आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने मांडला आशिया कपचा मुद्दा, समस्येवर मार्ग काढण्यासाठी समितीची स्थापना

मुंबई : भारताने आशिया चषक २०२५ जिंकला पण विजेत्या भारतीय क्रिकेट संघाला ट्रॉफी मिळाली नाही. भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषद अध्यक्ष आणि पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी हे पाकिस्तान सरकारमध्ये मंत्री असल्यामुळे त्यांचाकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. यानंतर भारतीय संघाचा मान असलेली ट्रॉफी मोहसीन नक्वी परत घेऊन गेले. या पार्श्वभूमीवर आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने आशिया कप ट्रॉफीचा मुद्दा मांडला होता.



मिळालेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबरला आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने आशिया कप ट्रॉफीचा मुद्दा मांडला. यावेळी आयसीसी बोर्डाच्या सर्व सदस्यांनी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ क्रिकेट विश्वासाठी महत्त्वाचे देश आहेत. त्यामुळे मैत्रीपूर्ण पद्धतीने या वादावर मार्ग काढला पाहिजे, असे मत मांडले. दरम्यान, आशिया कप ट्रॉफी वादासंदर्भात एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. ज्यानुसार या समस्येवर मार्ग काढण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येणार आहे. आयसीसीच्या या बैठकीला मोहसीन नक्वी देखील उपस्थित होते.



दुबईमध्ये झालेल्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान तीन वेळा आमने सामने आले असून भारताने तीन वेळा पाकिस्तानचा पराभव केला. पहिल्यांदा भारताने ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानला पराभूत केले. त्यानंतर सुपर फोरमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले. या दुसऱ्या सामन्यातही पाकिस्तान पराभूत झाला. आशिया कपचा अंतिम सामना सुद्धा भारत विरूद्ध पाकिस्तानमध्ये झाला. यावेळी भारताने पाकिस्तानचा पराभव करत आशियाई कप नावावर केला. सध्या आशिया कपची ट्रॉफी दुबईच्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या कार्यालयात आहे.

Comments
Add Comment

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा विजय

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतल्या श्रीलंका विरुद्ध

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतला श्रीलंका विरुद्ध

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती

फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे

ICC Women's T20 World Cup : आयसीसी महिला टी२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या भारताचा सामना कधी ?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. ही

विंडीजचा झिम्बाब्वे विरुद्ध मोठा विजय

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना