ब्रिस्बेनच्या गाबावर रंगणार अखेरचा T20 सामना, भारत मारणार का बाजी ?


ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा अर्थात शेवटचा सामना आज म्हणजेच शनिवार ८ नोव्हेंबर रोजी ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडिय खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजून ४५ मिनिटांपासून सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या क्रीडा वाहिन्यांवर आणि लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टार या मोबाईल अॅपवर होणार आहे. हा सामना जिंकल्यास भारत मालिका ३-१ अशी जिंकणार आहे. ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेनचा सामना जिंकल्यास मालिकेत ते २-२ अशी बरोबरी साधतील. यामुळे ब्रिस्बेनमध्ये काय होणार याविषयीची उत्सुकता वाढली आहे.



मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने चार विकेट राखून जिंकला. यानंतर भारताने तिसरा सामना पाच विकेट राखून आणि चौथा सामना ४८ धावांनी जिंकला. आता ब्रिस्बेनमध्ये जिंकून टी ट्वेंटी मालिका खिशात टाकण्याचा प्रयत्न भारतीय क्रिकेटपटू करतील.



भारतीय संघ: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, हर्षित कुमार रेड्डी



ऑस्ट्रेलिया संघ: मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, जोश फिलिप, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, अॅडम झम्पा, मॅथ्यू कुहनेमन, मिचेल ओवेन, महली बियर्डमन



भारत - ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी मालिका २०२५


पहिला सामना - मनुका ओव्हल, कॅनबेरा - पावसामुळे रद्द


दुसरा सामना - मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न - ऑस्ट्रेलिया चार विकेट राखून विजयी


तिसरा सामना - बेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट - भारत पाच विकेट राखून विजयी


चौथा सामना - कॅरारा ओव्हल, क्वीन्सलँड - भारत ४८ धावांनी विजयी


पाचवा सामना - द गाबा, ब्रिस्बेन


Comments
Add Comment

IPL 2026 : आयपीएल २०२६ ला दुखापतींचं ग्रहण; अनेक क्रिकेटपटूंच्या दुखापतींमुळे फ्रँचायझींच्या चिंतेत वाढ

मुंबई : आयपीएल २०२६ सुरू होण्यास केवळ एक आठवडा शिल्लक असतानाच, अनेक संघ दुखापतींशी झुंजत आहेत. १० पैकी आठ

Jasprit Bumrah : आयसीसी टी-२० क्रमवारी जसप्रीत बुमराहची टॉप ५ मध्ये नोंद

मुंबई : भारताने ८ मार्च रोजी टी२० विश्वचषक जिंकल्यापासून एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आणि

Gudi Padwa 2026 : सचिन तेंडुलकर, सूर्यकुमार आणि अजिंक्य रहाणेने यांच्यासह अनेक खेळाडूंनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर, नुकताच भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा सूर्यकुमार यादव, माजी फिरकी गोलंदाज

SRH IPL 2026 : ईशान किशन आणि अभिषेक शर्मावर हैदराबाद संघाने टाकली मोठी जबाबदारी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या आधी, सनरायझर्स हैदराबादने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताच्या नुकत्याच

खेळाडूंची ‘A+’ श्रेणीच रद्द? BCCIचा मोठा निर्णय; बुमराह- जडेजाच्या मानधनात होणार घट

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय २०२५-२६ हंगामासाठी क्रिकेटपटूंच्या वार्षिक करार आणि मानधन

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील