ट्रॉफी मिळाली नाही. भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषद अध्यक्ष आणि पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी हे पाकिस्तान सरकारमध्ये मंत्री असल्यामुळे त्यांचाकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. यानंतर भारतीय संघाचा मान असलेली ट्रॉफी मोहसीन नक्वी परत घेऊन गेले. या पार्श्वभूमीवर आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने आशिया कप ट्रॉफीचा मुद्दा मांडला होता.



मिळालेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबरला आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने आशिया कप ट्रॉफीचा मुद्दा मांडला. यावेळी आयसीसी बोर्डाच्या सर्व सदस्यांनी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ क्रिकेट विश्वासाठी महत्त्वाचे देश आहेत. त्यामुळे मैत्रीपूर्ण पद्धतीने या वादावर मार्ग काढला पाहिजे, असे मत मांडले. दरम्यान, आशिया कप ट्रॉफी वादासंदर्भात एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. ज्यानुसार या समस्येवर मार्ग काढण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येणार आहे. आयसीसीच्या या बैठकीला मोहसीन नक्वी देखील उपस्थित होते.



दुबईमध्ये झालेल्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान तीन वेळा आमने सामने आले असून भारताने तीन वेळा पाकिस्तानचा पराभव केला. पहिल्यांदा भारताने ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानला पराभूत केले. त्यानंतर सुपर फोरमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले. या दुसऱ्या सामन्यातही पाकिस्तान पराभूत झाला. आशिया कपचा अंतिम सामना सुद्धा भारत विरूद्ध पाकिस्तानमध्ये झाला. यावेळी भारताने पाकिस्तानचा पराभव करत आशियाई कप नावावर केला. सध्या आशिया कपची ट्रॉफी दुबईच्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या कार्यालयात आहे.

Comments
Add Comment

ब्रिस्बेनच्या गाबावर रंगणार अखेरचा T20 सामना, भारत मारणार का बाजी ?

ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा अर्थात

पावसाच्या खेळात भारताचा दणदणीत विजय! पाकिस्तानला अवघ्या २ धावांनी लोळवले

मोंग कोक : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात, त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना रोमांचक

विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा विजय देशातील मुलींसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी

विश्वचषक विजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षकांचाही राज्य सरकारकडून विशेष गौरव! जेमिमा, स्मृती आणि राधा यादव यांना प्रत्येकी २.२५ कोटी!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकून देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

असं चकवलं कांगारुंना, शिवम दुबेने दिली माहिती

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने

जसप्रीत बुमराहचा पराक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्वीन्सलँडच्या कॅरारा ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-२०