ब्रिस्बेनच्या गाबावर रंगणार अखेरचा T20 सामना, भारत मारणार का बाजी ?


ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा अर्थात शेवटचा सामना आज म्हणजेच शनिवार ८ नोव्हेंबर रोजी ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडिय खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजून ४५ मिनिटांपासून सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या क्रीडा वाहिन्यांवर आणि लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टार या मोबाईल अॅपवर होणार आहे. हा सामना जिंकल्यास भारत मालिका ३-१ अशी जिंकणार आहे. ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेनचा सामना जिंकल्यास मालिकेत ते २-२ अशी बरोबरी साधतील. यामुळे ब्रिस्बेनमध्ये काय होणार याविषयीची उत्सुकता वाढली आहे.



मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने चार विकेट राखून जिंकला. यानंतर भारताने तिसरा सामना पाच विकेट राखून आणि चौथा सामना ४८ धावांनी जिंकला. आता ब्रिस्बेनमध्ये जिंकून टी ट्वेंटी मालिका खिशात टाकण्याचा प्रयत्न भारतीय क्रिकेटपटू करतील.



भारतीय संघ: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, हर्षित कुमार रेड्डी



ऑस्ट्रेलिया संघ: मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, जोश फिलिप, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, अॅडम झम्पा, मॅथ्यू कुहनेमन, मिचेल ओवेन, महली बियर्डमन



भारत - ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी मालिका २०२५


पहिला सामना - मनुका ओव्हल, कॅनबेरा - पावसामुळे रद्द


दुसरा सामना - मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न - ऑस्ट्रेलिया चार विकेट राखून विजयी


तिसरा सामना - बेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट - भारत पाच विकेट राखून विजयी


चौथा सामना - कॅरारा ओव्हल, क्वीन्सलँड - भारत ४८ धावांनी विजयी


पाचवा सामना - द गाबा, ब्रिस्बेन


Comments
Add Comment

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक