ब्रिस्बेनच्या गाबावर रंगणार अखेरचा T20 सामना, भारत मारणार का बाजी ?


ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा अर्थात शेवटचा सामना आज म्हणजेच शनिवार ८ नोव्हेंबर रोजी ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडिय खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजून ४५ मिनिटांपासून सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या क्रीडा वाहिन्यांवर आणि लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टार या मोबाईल अॅपवर होणार आहे. हा सामना जिंकल्यास भारत मालिका ३-१ अशी जिंकणार आहे. ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेनचा सामना जिंकल्यास मालिकेत ते २-२ अशी बरोबरी साधतील. यामुळे ब्रिस्बेनमध्ये काय होणार याविषयीची उत्सुकता वाढली आहे.



मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने चार विकेट राखून जिंकला. यानंतर भारताने तिसरा सामना पाच विकेट राखून आणि चौथा सामना ४८ धावांनी जिंकला. आता ब्रिस्बेनमध्ये जिंकून टी ट्वेंटी मालिका खिशात टाकण्याचा प्रयत्न भारतीय क्रिकेटपटू करतील.



भारतीय संघ: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, हर्षित कुमार रेड्डी



ऑस्ट्रेलिया संघ: मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, जोश फिलिप, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, अॅडम झम्पा, मॅथ्यू कुहनेमन, मिचेल ओवेन, महली बियर्डमन



भारत - ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी मालिका २०२५


पहिला सामना - मनुका ओव्हल, कॅनबेरा - पावसामुळे रद्द


दुसरा सामना - मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न - ऑस्ट्रेलिया चार विकेट राखून विजयी


तिसरा सामना - बेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट - भारत पाच विकेट राखून विजयी


चौथा सामना - कॅरारा ओव्हल, क्वीन्सलँड - भारत ४८ धावांनी विजयी


पाचवा सामना - द गाबा, ब्रिस्बेन


Comments
Add Comment

आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने मांडला आशिया कपचा मुद्दा, समस्येवर मार्ग काढण्यासाठी समितीची स्थापना

मुंबई : भारताने आशिया चषक २०२५ जिंकला पण विजेत्या भारतीय क्रिकेट संघाला ट्रॉफी मिळाली नाही. भारतीय संघाने आशियाई

पावसाच्या खेळात भारताचा दणदणीत विजय! पाकिस्तानला अवघ्या २ धावांनी लोळवले

मोंग कोक : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात, त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना रोमांचक

विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा विजय देशातील मुलींसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी

विश्वचषक विजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षकांचाही राज्य सरकारकडून विशेष गौरव! जेमिमा, स्मृती आणि राधा यादव यांना प्रत्येकी २.२५ कोटी!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकून देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

असं चकवलं कांगारुंना, शिवम दुबेने दिली माहिती

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने

जसप्रीत बुमराहचा पराक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्वीन्सलँडच्या कॅरारा ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-२०